शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

सरकारमधील भांडणे, नाराजीचा आला उबग; बहुमत मिळाले तर कामाला लागा, सुप्रिया सुळेंचा टोला

By राजू इनामदार | Updated: January 21, 2025 16:34 IST

जनतेने बहुमताने निवडून दिले तरीही ते आधी मुख्यमंत्री निवड, त्यानंतर मंत्रीमंडळ निवड, मग खात्यांची निवड व आता पालकमंत्र्यांची निवड यावरून भांडतायेत

पुणे: या सरकारमधील भांडणे, नाराजी, मतभेद ऐकूनऐकून उबग आला आहे. इतके मोठे बहुमत जनतेने दिले आहे तर अशा गोष्टी सोडून कामाला लागा. त्यांना मला लोकांनी सेवा करण्यासाठी निवडून दिले आहे, तू तू मै मै करण्यासाठी नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला लगावला. देशातील हे राज्य सरकार घटनेत नसलेली पदे निर्माण करण्यात पहिला क्रमांक मिळवणारे आहे असे त्या म्हणाल्या.

पुण्यात पत्रकारांबरोबर बोलताना पवार यांनी सरकारवर बरेच ताशेरे जोडले. मुख्यमंत्री दावोस ला आहेत, ते आले की त्यांची भेट घेणार व त्यांना शेतकरी, महागाई, बेरोजगारी यावर तुम्ही काम करणार आहात की नाही अशी विचारणा त्यांना करणार आहे असे त्यांनी सांगितले. राज्यातील जनतेने त्यांना फार मोठे बहुमत दिले. तरीही ते आधी मुख्यमंत्री निवड, त्यानंतर मंत्रीमंडळ निवड, मग खात्यांची निवड व आता पालकमंत्र्यांची निवड यावरून भांडत आहेत. दोन महिने होत आले अजून सरकार कामाला लागायला तयार नाही. या सगळ्याचा उबग आला आहे, लोकांनी धोरण ठरवण्यासाठी, देशाची सेवा करण्यासाठी निवडून दिले आहे, ना की भांडणांसाठी, सरकारनेच आता मागील दोन महिन्यात कोणते धोरण ठरवले, काय निर्णय घेतला याची माहिती द्यावी असे सुळे म्हणाल्या.

या सरकारने मागील सरकारची एक निविदा रद्द केली. त्यांचेच त्यावेळी होते, मग त्यांना निविदा का रद्द करावी लागली? याची चौकशी करावी लागेल. हार्वेस्टर मध्ये शेतकऱ्यांचे पैसे कोणी खाल्ले? याचीही विचारणा मुख्यमंत्ऱ्यांकडे करणार आहे असे सुळे यांनी सांगितले. बीड चे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांना जबाबदारी दिली, आता तिथली स्थिती सुधारेल का? या प्रश्नावर त्यांनी , प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया द्यायला हवी असे नाही. काही दिवस वाट तर बघू असे उत्तर दिले.

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस