शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
7
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
8
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
9
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
10
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
11
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
12
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
13
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
14
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
15
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
17
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
18
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
19
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी

उपमुख्यमंत्र्यांचे पत्र की गृहमंत्र्यांची शिफारस वरचढ ठरणार? निवासी उपजिल्हाधिकारी बदलीची जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 20:00 IST

राज्य शासनाने 31 जुलैपर्यंत प्रशासकीय बदल्या करण्यास परवानगी दिल्याने पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी बदलीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

पुणे : राज्य शासनाने 31 जुलैपर्यंत प्रशासकीय बदल्या करण्यास परवानगी दिल्याने पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी बदलीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका निकटवर्तीय अधिकाऱ्याला पत्र दिले आहे. तर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी देखील एका अधिकाऱ्यांची शिफारस केली आहे. जिल्हयात प्रामुख्याने बहुतेक सर्व महत्त्वाच्या पदांवर पवार यांच्या मर्जीतील अधिका-यांची नियुक्ती होते. पण आता निवासी उपजिल्हाधिकारी पदासाठी वळसे-पाटील यांनी देखील शिफारस केल्याने कोण वरचढ ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

शासनाच्या वतीने दर वर्षी एप्रिल-मे महिन्यात प्रशासकीय बदल्या केल्या जातात. परंतु गत वर्षी कोरोनामुळे प्रशासकीय बदल्या झाल्या नाही. मात्र जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी बहुतेक सर्व वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात ऑगस्ट महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांसह नंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, कुळ कायदा शाखेचे उपजिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे चिटणीस अशी अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात काही अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य व मुदतपूर्व देखील बदल्या झाल्या. याचवेळी आरडीसी बदलाची देखील चर्चा होती. परंतु कटारे यांचा कार्यकाळ पूर्ण झाला नसल्याने ही बदली टळली होती. आता कटारे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने आरडीसी बदलीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.  यामध्ये कटारे यांना मुदतवाढ मिळणार का की नवीन अधिकारी कोण येणार याबाबत चर्चा सुरू आहे. 

नवीन आरडीसी म्हणून संजीव देशमुख,संजय पाटील, सुनील थोरवे यांच्यासह ज्योती कदम या अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा होती. परंतु यात अजित पवार यांनी सध्या मुद्रांक शुल्क विभागात कार्यरत असलेले बारामती तालुक्यात व खेड प्रांत म्हणून काम केलेल्या हिंमत खराडे यांना पत्र दिले आहे. तर वळसे-पाटील यांनी त्याच्या जवळचे व जुन्नर तालुक्यातील सध्या सातारा आरडीसी असलेले सुनील थोरवे यांची शिफारस केली आहे. 

या सर्व अधिकाऱ्यांनी पुणे जिल्ह्यात तहसिलदार, उपजिल्हाधिकारी म्हणून चांगले काम केले आहे. यामुळे या सर्व अधिकाऱ्यांना जिल्ह्याची सर्व माहिती असून, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाजाचा अनुभव देखील आहे. यामुळे आता नक्की कोण येणार हे बदली नंतरच स्पष्ट होईल.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारDilip Walse Patilदिलीप वळसे पाटील