शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

उत्तर पुणे जिल्ह्यातील जनतेचे विमानतळ रद्द झाल्याने नुकसान- दिलीप वळसे-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 01:58 IST

सरकार शेतकरीविरोधी तसेच ग्रामीण विकासाच्या विरोधात आहे, अशी टीका विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी केली.

टाकळी हाजी : खेड परिसरातील प्रस्तावित विमानतळ रद्द झाल्यामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. हे सरकार शेतकरीविरोधी तसेच ग्रामीण विकासाच्या विरोधात आहे, अशी टीका विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी बुधवारी केली.मलठण (ता. शिरूर) येथे नळ पाणीपुरवठा, तसेच आमदाबाद फाटा, टाकळी हाजी रस्ता, मलठण ते वाघाळे रस्ता या विकासकामांचे भूमिपूजन वळसे-पाटील यांच्या हस्ते झाले.या वेळी ते म्हणाले, ‘‘ग्रामीण भागातील जनतेमधे सरकारबद्दल प्रचंड नाराजी असून, तरुणवर्ग अस्वस्थ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक आश्वासने दिली; मात्र त्यांची पूर्तता न झाल्यामुळे सरकारविषयी अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.’’कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते हे होते. या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, पंचायत समिती सभापती विश्वास कोहकडे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे, सविता बगाटे, बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे, घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे, रंगनाथ थोरात, जिल्हा बँकेच्या संचालिका वर्षा शिवले, पंचायत समिती सदस्या अरुणा घोडे, सविता पºहाड, गटविकास अधिकारी संदीप जठार, उपविभागीय अभियंता प्रभाकर जाधव, सरपंच कैलास कोळपे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.खासदार कार्यक्षम असल्यानंतर किती विकासाची कामे मार्गी लावता येतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे सुप्रिया सुळे यांचा बारामती मतदारसंघ आहे. खेडच्या जनतेनेही कार्यक्षम खासदारांना निवडून द्यावे, असे आवाहन विश्वास देवकाते यांनी केले.शेतकरी कर्जमाफी फसवी निघाली...सध्या कोणत्याच शेतमालाला भाव नाही. शेतकरी शेतमाल फेकून देत आहेत. शासनाची कर्जमाफी तर फसवी व दिशाभूल करणारी ठरली. आता उत्पादनखर्चसुद्धा परत मिळण्याची शक्यता नाही. शासनाचे धोरण हे शेतकरी कर्जमुक्त करण्यासाठी नाही, तर कर्जबाजारी करणारे असल्याची टीका माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केली.शिवसेनेचे कार्यकर्ते राष्ट्रवादीतया वेळी मलठणचे सरपंच कैलास कोळपे, माजी सरपंच अनिता लकडे, सुरेश गायकवाड, मुकुंद नरवडे, उत्तम लकडे, यांनी शिवसेनेमधून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.

टॅग्स :AirportविमानतळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस