शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच बैठकीत कर्जरोख्यांचा प्रस्ताव

By admin | Updated: March 31, 2017 03:35 IST

शहरासाठीच्या २४ तास पाणी योजनेसाठी महापालिकेचा कर्जरोखे काढण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सेबी तसेच

पुणे : शहरासाठीच्या २४ तास पाणी योजनेसाठी महापालिकेचा कर्जरोखे काढण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सेबी तसेच राष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्थांनी महापालिकेची आर्थिक तपासणी करून डबल प्लस ए असे मानांकन दिले असल्याचे स्पष्ट करून अंदाजपत्रक सादरीकरणात आयुक्तांनीच ते सूचित केले. सत्तेत नसताना योजनेच्या मंजुरीसाठी साह्य करणारी भारतीय जनता पार्टीच आता महापालिकेत स्पष्ट बहुमताने सत्तेत असल्याने स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीच्या विषयपत्रिकेवर प्रशासन हा विषय आणणार आहे. तब्बल ३ हजार ३३० कोटी रुपयांच्या या योजनेसाठी २ हजार ८६४ कोटी रुपयांचे कर्ज काढण्यात येणार आहे. उर्वरित निधी केंद्र सरकारची अमृत योजना व स्मार्ट सिटी यांच्याकडून उभा राहणार आहे. अंदाजपत्रक सादरीकरणानंतर पत्रकारांशी बोलताना आयुक्त कुणाल कुमार यांनी माहिती दिली. महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर, पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता व्ही. जी. कुलकर्णी या वेळी उपस्थित होते. या योजनेसाठी पाणीपट्टीत या वर्षी १५ टक्के व पुढील सलग ३० वर्षे दरवर्षी ५ टक्के याप्रमाणे वाढ योजनेला मंजुरी देतानाच करण्यात आली आहे. सेबी तसेच अन्य वित्तीय संस्थांनी उत्कृष्ट मानांकन दिल्यामुळे कर्जरोखे काढण्यात काही अडचण नाही .कर्जरोखे काढण्याची सर्व प्रक्रिया प्रशासनाने पूर्ण केली आहे. स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत हा विषय आणण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वसाधारण सभा व अंतिमत: राज्य सरकारची मान्यता मिळाली की कर्जरोखे काढण्यात येतील. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व मनसे यांचा कर्जरोखे काढण्याला विरोध आहे. काही स्वयंसेवी संस्था व संघटना यांनीही विरोध दर्शवला आहे. मात्र भारतीय जनता पार्टीचा योजनेला पाठिंबा आहे. मागील वर्षीच्या १२ टक्के, या वर्षीच्या १५ टक्के व पुढील सलग ३० वर्षांच्या ५ टक्के पाणीपट्टीवाढीसह आता ही योजना कर्जरोखे काढून प्रत्यक्षात आणण्यात येईल. (प्रतिनिधी)कर्ज काढायचे नाही म्हणून मोठ्या योजना आता केल्या नाहीत तर पुढे त्याचा खर्च वाढेल व त्या करताच येणार नाहीत. यासाठी आपली मानसिकता बदलली पाहिजे. पाणीपट्टी वसुलीचे खाते स्वतंत्र ठेवले जाणार आहे. त्यात जमा होणारी रक्कम अन्य कोणत्याही कामासाठी खर्च केली जाणार नाही. कर्जरोखे पैशांची जशी गरज लागेल त्याप्रमाणे काढले जाणार आहेत. उत्कृष्ट मानांकनामुळे स्वस्त दरात कर्ज उपलब्ध होणे सहज शक्य आहे. वार्षिक साधारण १४० कोटी रूपये काही वर्षे देणे असेल.