शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2024 20:10 IST

'शेवटपर्यंत मला जे काही सांगितलं गेलं, तेच मी ऐकलं, कुठही कमी पडलो नाही. साहेब फॉर्म भरुन जायचे अन् शेवटच्या सभेला यायचे. आपण सगळी काम करायचो.'

बारामती- महायुतीत सहभागी झाल्याच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भाष्य केेले. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, सरकारच्या बाहेर राहिलो असतो तर आंदोलन, उपोषण, मोर्चा इतकच करायला लागले असते. मागे शिवसेनेसोबत जायला सांगितले, आपण गेलो. भाजपलाही बाहेरून पाठिंबा दिला. त्यांच्या कारकिर्दीत ते जे म्हणतील, ते सर्व केले. मुख्यमंत्रीपददेखील आपण काँग्रेसला दिले. जे जे सांगितलं, ते ते सगळं ऐकलं, पण आता भावनिक व्हायच नाही, अशी टीका यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली.

शिर्सुफळ (ता. बारामती) येथील मेळाव्यात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, बारामती लोकसभा  निवडणूक भावनिक बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना बारामती व माढा दोन्ही  लोकांनी निवडून दिले. त्यांनी राज्यसभेवर जायचा निर्णय घेतला. त्यानंतर पक्ष तुम्ही चालवा असे त्यांनी सांगितले. आम्ही त्यालाही मान्यता दिली. नंतर काही घटना घडल्या, कुणी काय निर्णय घ्यावा हा ज्यांचा त्यांचा अधिकार आहे. शेवटपर्यंत मला जे काही सांगितलं गेलं, तेच मी ऐकलं. कुठही कमी पडलो नाही. साहेब फॉर्म भरुन जायचे. शेवटच्या सभेला यायचे आणि आपण सगळे काम करायचो.

मात्र, आज परिस्थिती बदलली आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. जर तुमच्याकडे फक्त राज्याचाच निधी येणार असेल केंद्राचा निधी येणारच नसेल तर विकास कसा होणार. जर विरोधातील खासदार असेल तर निधी मिळत नाही. अनेक मोठ्या प्रकल्पांना मार्गी लावताना केंद्राची मदत घ्यावीच लागते. त्या साठी महायुतीच्या विचाराचा खासदार व्हायला हवा, असे पवार म्हणाले.

काहीजण माझी सभा झाली की समोरच्या लोकांकडे जातात, पदे मी देवून त्यांचा प्रचार करतात. त्यांनी कोणाच एकाचेच कुंकु लावावे. हा काय चावटपणा लावलाय, हे झाकुन राहत नाही. जर माझ्याबाबत काही चुूक झाल्यास त्यांनी माझ्या घराची पायरी चढायची नाही, असा इशारा दोन्हीकडे संपर्क ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवार यांनी दिला.

शिर्सुफळ येथील भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पुर्वीच्या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभुमीवर वक्तव्य केले. ते म्हणाले,काही वर्षांपुर्वी चुकून ते वक्तव्य माझ्या तोंडातून गेले, त्याचा फार मोठा फटका मला बसला. त्यावेळी जे वाक्य मी वापरले होते, त्यातून मला उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ते व्हापासून मी माझ्या मेंदूला शब्द जपुन वापरायचे आहेत, असे सातत्याने सांगतो, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा