शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नारायणगावातून प्रवास नको रे बाबा!

By admin | Updated: June 8, 2015 04:57 IST

शहरातून प्रवास नको रे बाबा...अशी अवस्था वाहनचालकांची झाली आहे. येथे वाहतूककोंडी ही नित्याचीच झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून तर ४ ते ५ किलोमीटरपर्यंत दुतर्फा वाहनांच्या रांगा लागत आहे.

नारायणगाव : शहरातून प्रवास नको रे बाबा...अशी अवस्था वाहनचालकांची झाली आहे. येथे वाहतूककोंडी ही नित्याचीच झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून तर ४ ते ५ किलोमीटरपर्यंत दुतर्फा वाहनांच्या रांगा लागत आहे. वाहतूककोंडी दूर करण्यासाठी शहरातील महामार्गावरील अतिक्रमणे दूर करण्याची मागणी ग्रामस्थ आणि प्रवासी करीत आहेत.पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव शहर हे महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जाते. या गावामधून पुणे किंवा नाशिककडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याने प्रवाशांना शहरातूनच जावे लागते. नारायणगाव बसस्थानकासमोर कायम वाहतूककोंडी होत असल्याने वाहतूक नियंत्रण करणारे पोलीस व ट्रॅफिक वॉर्डन तसेच स्थानिक ग्रामस्थ, व्यावसायिक हैराण झाले आहेत. रस्त्याच्या लगतचे व्यावसायिक त्यांच्या दुकानातील विक्रीसाठी ठेवलेला माल रस्त्यावर आणून ठेवत असल्याने वाहतूककोंडीला हे व्यावसायिकदेखील जबाबदार आहेत, जीप, टेम्पो, रिक्षा ही वाहने रस्त्यावर असतात, त्यांचेवरदेखील कारवाई पोलिसांनी करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. नारायणगाव पोलीस ठाण्याकडून वाहतूक नियंत्रणाकरिता एकच पोलीस कर्मचारी देण्यात आला आहे. त्याच्या सोबतीला दोन ट्रॅफिक वॉर्डन देण्यात आले आहेत. ते वाहतूककोंडी दूर करण्यासाठी दिवसभर भरउन्हात महामार्गावर उभे असतात. दिवसभर वाहतूककोंडी दूर करून रात्री उशिरा घरी जातात. महामार्गावरील कोंडी दूर करण्यासाठी पुणे-नाशिक महामार्गावरील अतिक्रमणे दूर करावीत, पोलीस खाते व राष्ट्रीय महामार्ग विभागाने ही कार्यवाही लवकर करावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि प्रवाशी करीत आहेत.