शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

असुरक्षित ऊसवाहतुकीकडे डोळेझाक

By admin | Updated: February 28, 2015 02:20 IST

ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर, ट्रक जात असल्यास प्रमाणाहून अधिक भरलेला ऊस कधीही ढासळणे, तोल गेल्याने संपूर्ण ट्रॅक्टर पलटी होण्याचे प्रकार सध्या

अंकुश जगताप, पिंपरीऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर, ट्रक जात असल्यास प्रमाणाहून अधिक भरलेला ऊस कधीही ढासळणे, तोल गेल्याने संपूर्ण ट्रॅक्टर पलटी होण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. परिणामी ट्रॅक्टर, ट्रकपासून इतरांना जीव मुठीत घेऊनच मार्ग काढण्याची वेळ येत आहे. वाहतूक नियम धाब्यावर बसवून चालकांकडून बेदरकारपणे ऊसवाहतूक केली जात आहे. याकडे वाहतूूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असून, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडूनही याबाबत ठोस उपाययोजना होत नसल्याचे उघड झाले आहे. मोठी दुर्घटना झाल्यावरच जाग येणार का, असा प्रश्न चालकांमधून उपस्थित होत आहे. परिसरामध्ये श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यासह लगतच्या इतर साखर कारखान्यांसाठी कार्यक्षेत्रातील मावळ, मुळशी, हवेली, खेड, आंबेगाव, जुन्नर आदी तालुक्यांमधील शेतकऱ्यांच्या उसाचा पुरवठा केला जातो. हा ऊस नेताना संबंधित वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. मोटार व्हेईकल अ‍ॅक्टनुसार ट्रॅक्टर ते ट्रॉलीची लांबी १८ मीटर ठेवणे बंधनकारक असताना दोन ट्रॉली जोडण्याचा धोका पत्करला जात आहे. ट्रॉली व ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जादा ऊस लादला जात आहे. त्यामुळे अ‍ॅक्सल, पाटे तुटणे, चाक निखळण्याचे प्रकार होतात. ऊस बाहेर पडू नये यासाठी ट्रॉलीला बाजूने जोडावयाच्या लोखंडी डांबांचा अभाव दिसतो. तात्पुरते लाकडी खांब लावून ऊस रचला जात आहे. त्यामुळे हादरे बसून ढिला झालेला ऊस बहुधा रस्त्यावर ढासळतो. अनेकदा ऊस एका बाजूला कलल्यामुळे (विशेषत: चढणीच्या, खड्डेमय रस्त्यांवर) ट्रॅक्टर पलटी होण्याचे प्रकार वाढत आहे. त्यातच ट्रॅक्टरला एकामागे एक जोडलेल्या ट्रॉलीला मागील बाजूस इंडिकेटर नसतात. एखाद्या वळणावर, महामार्गावर ट्रॅक्टर अचानक वळविला जातो. अशा वेळी काहीच न कळल्याने मागून येणाऱ्यांना अपघाताचा धोका नित्याचा झाला आहे. याकडे वाहतूक पोलीस, तसेच परिवहन प्रशासनाने आजवर गांभीर्याने पाहिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी ही वाहने रस्त्यावरून धोक्याची घंटा वाजवीत बिनदिक्कत धावत आहेत. अशा वाहनचालकांसाठी खास प्रशिक्षण देणे, वेळोवेळी मार्गदर्शनपर व्याख्यानांच्या आयोजनाबरोबरच प्रसंगी दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. देशभरातील रस्तेवाहतूक सुरक्षा मोहीम यशस्वी ठरण्यासाठी शेतकऱ्यांचे नुकसानही होणार नाही असा सुवर्णमध्य साधत मार्ग काढण्याची गरज व्यक्त होत आहे.