शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

जुन्नरच्या मुथाळणे गावात भीषण परिस्थिती; आदिवासी बांधव गढूळ पाणी पितायेत गाळून, १५ दिवसात पाण्याचा टँकरच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 18:11 IST

आदिवासी माता भगिनींचा जीव आता पाणी मिळविण्यासाठी मेटाकुटीला आला

अशोक खरात 

खोडद : जुन्नर तालुक्यातील मुथाळणे गावच्या गावठाणवाडीत मागील १५ दिवसांपासून पाण्याचा टॅंकर आला नाही. यामुळे या आदिवासी माता भगिनींचा जीव आता पाणी मिळविण्यासाठी मेटाकुटीला आला आहे. खडकाच्या झिऱ्यातून येणारे थेंब थेंब पाणी वाटी वाटीने भरून घ्यायचे आणि  हंडा भरायचा अशी कसरत या महिलांना करावी लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी या ग्रामस्थांना रात्रभर ताटकळत राहावे लागत आहे.

या गावठाणवाडीत सुमारे १५ दिवसांपूर्वी पाण्याचा टॅंकर आला होता पण त्यानंतर पुन्हा आजपर्यंत टॅंकर आला नसल्याने येथील आदिवासी बांधवांचे अतोनात हाल झाले आहेत. या आदिवासी बांधवांना कोणी वाली आहे की नाही असा प्रश्न आता व्यक्त केला जात आहे. या गावठाणवाडी मध्ये सुमारे ३५ कुटुंब वास्तव्य करत आहेत. पाणी मिळविण्यासाठी खडकातून येणाऱ्या झिऱ्याचा वापर केला जातो. राहत्या घरापासून सुमारे एक किलोमीटर भर पायपीट करून या ठिकाणी येऊन वाटी वाटी भरून पाणी घेतले जाते. हे पाणी मिळविण्यासाठी पहाटे ३ वा.नंबर लावले जातात तर काही जण रात्रभर या ठिकाणी झोपायलाच येतात. रात्रीच्या वेळी या ठिकाणी पाण्यासाठी नंबर लावायचा आणि जवळच शेकोटी करून तिथेच झोपायचं आणि नंबर आला की पाणी मिळवायचं असा हा या ग्रामस्थांचा जणू दिनक्रमच झाला आहे. पहाटे ३ वा.जर पाणी भरण्यासाठी नंबर लावल्यानंतर दुपारी २ ते अडीचच्या दरम्यान नंबर येतो अशी परिस्थिती आहे. कधी कधी पाण्यासाठी लावलेल्या नंबर वरून महिलांची भांडणं देखील होतात.

मुले नोकरीनिमित्त बाहेरगावी 

मुथाळणे , कोपरे , मांडवे , जोशीची वाडी , पुताची वाडी या परिसरातील तरुण मुलं नोकरीनिमित्त पुणे , मुंबई ,नाशिक यासारख्या ठिकाणी बाहेर गावी स्थायिक आहेत. घरी वयोवृद्ध आई वडील असतात. त्यांना विशेषतः पाण्यासाठी या उतरत्या वयात पाण्यासाठी पायपीट करावी लागते. ज्या वयात आराम करण्याची गरज आहे. त्या वयात पाण्यासाठी करावा लागणारा संघर्ष म्हणजे खेदजनक आणि दुर्दैवी आहे.

पाण्यासाठी संघर्ष अत्यंत खेदजनक बाब 

या भागात दरवर्षी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य मोठ्या प्रमाणात जाणवते पण या समस्येवर शाश्वत उपाययोजना न करता पाण्याचा टॅंकर देऊन तात्पुरत्या स्वरूपात ही समस्या सोडवली जाते.मागील अनेक वर्षांपासून म्हन्हे अगदी स्वातंत्र्य पूर्व काळापासून या भागातील आदिवासी बांधवांना पाण्यासाठी दरवर्षी संघर्ष करावा लागत आहे ही खेदजनक बाब आहे.

गढूळ व शेवाळ आलेलं पाणी गाळून पितात 

पाणी ही मूलभूत गरज व हक्क आहे, तरी देखील जुन्नर तालुक्यातील  या दुर्गम भागातील अनेक आदिवासी बांधवांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. एकीकडे आपण फिल्टर आणि बाटली मधलं पाणी पितो आणि एकीकडे हे लोक गढूळ व शेवाळ आलेलं पाणी गाळून पितात , हा विरोधाभास आणखी किती दिवस पाहायला मिळणार आहे ? हा मन विषण्ण करणारा प्रश्न आहे.

टॅग्स :Junnarजुन्नरWaterपाणीRainपाऊसGovernmentसरकार