शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

राज्यकर्त्यांच्या दुर्लक्षित दृष्टीकोनामुळे संघटित कामगारांमध्ये नैराश्य : शरद पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 19:08 IST

आताचा कामगार असहाय्य झाला असून, केवळ नोकरी गमवावी लागेल या भीतीने तो गप्प आहे. कधीतरी त्याचे स्वत:वरील नियंत्रण सुटेल. तेव्हा मात्र,

ठळक मुद्देसरकारच्या कामगिरीविरोधात करतील परिवर्तन 

पुणे : कामगार संघटनांच्या मागण्यांकडे राज्यकर्ते ढुंकुनही पाहत नसल्याने राज्यातील संघटित कामगारांमध्ये नैराश्य पसरलेले आहे. लोकशाहीने दिलेला अधिकार योग्यपणे कसा बजवायचा याची कामगारांची मानसिकता झाली आहे. याचा अर्थ लोकांच्या मनात काहीतरी वेगळेच दिसतेय, असे निरीक्षण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी नोंदविले. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या वतीने गुलटेकडी येथील निसर्ग मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. माजी मंत्री जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, आमदार अरुण जगताप, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यावेळी उपस्थित होते. पवार म्हणाले, मी अनेक निवडणुका पाहिल्या मात्र यावेळची निवडणूक वेगळी आहे. अनेक संस्थात्मक संघटना बैठका घ्यायला सांगतात. त्यावेळी ते परिवर्तनाची भाषा करताना दिसतात. आजचे राज्यकर्ते आमच्याकडे ढुंकुनही पाहत नाहीत. अगदी भेटायला देखील सहा महिने ते वर्षांचा कालावधी लागतो, असे कामगार बोलून दाखवतात. राज्य मार्ग परिवहन विभागाची संघटना असो की प्राथमिक शिक्षकांची त्यांच्या मनात हीच भावना झाली आहे. संबंध महाराष्ट्रातील संघटित कामगारांमध्ये नैराश्य दिसून येत आहे. आता, लोकशाहीने दिलेला अधिकार योग्य पद्धतीने बजवायचा अशी त्यांची मानसिकताही दिसून येत आहे. राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी कामगारांचे सहा महिन्यांहून अधिक काळ वेतन दिलेले नाही. कारखाना अडचणीत असेल तर तो काही काळ तग राहू शकतो. त्याला विविध मागार्ने मदत करता येते. मात्र, कामगार इतका काळ कसा थांबणार. एखादा कारखाना कामगारांकडे माणूसकीने बघणार नसेल, तर आपणही संबंधित कारखान्यांच्या धुरिणांकडे विश्वासाने पाहू नये. अनेक कारखान्यांची स्थिती चांगली असतानाही त्यांची कामगारांची देणी देण्याची मानसिकता दिसून येत नाही. हे बरोबर नाही. भीमा पाटस, फलटण शुगरसह अशा कारखान्यांची यादी तयार करण्याची सूचना पवार यांनी या वेळी केली. -------------तर कामगारांचे नियंत्रण जाईल जवळपास ४० वर्षांपुर्वी मुंबईत गिरणी कामगारांचे संप नेहमीचेच असत. आता मात्र, संपाचे मनोधैर्य राहिलेले नाही. आताचा कामगार असहाय्य झाला असून, केवळ नोकरी गमवावी लागेल या भीतीने तो गप्प आहे. कधीतरी त्याचे स्वत:वरील नियंत्रण सुटेल. तेव्हा मात्र, त्याची जबाबदारी कामगारावर राहणार नाही, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार या वेळी म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा