शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

उत्तर पुणे जिल्ह्यातील जनतेचे विमानतळ रद्द झाल्याने नुकसान- दिलीप वळसे-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 01:58 IST

सरकार शेतकरीविरोधी तसेच ग्रामीण विकासाच्या विरोधात आहे, अशी टीका विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी केली.

टाकळी हाजी : खेड परिसरातील प्रस्तावित विमानतळ रद्द झाल्यामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. हे सरकार शेतकरीविरोधी तसेच ग्रामीण विकासाच्या विरोधात आहे, अशी टीका विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी बुधवारी केली.मलठण (ता. शिरूर) येथे नळ पाणीपुरवठा, तसेच आमदाबाद फाटा, टाकळी हाजी रस्ता, मलठण ते वाघाळे रस्ता या विकासकामांचे भूमिपूजन वळसे-पाटील यांच्या हस्ते झाले.या वेळी ते म्हणाले, ‘‘ग्रामीण भागातील जनतेमधे सरकारबद्दल प्रचंड नाराजी असून, तरुणवर्ग अस्वस्थ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक आश्वासने दिली; मात्र त्यांची पूर्तता न झाल्यामुळे सरकारविषयी अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.’’कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते हे होते. या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, पंचायत समिती सभापती विश्वास कोहकडे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे, सविता बगाटे, बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे, घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे, रंगनाथ थोरात, जिल्हा बँकेच्या संचालिका वर्षा शिवले, पंचायत समिती सदस्या अरुणा घोडे, सविता पºहाड, गटविकास अधिकारी संदीप जठार, उपविभागीय अभियंता प्रभाकर जाधव, सरपंच कैलास कोळपे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.खासदार कार्यक्षम असल्यानंतर किती विकासाची कामे मार्गी लावता येतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे सुप्रिया सुळे यांचा बारामती मतदारसंघ आहे. खेडच्या जनतेनेही कार्यक्षम खासदारांना निवडून द्यावे, असे आवाहन विश्वास देवकाते यांनी केले.शेतकरी कर्जमाफी फसवी निघाली...सध्या कोणत्याच शेतमालाला भाव नाही. शेतकरी शेतमाल फेकून देत आहेत. शासनाची कर्जमाफी तर फसवी व दिशाभूल करणारी ठरली. आता उत्पादनखर्चसुद्धा परत मिळण्याची शक्यता नाही. शासनाचे धोरण हे शेतकरी कर्जमुक्त करण्यासाठी नाही, तर कर्जबाजारी करणारे असल्याची टीका माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केली.शिवसेनेचे कार्यकर्ते राष्ट्रवादीतया वेळी मलठणचे सरपंच कैलास कोळपे, माजी सरपंच अनिता लकडे, सुरेश गायकवाड, मुकुंद नरवडे, उत्तम लकडे, यांनी शिवसेनेमधून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.

टॅग्स :AirportविमानतळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस