शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नियतीनेही त्यांचं अतूट प्रेम मान्य केलं! पत्नीच्या निधनानंतर अवघ्या एक तासानंतर पतीनेही घेतला जगाचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 22:11 IST

कांताबाई यांच्यासाठी त्यांचे पती हे सर्वस्व होते. त्यामुळे त्यांनी प्रत्येक सुख दुःखात त्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभ्या राहिल्या.

पुणे: आयुष्यभरासाठी जर पती आणि पत्नी म्हणून सोबत प्रवास करायचा 'पण' केला असेेेल तर मग नात्यात प्रेम, जिव्हाळा पेरावाच लागतो. कष्ट, संघर्ष, मेहनत यांनी संकटांशी झुंजावंच लागते. हे सारं जमलं की, एकमेकांच्या श्वासांची देखील दिलजमाई होऊन जाते. अशाच एका पुण्यातील जोडप्याने अवघ्या एका तासांच्या अवधीने जगाचा निरोप घेतला. 

खडकवासला परिसरात राहणाऱ्या दिनकर पांडुरंग दणाणे (वय ७५) आणि कांताबाई दिनकर दणाणे (वय ६९) असे निधन झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे. अतिशय साधी राहणीमान,  मनमिळाऊ, बोलका स्वभाव यामुळे असलेल्या या जोडप्याच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

मूळ सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथून १९७२ च्या दुष्काळी परिस्थितीत कामाच्या शोधत ह्या जोडप्याने पुणे गाठले अन् ते कायमचेच पुणेकर झाले.

कांताबाई यांच्यासाठी त्यांचे पती हे सर्वस्व होते. त्यामुळे त्यांनी प्रत्येक संकटात आणि निर्णयावेळी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. पतीच्या आजारपणात देखील त्यांनी पूर्ण काळजी घेतली. अत्यवस्थ झालेल्या पतीच्या अगोदर कांताबाई यांनी मृत्यूला कवटाळले आणि आयुष्यभर एकजीवाने राहीलेल्या पती-पत्नीने अंतिम प्रवासही सोबतच केला. 

दिनकर दणाणे यांना केंद्रीय जल विद्युत संशोधन केंद्रात कामाला होते. त्यांनी दोन मुले आणि एका मुलीचे आयुष्य घडवले. 

केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्रामधून २००६ साली सेवानिवृत्ती स्वीकारलेल्या दिनकर यांना अगोदर मधुमेह होता. त्यानंतर त्यांची किडनी आणि लिव्हर निकामी झाले. २५ मार्च रोजी डॉक्टरांनी दणाणे यांची मुले आणि पत्नी यांना सांगितले की, ते चोवीस तासांपेक्षा जास्त काळ जगणार नाहीत. डॉक्टरांचे शब्द ऐकून कांताबाई व्यथित झाल्या. मुलांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु २५ मार्चला सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कांताबाई यांना तीव्र स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यानंतर अवघ्या एक तासाच्या आत दिनकर दणाणे यांनीही प्राण सोडला.

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूrelationshipरिलेशनशिपFamilyपरिवार