शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
3
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
4
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
5
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
6
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
7
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
8
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
9
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
10
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
11
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
12
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
13
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
14
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
15
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
16
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
17
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
18
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
19
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
20
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 

ज्येष्ठ जैन साध्वी विरागदर्शनाजी महाराज यांचे अहमदनगर येथे महानिर्वाण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 4:48 PM

गेल्या ३८ वर्षात त्यांनी महाराष्टृ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगना, तामिळनाडू आदी राज्यांमध्ये पायी विचरण करून भगवान महावीरांचा संदेश जनतेपर्यंत पोहचवला.

पुणे : ज्येष्ठ जैन साध्वी विरागदर्शनाजी महाराज (वय ६३) यांचे बुधवारी( दि. १६) अहमदनगर येथे महानिर्वाण झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आचार्य सम्राट आनंदऋषीजी महाराज आणि प्रमोदसुधाजी महाराज यांच्या प्रेरणेने त्यांनी ३ फेब्रुवारी १९८२ रोजी पुणे येथे जैन भगवती दीक्षा ग्रहण केली होती. त्यांचा जन्म अहमदनगर येथे झाला. प्रसिध्द व्यापारी हरकचंद ताथेड आणि प्यारीबाई हे त्यांचे मातापिता. साध्वी दिव्यदर्शनाजी या त्यांच्या मोठ्या भगिनी होत. विनयकंवरजी महाराज, किरणप्रभाजी महाराज, आदर्शऋषीजी महाराज यांच्या उपदेशाने त्यांना दीक्षेसाठी प्रेरणा मिळाली.

गेल्या ३८ वर्षात त्यांनी महाराष्टृ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगना, तामिळनाडू आदी राज्यांमध्ये पायी विचरण करून भगवान महावीरांचा संदेश जनतेपर्यंत पोहचवला. पुण्यातही त्यांचे चार चातुर्मास झाले. प्रभावी प्रवचनकार, शिस्तप्रिय आणि उत्कृष्ट संघटन कौशल्य, या गुण वैशिष्ट्याच्या बळावर त्यांनी अल्पावधीत श्रमण संघामध्ये स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली होती. तीन दिवसापुर्वी मेदूंतील रक्तस्रावामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली. त्यानंतर त्यांनी संथारा व्रत धारण केले. बुधवारी सकाळी दहावाजेच्या सुमारास त्यांना समाधीमरण प्राप्त झाले

टॅग्स :Puneपुणे