शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

"...म्हणून रात्रीऐवजी पहाटे पाणी सोडलं"; अजित पवारांनी सांगितलं पुण्यातल्या पुराचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 13:01 IST

पुण्यात खडकवासला धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असून अनेक भागात पाणी साचलं आहे.

Pune Heavy Rain :पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पु्ण्या्च्या भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पुण्याच्या नदीकाठच्या भागात अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. पुण्यात रात्रभर पावसाची संततधार असून भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यांना पावसाने झोडपून काढलं आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून ४५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना पत्रकार परिषद घेत अतिवृष्टीबद्दल माहिती दिली.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिमुसळधार पाऊस पडत आहे. बुधवारी रात्रीपासून गुरुवारी सकाळपर्यंत खडकवासला धरण परिसरात हंगामातील विक्रमी पाऊस झाला. गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे हे धरण ओवरफ्लो झाले. त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे पुण्याच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. त्यानंतर एनडीआरएफच्या मदतीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत पाणी सोडण्याचे कारण सांगितलं आहे.

"पुण्यातल्या एकता नगर, निम्बज नगर या भागात पाणी वाढलेलं आहे. काही इमारतींचे पहिले मजले पाण्याखाली गेले आहेत. त्यांना बोटीतून बाहेर काढण्यात येत आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली या भागात एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. बुधवारीच रेड अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार, पुणे, पिंपरी-चिंचवड येथील शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. वरसगाव, पानशेत, खडकवासला आणि टेमघर ही धरणे कमी भरली होती. या धरणातून अर्धा काळ पुरेल एवढेच पाणी होतं. खडकवासला धरणाच्या परिसरात आठ इंचापेक्षा जास्त पाऊस पडला. पुण्यात जवळपास पाच इंचापर्यंत पाऊस पडला. दोन्ही भागात जोरदार पाऊस झाला. खडकवासा धरणाची क्षमता कमी असल्याने ते लगेचच भरले. तीन टीएमसीपेक्षा अधिक पाणी आल्याने धरणाचे दरवाजे उघडावे लागले. त्यामुळे जवळपास ४५ हजार क्युसेक पाणी खडकवासला धरणातून सोडण्यात आलं. पाण्याचा प्रवाह सोडत असताना आम्ही ते पहाटे सोडण्याचा निर्णय घेतला. रात्री सोडले असते सलख भागात पाणी जाऊन लोकांना त्याचा त्रास झाला असता. त्यामुळे पहाटे पाणी सोडल्यानंतर आतापर्यंत ते बंडगार्डन पर्यंत पोहोचलं आहे," अशी माहिती अजित पवारांनी दिली. 

१८ ठिकाणी एनडीआरएफची पथके

"हवामान खात्याने पुढील पाच दिवसांचे अंदाज वर्तवले आहेत. त्यानुसार काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर काहींना यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व यंत्रणा अलर्ट करण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास संबंधित ठिकाणी मदत व बचावकार्यासाठी आवश्यक सामग्री उपलब्ध करण्यात आली आहे. मुंबईतील कुर्ला व घाटकोपर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली अशा जिल्ह्यांमध्ये एकूण १८ ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथके, तसेच ६ राज्य आपत्ती निवारण पथके तैनात करण्यात आली आहेत," असेही अजित पवार म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारRainपाऊस