शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

सरकारमधील भांडणे, नाराजीचा आला उबग; बहुमत मिळाले तर कामाला लागा, सुप्रिया सुळेंचा टोला

By राजू इनामदार | Updated: January 21, 2025 16:34 IST

जनतेने बहुमताने निवडून दिले तरीही ते आधी मुख्यमंत्री निवड, त्यानंतर मंत्रीमंडळ निवड, मग खात्यांची निवड व आता पालकमंत्र्यांची निवड यावरून भांडतायेत

पुणे: या सरकारमधील भांडणे, नाराजी, मतभेद ऐकूनऐकून उबग आला आहे. इतके मोठे बहुमत जनतेने दिले आहे तर अशा गोष्टी सोडून कामाला लागा. त्यांना मला लोकांनी सेवा करण्यासाठी निवडून दिले आहे, तू तू मै मै करण्यासाठी नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला लगावला. देशातील हे राज्य सरकार घटनेत नसलेली पदे निर्माण करण्यात पहिला क्रमांक मिळवणारे आहे असे त्या म्हणाल्या.

पुण्यात पत्रकारांबरोबर बोलताना पवार यांनी सरकारवर बरेच ताशेरे जोडले. मुख्यमंत्री दावोस ला आहेत, ते आले की त्यांची भेट घेणार व त्यांना शेतकरी, महागाई, बेरोजगारी यावर तुम्ही काम करणार आहात की नाही अशी विचारणा त्यांना करणार आहे असे त्यांनी सांगितले. राज्यातील जनतेने त्यांना फार मोठे बहुमत दिले. तरीही ते आधी मुख्यमंत्री निवड, त्यानंतर मंत्रीमंडळ निवड, मग खात्यांची निवड व आता पालकमंत्र्यांची निवड यावरून भांडत आहेत. दोन महिने होत आले अजून सरकार कामाला लागायला तयार नाही. या सगळ्याचा उबग आला आहे, लोकांनी धोरण ठरवण्यासाठी, देशाची सेवा करण्यासाठी निवडून दिले आहे, ना की भांडणांसाठी, सरकारनेच आता मागील दोन महिन्यात कोणते धोरण ठरवले, काय निर्णय घेतला याची माहिती द्यावी असे सुळे म्हणाल्या.

या सरकारने मागील सरकारची एक निविदा रद्द केली. त्यांचेच त्यावेळी होते, मग त्यांना निविदा का रद्द करावी लागली? याची चौकशी करावी लागेल. हार्वेस्टर मध्ये शेतकऱ्यांचे पैसे कोणी खाल्ले? याचीही विचारणा मुख्यमंत्ऱ्यांकडे करणार आहे असे सुळे यांनी सांगितले. बीड चे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांना जबाबदारी दिली, आता तिथली स्थिती सुधारेल का? या प्रश्नावर त्यांनी , प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया द्यायला हवी असे नाही. काही दिवस वाट तर बघू असे उत्तर दिले.

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस