शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यकर्त्यांच्या दुर्लक्षित दृष्टीकोनामुळे संघटित कामगारांमध्ये नैराश्य : शरद पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 19:08 IST

आताचा कामगार असहाय्य झाला असून, केवळ नोकरी गमवावी लागेल या भीतीने तो गप्प आहे. कधीतरी त्याचे स्वत:वरील नियंत्रण सुटेल. तेव्हा मात्र,

ठळक मुद्देसरकारच्या कामगिरीविरोधात करतील परिवर्तन 

पुणे : कामगार संघटनांच्या मागण्यांकडे राज्यकर्ते ढुंकुनही पाहत नसल्याने राज्यातील संघटित कामगारांमध्ये नैराश्य पसरलेले आहे. लोकशाहीने दिलेला अधिकार योग्यपणे कसा बजवायचा याची कामगारांची मानसिकता झाली आहे. याचा अर्थ लोकांच्या मनात काहीतरी वेगळेच दिसतेय, असे निरीक्षण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी नोंदविले. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या वतीने गुलटेकडी येथील निसर्ग मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. माजी मंत्री जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, आमदार अरुण जगताप, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यावेळी उपस्थित होते. पवार म्हणाले, मी अनेक निवडणुका पाहिल्या मात्र यावेळची निवडणूक वेगळी आहे. अनेक संस्थात्मक संघटना बैठका घ्यायला सांगतात. त्यावेळी ते परिवर्तनाची भाषा करताना दिसतात. आजचे राज्यकर्ते आमच्याकडे ढुंकुनही पाहत नाहीत. अगदी भेटायला देखील सहा महिने ते वर्षांचा कालावधी लागतो, असे कामगार बोलून दाखवतात. राज्य मार्ग परिवहन विभागाची संघटना असो की प्राथमिक शिक्षकांची त्यांच्या मनात हीच भावना झाली आहे. संबंध महाराष्ट्रातील संघटित कामगारांमध्ये नैराश्य दिसून येत आहे. आता, लोकशाहीने दिलेला अधिकार योग्य पद्धतीने बजवायचा अशी त्यांची मानसिकताही दिसून येत आहे. राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी कामगारांचे सहा महिन्यांहून अधिक काळ वेतन दिलेले नाही. कारखाना अडचणीत असेल तर तो काही काळ तग राहू शकतो. त्याला विविध मागार्ने मदत करता येते. मात्र, कामगार इतका काळ कसा थांबणार. एखादा कारखाना कामगारांकडे माणूसकीने बघणार नसेल, तर आपणही संबंधित कारखान्यांच्या धुरिणांकडे विश्वासाने पाहू नये. अनेक कारखान्यांची स्थिती चांगली असतानाही त्यांची कामगारांची देणी देण्याची मानसिकता दिसून येत नाही. हे बरोबर नाही. भीमा पाटस, फलटण शुगरसह अशा कारखान्यांची यादी तयार करण्याची सूचना पवार यांनी या वेळी केली. -------------तर कामगारांचे नियंत्रण जाईल जवळपास ४० वर्षांपुर्वी मुंबईत गिरणी कामगारांचे संप नेहमीचेच असत. आता मात्र, संपाचे मनोधैर्य राहिलेले नाही. आताचा कामगार असहाय्य झाला असून, केवळ नोकरी गमवावी लागेल या भीतीने तो गप्प आहे. कधीतरी त्याचे स्वत:वरील नियंत्रण सुटेल. तेव्हा मात्र, त्याची जबाबदारी कामगारावर राहणार नाही, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार या वेळी म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा