शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

तिसरे अपत्य असणाऱ्या खासदार- आमदारांना अपात्र करावे : अजित पवारांची केंद्राकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 16:45 IST

आपल्या लोकसंख्येचा आकडा आज १४२ कोटीपर्यंत पोहोचला असून याला आपणच जबाबदार आहोत. ही गोष्ट सर्वांनी गांभीर्याने घ्यावी

बारामती: आज देशाची लोकसंख्या १४२ कोटीच्या पुढे गेली आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना आम्ही तिसरे आपत्य जन्माला घालणाऱ्या व्यक्तींना स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लढवण्यास आपात्र केले होते. हा निर्णय आम्ही घाबरत-घाबरत घेतला होता. मात्र यावर लोक आम्हाला म्हणतात खासदार आमदारांना या नियमानुसार तुम्ही अपात्र का केले नाही. मात्र हा अधिकार आमच्या हातात नसून तो केंद्र सरकारच्या हातात आहे. केंद्राने याबाबतचा निर्णय घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

बारामती येथे एका खासगी कार्यक्रमा दरम्यान रविवारी (दि. २३) विरोधी पक्षनेते अजित पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले,  आज १४२ कोटी इथपर्यंत आपल्या लोकसंख्येचा आकडा पोहोचला आहे. याला आपणच जबाबदार आहोत. ही गोष्ट सर्वांनी गांभीर्याने  घेतली पाहिजे. कोणत्याही जातीने धर्माने पंथाने ही देवाची कृपा आहे असं समजू नये. हे कशाची देवाची कृपा? असा उपरोधिक सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. एक किंवा दोन अपत्त्यावर आपण थांबले पाहिजे. त्याशिवाय आपल्या देशाचे, राज्याचे भले होणार नाही. इथून पुढे दोन पेक्षा जास्त अपत्य जन्माला घालणाºयांना कसलीही सवलत द्यायची नाही.

 विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना आम्ही घाबरत घाबरत तिसरे अपत्य झाल्यानंतर ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यास अशांना अपात्र केले. सहकार क्षेत्रामध्ये देखील अशा लोकांना अपात्र केले. त्यावेळी लोक आम्हाला म्हणतात खासदार आमदारांना या नियमानुसार तुम्ही अपात्र का केले नाही. मात्र हा अधिकार आमच्या हातात नसून तो केंद्र सरकारच्या हातात आहे. केंद्राने याबाबतचा निर्णय घ्यावा, अशी आमची मागणी आहे. जास्त अपत्य जन्माला घालणाºयांना कसल्याही प्रकारच्या सवलती  दिल्या गेल्या नाहीत तर कुठेतरी जनता जागृत होईल. ज्यांना निवडणुकीला उभे राहायचे असते ते बरोबर दोन अपत्यांवर थांबतात. तिसºया आपत्याबाबत निर्णय घेताना आम्ही मार्ग काढला. पहिल्या बाळंतपणा वेळेस  एक अपत्य झाले आणि दुसºया बाळंतपणा वेळेस जर जुळे जन्माला आले, तरी यामध्ये आई-वडिलांचा दोष नाही. हा विषय मी कॅबिनेट मीटिंगमध्ये मांडला होता. दुसºया बाळंतपणात जर जुळे, तिळे झाले तर तिथेच थांबायचे. तसेच पहिल्या बाळंतपणा वेळेस जर जुळे आणि तळे झाले तर मात्र दुसरे बाळंतपण होऊ द्यायचे नाही. पहिल्या बाळंतपणा वेळेसच थांबायचे, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारणMLAआमदारCentral Governmentकेंद्र सरकार