शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

तत्कालीन सरकारचा खाेटेपणा उघड हाेऊ नये म्हणून काेरेगाव भीमाचा तपास 'NIA'कडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 17:34 IST

काेरेगाव भीमा प्रकरणाचा तपास 'एनआयए' कडे दिल्याने काेर्टात जाण्याचा निर्णय माजी न्यायमूर्ती बी. जी. काेळसे पाटील यांनी घेतला आहे.

पुणे : तत्कालीन सरकारने केलेला खाेटा तपास उघड हाेऊ नये म्हणून काेरेगाव भीमाचा तपास 'एनआयए'कडे देण्यात आल्या असल्याचा आराेप माजी न्यायमूर्ती बी. जी. काेळसे पाटील यांनी केला आहे. तसेच या विराेधात आपण काेर्टात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेत काेळसे पाटील यांनी हा आराेप केला. यावेळी त्यांनी तत्कालीन फडणवीस सरकारवर देखील जाेरदार टीका केली. काेळसे पाटील म्हणाले, काेरेगाव भीमा प्रकरणात एल्गार परिषदेचा तपास तत्कालीन सराकरने पूर्ण करुन चार्जशीट काेर्टात दाखल केली. असे असताना आता हा तपास 'एनआयए'कडे देण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा 'एनआयए' तपास करुन चार्जशीट दाखल करणार. तत्कालीन सरकारने केलेला खाेटा तपास उघड हाेऊ नये यासाठी हे प्रकरण राज्य सरकारकडून काढून एन आयकडे देत हे प्रकरण पुढे ढकलण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबाेटे यांना वाचविण्यासाठी हे सर्व चालू असल्याचेही काेळसे पाटील यावेळी म्हणाले. 

केंद्राच्या मनात वेगळीच भीती काेरेगाव भीमा NIA चाैकशीवर शरद पवार यांना संशय 

एल्गार परिषदेचा तसेच काेरेगाव भीमा येथील दंगलीचा संबंध नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सुधीर ढवळे वगळता एल्गार प्रकरणी इतर अटक केलेल्यांना आपण भेटलाे देखील नसल्याचे ते म्हणाले. तसेच संभाजी भिडे आणि मिलिंद एकबाेटे दंगली संदर्भात बैठका घेत असल्याचे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहित हाेते. जर त्यांना याबाबत माहिती नसेल तर त्यांनी इंटेलिजन्स ब्युराेकडून माहिती का नाही घेतली असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. विश्वास नांगरे पाटील यांनी नेमलेल्या समितीमध्ये देखील भिडे आणि एकबाेटे यांना दाेषी ठरवल्याचे ते म्हणाले. तत्कालिन सरकारने खाेटे पुरावे तयार करुन एल्गार परिषदेच्या अनुषंगाने गुन्हे दाखल केल्याचेही ते यावेळी म्हणाले. 

...त्यामुळे एल्गारवर गुन्हा दाखल केल्याची शक्यता  2002 च्या दंगलीची चाैकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या आयाेगामध्ये पी. बी. सावंत हाेते.  माेदी आणि शहा यांना दंगलीसाठी कारणीभूत ठरवून त्यांना कुठल्याही संविधानिक पदावर ठेवून नये असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे एल्गार परिषदेच्या आयाेजनात सावंत असल्याने सरकारने एल्गारला टार्गेट केले असण्याची शक्यता काेळसे पाटील यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारElgar morchaएल्गार मोर्चाPuneपुणेNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा