शहरं
Join us  
Trending Stories
1
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
2
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
3
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
4
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
5
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
6
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
7
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
8
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
9
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
10
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
11
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
12
निष्कलंक, सुसंस्कृत नेतृत्व हरपले; माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन
13
चांदीसाठी किलोला ‘जीएसटी’सह मोजा दोन लाख रुपये ! दोन हजारांच्या वाढीसह पोहोचली १,९४,००० रुपयांवर
14
इंडिगोला दणका; ४ फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर निलंबित, सीईओ पीटर एल्बर्स यांची सलग दुसऱ्या दिवशी डीजीसीएने चौकशी केली
15
भाजप आमदारांनी आरोप केलेले तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चिट’,ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही
16
विमा क्षेत्रात १०० टक्के ‘एफडीआय’ला मंजुरी; आतापर्यंत एफडीआयमार्फत ८२,००० कोटींची परकीय गुंतवणूक
17
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
18
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
19
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
20
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

संसदीय लोकशाहीसाठी घातक परिस्थिती - डॉ. बापट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 08:27 IST

घटनेच्या दहाव्या कलमात पक्षांतरबंदीविषयी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत.

डॉ. उल्हास बापट

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी पक्षांतराला आळा बसावा यासाठी पक्षांतरबंदी कायदा केला; मात्र तो बळकट करण्याऐवजी त्यातून पळवाटा काढल्या जात असून सांसदीय लोकशाहीसाठी हे घातक आहे. राष्ट्रवादी आमदार अपात्रतेबाबत विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा भंग केलेला दिसतो.

घटनेच्या दहाव्या कलमात पक्षांतरबंदीविषयी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. त्या शिवाय या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मूळ पक्ष महत्त्वाचा, त्याची घटना महत्त्वाची, त्या पक्षाचे खासदार किंवा आमदार यांचे बहुमत आहे की नाही हा भाग दुय्यम असे त्यात म्हटले होते. नार्वेकर यांनी मात्र निकाल देताना खासदार, आमदार यांचे बहुमतच लक्षात घेतलेले दिसते. पक्षांतर्गत मतभेद हे कायद्याचा भंग समजता येणार नाही, हा त्यांचा समजही असाच कायद्यातील पळवाट शोधण्याचा प्रयत्न आहे. पक्षांतरबंदी कायदा हा लोकशाही बळकट व्हावी यासाठी केलेला आहे. तो बळकट करण्याचे प्रयत्न होणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. यापुढे अशा प्रकरणांमध्ये निर्णय घेताना याच निकालाचा आधार घेतला जाईल. त्यामुळे मूळ पक्ष, त्याची घटना हे सगळे दुय्यम समजले जाण्याची भीती आहे.

ज्या देशांचा आपण घटना तयार करताना आधार घेतला त्या देशांमध्ये सभागृहाच्या अध्यक्षाची निवड झाली की, सर्वप्रथम तो आपल्या पक्षसदस्यत्वाचा राजीनामा देतो. त्याने सभागृहात निष्पक्षपाती पंच म्हणून काम करणे अपेक्षित असते. आपल्याकडे तसे होत नाही. विधानसभेचे अध्यक्ष त्यांच्या पक्षाचे सदस्य असतातच. त्यामुळेच त्यांच्याकडूनच निष्पक्षपातीपणाचे निर्णय घेतले जात नसावेत.

लेखक घटनेचे अभ्यासक (पुणे) आहेत 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसdemocracyलोकशाहीBJPभाजपा