शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

जनाईच्या भुसंपादनाचा मोबदला मिळण्याची मागणी;अन्यथा शेतकरी आंदोलनाच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 19:23 IST

पंधरा दिवसात दखल न घेतल्यास शेतकऱ्यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला

सुपे - गेली ३० वर्षापासुन राबविण्यात आलेल्या शासनाच्या जनाई उपसा जलसिंचन योजनेसाठी करण्यात आलेल्या भुसंपादनाचा मोबदला मिळण्याची मागणी करुनही अद्याप एकाही शेतकऱ्याला मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे येथील शेतकरी आक्रमक झाल्याने जलसंपदाविभागाने याबाबत पंधरा दिवसात दखल न घेतल्यास शेतकऱ्यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.सुपे येथील उपबाजार समितीच्या आवारात येथील शेतकरी संघर्ष कृती समितीची  वर्षपुर्तीच्या निमित्ताने लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. यावेळी भुसंपादनाचा मोबदला मिळाला नसल्याची चर्चा मोठ्याप्रमाणात झाली.  यावेळी कृषी समितीच्या वर्षपुर्तीच्यानिमित्ताने उपोषणास बसलेल्या पोपट खैरे, सचिन साळुंके, भानुदास बोरकर, प्रकाश काळखैरे आदींचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी परिसरातील लाभधारक शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.तसेच अधिकाऱ्यांनी कृती समितीचा १२ मागण्यांचा प्रस्ताव मंजुर करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात दोनच मागण्या पुर्ण केल्या असुन कृती समितीच्या इतर १० मागण्यांची पुर्तता शासनाने केली नसल्याचे कृती समितीचे अध्यक्ष पोपट खैरे यांनी सांगितले.त्यामुळे या बैठकीत शेतकरीवर्ग आक्रमक झालेला दिसुन आला. जनाईच्या पाणी पाझरामुळे पाणी मोठ्या प्रमाणात वायाला जाते. त्यामुळे टेलला असलेल्या काही गावांतील शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याने बंद पाईप लाईन राबविण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावर या समितीतील ज्ञानेश्वर कौले आणि विजय खैरे यांनी सविस्तर मार्गदर्शक केले.भुसंपादनाचे पैसे मिळाण्यासाठी शेतकरी जलसंपदा विभागाच्या कार्यालयात गेले असता त्यांना अधिकाऱ्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. गेली ३० वर्षापासुन जनाईचा कालवा, चाऱ्या आणि पोटचाऱ्यासाठी शेतकऱ्यांची जमीन संपादीत केलेली आहे. त्यावेळी संपादीत केलेल्या जमिनीचा मोबदला दिला जाईल असे अधिकाऱ्यांकडुन सांगण्यात आले होते. मात्र आत्ता याबाबत अधिकारी उडवा उडवीची उत्तरे देत आहेत.कृती समितीने उपोषण केल्यामुळे यावर्षी दोन्ही आवर्तनामधुन सुमारे ७०० एमसीएफटी पाणी मिळाले. त्यामुळे उन्हाळी आवर्तन सुद्धा त्वरीत मिळावे. तसेच ज्या गावांमध्ये या आवर्तनात पाणी मिळाले नाही अशा वंचित गावांना प्रथम प्राधान्याने पाणी सोडावे अशी मागणी संतोष काटे यांनी केली. यासंदर्भात कृती समितीच्यावतीने जलसंपदा विभागाला सोमवारी ( दि. ०३ ) लेखी स्वरुपात निवेदन देण्यात येणार आहे. यात १२ मागण्यांपैकी १० मागण्या अपुर्ण आहेत. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात उत्तर न दिल्यास लाभधारक शेतकऱ्यांकडुन आंदोलन छेडण्याचा इशारा कृती समितीच्यावतीने देण्यात आला आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAgriculture Schemeकृषी योजनाAgriculture Sectorशेती क्षेत्रMaharashtraमहाराष्ट्र