शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

पाण्याविना ‘डिहायड्रेशन’ होऊन पक्ष्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 15:31 IST

घर तिथे हवा पक्ष्यांना पाणवठा; उन्हाळ्यात होते तडफड

ठळक मुद्देउन्हाचा कडाका वाढणार असल्याने पक्ष्यांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची गरज

- श्रीकिशन काळे पुणे : उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली असताना पक्ष्यांची काळजी घेण्याची गरज पक्षी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कडक उन्हात पक्ष्यांना पुरेसे पाणी पिण्यासाठी न मिळाल्यास निर्जलीकरणामुळे (डिहायड्रेशन) उडत असतानाच त्यांचा मृत्यू होण्याच्या घटना घडतात. अशा घटना घडू लागल्या असून ‘डिहायड्रेशन’चा त्रास झाल्याने दोन-तीन पक्षांना उपचारासाठी नुकतेच राजीव गांधी प्राणी संग्रहालयात दाखल गेले. येत्या काही दिवसात उन्हाचा कडाका वाढणार असल्याने पक्ष्यांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे.मानवाप्रमाणेच पक्ष्यांमध्येही उत्सर्जन प्रणाली असते. माणसाप्रमाणेच पक्ष्यांनाही पाण्याची गरज असते. शरीराला नको असलेली नत्रयुक्त टाकाऊ पदार्थ बाहेर फेकण्यासाठी मुत्रपिंडांचा (किडनी) उपयोग होतो. पक्ष्यांनाही दोन किडनी असतात. या किडन्या त्यांच्या पाठीच्या बाजूला असतात. शरीरातील नत्र बाहेर टाकण्यासाठी पाण्याची गरज असते. पक्ष्यांना मूत्राशय नसत्याने मूत्र त्यांच्या शरीरात साठत नाही. पक्ष्यांना घामाच्या ग्रंथीही नसतात. त्यामुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेरटाकण्यासाठी एकच मार्ग असतो आणि त्यासाठी पाणी अत्यावश्यक असते. ते न मिळाल्यास निर्जलीकरण होऊन पक्ष्यांना किडनीचे विकार होतात. यामुळे पक्ष्यांचा मृत्यू होतो, अशी माहिती पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.पुणे इन्स्टिट्यूट आॅफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या संगणक विभागातील सहायक प्राध्यापक योगेश हांडगे यांनी घरी कृत्रिम पाणवठे तयार केले असून गच्चीवर, बाल्कनीत, तसेच बागांमध्ये मातीची उथळ भांडी पाण्याने भरली आहेत. वाढत्या उन्हाळ्यात वन्यजीव व पक्ष्यांना जीवदान देण्यासाठी ‘घर तिथे पक्षी पाणवठा’ ही संकल्पना राबवणे गरजेचे असल्याचे हांडगे म्हणाले. ...........

सध्या दिवसाला तीन-चार पक्षी उपचारासाठी आमच्याकडे येतात. उन्हाळ््यात यात खूप वाढ होते. शहरात इमारती खूप झाल्याने पक्ष्यांना सहजपणे पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. पूर्वीसारखे पाणवठे आता नाहीत. त्यामुळे नागरिकांनी पक्ष्यांसाठी सावली आणि पाण्याची सोय करायला हवी. - डॉ. सुचित्रा सूर्यवंशी, पशुवैद्यकीय तज्ज्ञ, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय 

........................उन्हाळ्यात आम्ही तळजाईवर पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करतो. कारण काही वर्षांपूर्वी आम्ही तिथे पक्षी पाण्याविना उडता-उडता जमिनीवर पडलेले पाहिले आहेत. तळजाईवर मोठी तळी करून त्यात आता पाण्याची सोय आम्ही करतो. नुकतेच आम्ही महात्मा फुले मंडईतही पक्ष्यांसाठी पाण्याची मातीची भांडी ठेवली आहेत. शहरातील इतत्रही नागरिकांनी पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करायला हवी. - लोकेश बापट, पक्षीप्रेमी                

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूenvironmentपर्यावरण