शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

विद्युतपंपांचे वीजजोड कट केल्याने असंतोष, ३० हजार एकरांवरील ऊसशेती अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 1:07 AM

केडगाव : दौंड तालुक्यातील नदीकाठच्या गावातील थकबाकीपोटी सर्व विद्युतपंपांचे वीजजोड महावितरणने तोडले आहेत.

केडगाव : दौंड तालुक्यातील नदीकाठच्या गावातील थकबाकीपोटी सर्व विद्युतपंपांचे वीजजोड महावितरणने तोडले आहेत. यामध्ये एकूण तीन हजार वीजजोड बंद केल्याने दौंड तालुक्यातील एकूण ३० हजार एकर क्षेत्रातील ऊसपीक जळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात शेतक-यांना कसलीही पूर्वसूचना न देता घाईघाईने महावितरणने ही कारवाई सुरू केली असल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे.नदीकाठच्या पारगाव व नानगावचे वीजजोड गेल्या दोन दिवसांपासून बंद करण्यात आले आहेत. लवकरच राहू, पिंपळगाव, देलवडी, हातवळण, कानगाव, उंडवडी, सोनवडी या गावातील विद्युतपंपांवर कारवाई करण्यात येणार आहे. या गावांतील लाखो रुपयांचे वीजबिल थकल्याने ही कारवाई केल्याचे समजते.शासनाकडून कर्जमाफीप्रमाणे वीजबिल माफ होईल, या आशेने अनेक शेतक-यांनी आपली वीजबिले भरली नव्हती. दोन दिवसांपूर्वी केडगाव येथील विभागीय कार्यालयात वीजजोड बंद करण्याचा संदेश येताच महावितरणने लगबगीने कारवाई करण्यास सुरुवात केली. यावर्षी १४ आॅक्टोबरपर्यंत मुबलक पाऊस होता. त्यामुळे गेले दोन, तीन महिने अनेक शेतक-यांनी आपले विद्युतपंप बंद ठेवले होते. पाऊस उघडल्यानंतर गेल्या आठवड्यात बहुतांशी विद्युतपंप सुरू करण्यात आले होते. महावितरणने कारवाईसुरू करताच शेतकºयांची तारांबळ उडाली आहे.यासंदर्भात पारगावचे शेतकरी सुभाष बोत्रे म्हणाले, की सहा महिन्यांपासून आमच्या विद्युतपंपांना कसलेही बिल महावितरणकडून आले नाही. बिल आले नसल्याने एकूण किती पैसे भरायचे, याची माहिती शेतकºयांना नाही. विशेष म्हणजे हा वीजजोड बंद करताना सर्व शेतकºयांना लेखी सूचना देणे गरजेचे होते. आमचे वीजजोड पूर्ववत सुरू न केल्यास शेतकºयांच्या वतीने आंदोलन केले जाईल.महावितरणचे केडगाव शाखा अभियंता एम. के. पिसाळ म्हणाले, की आम्हाला वरिष्ठांकडून थकबाकीदारांचे वीजजोड बंद करण्याचे आदेश आले आहेत. त्यानुसार कार्यवाही चालू आहे. ज्या शेतकºयांना वीजबिल मिळालेनाही, त्यांनी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, आपले वीजबिल भरून टाकावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यातआले आहे.>इंदापूरला १,१०० कृषिपंपांची बत्ती गुलभिगवण : महावितरण तुमचा बळीराजावर भरोसा नाय काय! असे म्हणण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. महावितरणने आता थकबाकीदार शेतकºयांची इंदापूर विभागातील ८०० रोहित्रे व वालचंदनगर विभागातील २९९ रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे शेतकºयांची एकच तारांबळ उडाली आहे. तीन, चार वर्षे दुष्काळी परिस्थितीला तोंड देत असताना आता कुठे चांगल्या पावसामुळे दिलासा मिळतो ना मिळतो तोच महावितरण शेतीचे पाणी बंद करीत आहे. त्यामुळे तोंडचा घास काढून घेतल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.इंदापूर तालुक्यातील भिगवण, तक्रारवाडी, मदनवाडी, पोंधवडी, भादलवाडी येथील तलाव तीन-चार वर्षांपासून कोरडेठाक पडलेले आहेत. त्यामुळे पिण्यासाठी पाणी पुरविताना नाकीनऊ आले होते. शेतातील पिके जळून गेली होती. तलावात पाणी नसतानासुद्धा वीजबिल मात्र नियमितयेत होते.यावर्षी शेतातून चार पैैसे मिळतील व थकबाकी कमी होईल, असे वाटत असतानाच वीज बंद करून महावितरणने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली आहे.

टॅग्स :Puneपुणे