शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती मिळण्यास विलंब 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 13:24 IST

निकाल लागून दहा दिवसांहून अधिक कालावधी उलटून गेला. मात्र,अद्याप अनेक विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती मिळालेल्या नाहीत.

ठळक मुद्देराज्य मंडळाकडून विद्यार्थ्यांना छायांकित प्रती देण्याची सुविधा उपलब्ध ६ जुलैपर्यंत अर्ज केलेल्या ८० ते ९० टक्के विद्यार्थ्यांना येत्या गुरूवारपर्यंत प्रती

पुणे: इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागून दहा दिवसांहून अधिक कालावधी उलटून गेला. मात्र,अद्याप अनेक विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती मिळालेल्या नाहीत.पुणे विभागीय मंडळाला वेळेत शिक्षक उपलब्ध न झाल्याने हा विलंब होत असल्याचे मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.परंतु,छायांकित प्रती वेळेत मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी राज्य मंडळाच्या अधिकांकडे तक्रार केली.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र,भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र,गणित,जीवशास्त्र आदी विषयात विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले.त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने छायांकित प्रती मिळण्यासाठी अर्ज केला. विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी छायांकित प्रती मिळाव्यात यासाठी विद्यार्थ्यांनी राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ.शकुंतला काळे यांच्यासह पुणे विभागीय मंडळाचे सचिव बबन दहिफळे यांची भेट घेतली. मात्र, बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 29 मे रोजी छायांकित प्रतिसाठी अर्ज करूनही अद्याप अनेक विद्यार्थ्यांना अर्ज मिळाले नाहीत.बुधवारी दुपारी पुन्हा काही विद्यार्थ्यांनी शकुंतला काळे यांच्या भेट घेवून छायाकिंत प्रती लवकर देण्याची मागणी केली.नचिकेत वाघमारे,दिव्या भारती,वैष्णवी रेवसकर आदी विद्यार्थ्यांनी काळे यांची भेट घेतली.तसेच पुणे विभागीय मंडळाकडून छायांकित प्रती मिळण्यास विलंब होत आहे.त्यामुळे पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबत अडचणी येत आहेत.त्यामुळे छायांकित प्रती लवकर उपलब्ध करून द्याव्यात,अशी मागणी केली.------------राज्य मंडळाकडून विद्यार्थ्यांना छायांकित प्रती देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.त्यानुसार विभागीय मंडळांकडून लवकरात लवकर छायांकित प्रती देण्याबाबत आवश्यक कार्यवाही केली जात आहे.- डॉ.शकुंतला काळे,अध्यक्षा,महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ -----------------------------विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती देण्यापूर्वी संबंधित उत्तरपत्रिका शिक्षकांकडून तपासून घेतल्या जातात.मात्र,पुणे विभागीय शिक्षण मंडळाकडे वेळेत आवश्यक शिक्षक उपलब्ध होऊ शकले नाहीत.परतु,आता शिक्षक उपलब्ध झाले आहेत.त्यामुळे ६ जुलैपर्यंत अर्ज केलेल्या ८० ते ९० टक्के विद्यार्थ्यांना येत्या गुरूवारपर्यंत उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती मिळतील.विभागीय मंडळाकडे एकूण ५ हजार ६७८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून त्यातील ६९८ विद्यार्थ्यांच्या छायांकित प्रती तयार आहेत.त्यातील ४०८ विद्यार्थ्यांना छायांकित प्रती दिल्या असून १८२ विद्यार्थी प्रती घेवून गेले नाहीत.परंतु,गुरूवारी २ हजार ८०० ते ३ हजार विद्यार्थ्यांच्या छायांकित प्रती तयार होतील. - बबन दहिफळे,सचिव,पुणे विभागीय मंडळ 

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाResult Dayपरिणाम दिवसStudentविद्यार्थीEducationशिक्षण