शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

नीरा येथील ज्युबिलंट कंपनीच्या विषारी वायू गळती दुर्घटनेमधील एका अधिकाऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 19:56 IST

बारामती व पुरंदर तालुक्याच्या सीमेवरील नीरा - निंबूत येथील ज्युबिलंट लाईफ सायन्सेस कंपनी मध्ये १७ एप्रिल २०१९ रोजी  वायू गळतीची  घटना घडली होती.

ठळक मुद्देवायू गळतीत ४८ कामगार बाधित वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

नीरा : बारामती व पुरंदर तालुक्याच्या सीमेवरील नीरा - निंबूत येथील ज्युबिलंट लाईफ सायन्सेस कंपनी मध्ये १७ एप्रिल २०१९ रोजी  वायू गळतीची  घटना घडली होती. त्यात ४८ कामगार बाधित झाले होते. त्यामध्ये अत्यवस्थ असलेल्या संजय जगन्नाथ ढवळे या अधिका-याचा मंगळवारी (दि.७)  रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पुणे येथील केईएम रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ही घटना नीरा व परिसरात वा-यासारखी पसरल्यामुळे नागरिकांमध्य भयावह वातावरण पसरले आहे.   नीरा नदीच्या काठावरील निंबुत - नीरा येथील घातक रसायन उत्पादन करणाऱ्या ज्युबिलंट लाईफ सायन्सेस कंपनीत १७ एप्रिल २०१९  रोजी अ‍ॅसीटिक अनहायड्राईड या टाकीतून विषारी वायू गळतीमुळे लोकांना डोळ्यात व फुफ्फुसात मोठ्या प्रमाणात वेदना झाल्याने सुमारे ४८ कामगार बाधित झाले होते. त्यापैकी अत्यवस्थ असलेल्या काही कामगारांना पुणे येथील केईएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यापैकी संजय जगन्नाथ ढवळे (वय- ५६) या अत्यवस्थ अधिका-याचा मंगळवारी (दि.७)  रात्री बारा  वाजण्याच्या सुमारास  पुणे येथील केईएम रूग्णालयात  उपचारा दरम्यान मुर्त्यु  झाला. ढवळे हे ज्युबिलंट कंपनीत लाजिस्टिक डिपार्टमेंटमध्ये सिनियर एक्झिक्युटीव्ह म्हणून कार्यरत होते. हल्ली ते ज्युबिलंट कंपनीच्या कॉलनीमध्ये राहत होते. ढवळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असून त्यापैकी एक विवाहित मुलगी, दोन भाऊ आहेत. लोणंद (ता. खंडाळा) या ढवळे यांच्या मूळ गावी त्यांच्यावर बुधवारी (दि.८) दुपारच्या सुमारास अंत्यविधी करण्यात आला. दरम्यान , ज्युबिलंट कंपनीमध्ये  वायुगळतीमुळे झालेल्या दुर्घटनेची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने  कंपनीला उत्पादन थांबविण्याचे आदेश दिले असून कंपनीने उत्पादन चालू ठेवले आहे कि नाही हे समजू शकले नाही. तसेच ज्युबिलंट कंपनीच्या दुर्घटनेमुळे अजूनही कंपनी परिसरातील नागरिकामध्ये भीतीचे वातावरण  आहे. घातक रसायने निर्माण करणा-या ज्युबिलंट कंपनीच्या विरोधात वेळोवेळी आंदोलने झाली आहेत. या आंदोलकांनी मागील दोन दिवसांपासून प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसह परिसरातील गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे. आंदोलकांचा न्यायालीन लढा सुरू असुन पुढील काळात आंदोलन तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे......      मानवी जीवास घातक रसायने भर लोकवस्तीत निर्माण केली जात आहेत.  वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेलो असता फॅक्टरी इन्स्पेक्टर यांचा अहवाल आल्यावर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले. मात्र, हा प्लैंट आजही सुरू असल्याने संताप व्यक्त करुन निषेध व्यक्त करत आहोत. हे युनिट त्वरीत बंद करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.- सचिन मोरे , नीरा नदी संघर्ष समिती, अध्यक्ष

 

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू