शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

सहा गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेसाठी ५६२ कोटींची मागणी

By राजू हिंगे | Updated: February 11, 2025 11:31 IST

महापालिकेची राज्य सरकारकडे मागणी : प्रकल्पासाठी ५१५ कोटींचा खर्च

११ एकरच्या भूसंपादनासाठी ४७ कोटी रुपये

पुणे : पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट ३४ गावांपैकी खडकवासला, धायरी, किरकटवाडी, नांदोशी, नांदेड, सणसवाडी या गावांमध्येच गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजाराचे रुग्ण आढळले आहेत. दूषित पाण्यामुळेच हा आजार झाला आहे. त्यामुळे या गावासाठी जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याच्या टाक्यांसह पाणीपुरवठा योजनांसाठी ५६२ कोटी रुपयांची गरज आहे. या कामासाठी हा निधी राज्य सरकारने पुणे महापालिकेला द्यावा, अशी मागणी पुणे महापालिकेने राज्य सरकारकडे केली आहे.

सिंहगड रस्ता परिसरातील नांदेड, किरकटवाडी, नांदोशी, धायरी, डीएसके विश्व, आंबेगाव या गावांमध्ये गुइलेन बॅरी सिंड्रोमचे (जीबीएस) रुग्ण मोठ्या संख्येने आढळले होते. त्यानंतर महापालिकेच्या विहिरीतील पाण्याची तपासणी केल्यानंतर पाणी दूषित नसल्याची माहिती पुढे आली होती. या गावांना पुणे महापालिका रॉ- वॉटरचा पाणीपुरवठा करत आहे. या सहा गावांमध्ये सद्य:स्थितीमध्ये सुमारे ३० एमएलडी पाणीपुरवठा करत आहे. त्यापैकी २८ एमएलडी पाणी रॉ-वॉटर देण्यात येत आहे. त्यामुळे या भागासाठी पुणे महापालिकेने सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला आहे.

या गावची २०२४ ची लोकसंख्या १ लाख ७८ हजार २८७ आहे. या गावाची २०५२ ची लोकसंख्या अंदाजे ४ लाख २७ हजार आहे. या भागाची सध्याची पाण्याची मागणी ही ३३ एमएलडी असून, २०५२मध्ये ही मागणी ८९ एमएलडी होणार आहे. त्यामुळे या सहा गावांसाठी समान पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. यामध्ये खडकवासला येथे जलशुद्धीकरण प्रकल्प, २९ पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी ५६२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पण, सद्य:स्थितीमध्ये पुणे महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता हा खर्च करणे शक्य होणार नाही. त्यामुळे या गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी पालिकेला प्रकल्पासाठी ५१५ कोटी आणि भूसंपादनासाठी ४७ कोटी रुपयांची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीwater shortageपाणीकपातwater transportजलवाहतूकMuncipal Corporationनगर पालिका