शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

"...म्हणून रात्रीऐवजी पहाटे पाणी सोडलं"; अजित पवारांनी सांगितलं पुण्यातल्या पुराचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 13:01 IST

पुण्यात खडकवासला धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असून अनेक भागात पाणी साचलं आहे.

Pune Heavy Rain :पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पु्ण्या्च्या भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पुण्याच्या नदीकाठच्या भागात अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. पुण्यात रात्रभर पावसाची संततधार असून भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यांना पावसाने झोडपून काढलं आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून ४५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना पत्रकार परिषद घेत अतिवृष्टीबद्दल माहिती दिली.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिमुसळधार पाऊस पडत आहे. बुधवारी रात्रीपासून गुरुवारी सकाळपर्यंत खडकवासला धरण परिसरात हंगामातील विक्रमी पाऊस झाला. गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे हे धरण ओवरफ्लो झाले. त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे पुण्याच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. त्यानंतर एनडीआरएफच्या मदतीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत पाणी सोडण्याचे कारण सांगितलं आहे.

"पुण्यातल्या एकता नगर, निम्बज नगर या भागात पाणी वाढलेलं आहे. काही इमारतींचे पहिले मजले पाण्याखाली गेले आहेत. त्यांना बोटीतून बाहेर काढण्यात येत आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली या भागात एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. बुधवारीच रेड अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार, पुणे, पिंपरी-चिंचवड येथील शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. वरसगाव, पानशेत, खडकवासला आणि टेमघर ही धरणे कमी भरली होती. या धरणातून अर्धा काळ पुरेल एवढेच पाणी होतं. खडकवासला धरणाच्या परिसरात आठ इंचापेक्षा जास्त पाऊस पडला. पुण्यात जवळपास पाच इंचापर्यंत पाऊस पडला. दोन्ही भागात जोरदार पाऊस झाला. खडकवासा धरणाची क्षमता कमी असल्याने ते लगेचच भरले. तीन टीएमसीपेक्षा अधिक पाणी आल्याने धरणाचे दरवाजे उघडावे लागले. त्यामुळे जवळपास ४५ हजार क्युसेक पाणी खडकवासला धरणातून सोडण्यात आलं. पाण्याचा प्रवाह सोडत असताना आम्ही ते पहाटे सोडण्याचा निर्णय घेतला. रात्री सोडले असते सलख भागात पाणी जाऊन लोकांना त्याचा त्रास झाला असता. त्यामुळे पहाटे पाणी सोडल्यानंतर आतापर्यंत ते बंडगार्डन पर्यंत पोहोचलं आहे," अशी माहिती अजित पवारांनी दिली. 

१८ ठिकाणी एनडीआरएफची पथके

"हवामान खात्याने पुढील पाच दिवसांचे अंदाज वर्तवले आहेत. त्यानुसार काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर काहींना यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व यंत्रणा अलर्ट करण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास संबंधित ठिकाणी मदत व बचावकार्यासाठी आवश्यक सामग्री उपलब्ध करण्यात आली आहे. मुंबईतील कुर्ला व घाटकोपर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली अशा जिल्ह्यांमध्ये एकूण १८ ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथके, तसेच ६ राज्य आपत्ती निवारण पथके तैनात करण्यात आली आहेत," असेही अजित पवार म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारRainपाऊस