शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

तिसरे अपत्य असणाऱ्या खासदार- आमदारांना अपात्र करावे : अजित पवारांची केंद्राकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 16:45 IST

आपल्या लोकसंख्येचा आकडा आज १४२ कोटीपर्यंत पोहोचला असून याला आपणच जबाबदार आहोत. ही गोष्ट सर्वांनी गांभीर्याने घ्यावी

बारामती: आज देशाची लोकसंख्या १४२ कोटीच्या पुढे गेली आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना आम्ही तिसरे आपत्य जन्माला घालणाऱ्या व्यक्तींना स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लढवण्यास आपात्र केले होते. हा निर्णय आम्ही घाबरत-घाबरत घेतला होता. मात्र यावर लोक आम्हाला म्हणतात खासदार आमदारांना या नियमानुसार तुम्ही अपात्र का केले नाही. मात्र हा अधिकार आमच्या हातात नसून तो केंद्र सरकारच्या हातात आहे. केंद्राने याबाबतचा निर्णय घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

बारामती येथे एका खासगी कार्यक्रमा दरम्यान रविवारी (दि. २३) विरोधी पक्षनेते अजित पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले,  आज १४२ कोटी इथपर्यंत आपल्या लोकसंख्येचा आकडा पोहोचला आहे. याला आपणच जबाबदार आहोत. ही गोष्ट सर्वांनी गांभीर्याने  घेतली पाहिजे. कोणत्याही जातीने धर्माने पंथाने ही देवाची कृपा आहे असं समजू नये. हे कशाची देवाची कृपा? असा उपरोधिक सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. एक किंवा दोन अपत्त्यावर आपण थांबले पाहिजे. त्याशिवाय आपल्या देशाचे, राज्याचे भले होणार नाही. इथून पुढे दोन पेक्षा जास्त अपत्य जन्माला घालणाºयांना कसलीही सवलत द्यायची नाही.

 विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना आम्ही घाबरत घाबरत तिसरे अपत्य झाल्यानंतर ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यास अशांना अपात्र केले. सहकार क्षेत्रामध्ये देखील अशा लोकांना अपात्र केले. त्यावेळी लोक आम्हाला म्हणतात खासदार आमदारांना या नियमानुसार तुम्ही अपात्र का केले नाही. मात्र हा अधिकार आमच्या हातात नसून तो केंद्र सरकारच्या हातात आहे. केंद्राने याबाबतचा निर्णय घ्यावा, अशी आमची मागणी आहे. जास्त अपत्य जन्माला घालणाºयांना कसल्याही प्रकारच्या सवलती  दिल्या गेल्या नाहीत तर कुठेतरी जनता जागृत होईल. ज्यांना निवडणुकीला उभे राहायचे असते ते बरोबर दोन अपत्यांवर थांबतात. तिसºया आपत्याबाबत निर्णय घेताना आम्ही मार्ग काढला. पहिल्या बाळंतपणा वेळेस  एक अपत्य झाले आणि दुसºया बाळंतपणा वेळेस जर जुळे जन्माला आले, तरी यामध्ये आई-वडिलांचा दोष नाही. हा विषय मी कॅबिनेट मीटिंगमध्ये मांडला होता. दुसºया बाळंतपणात जर जुळे, तिळे झाले तर तिथेच थांबायचे. तसेच पहिल्या बाळंतपणा वेळेस जर जुळे आणि तळे झाले तर मात्र दुसरे बाळंतपण होऊ द्यायचे नाही. पहिल्या बाळंतपणा वेळेसच थांबायचे, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारणMLAआमदारCentral Governmentकेंद्र सरकार