शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

शेतकऱ्यांचा पीककर्जाचा पुरवठा लवकरच वेळेवर होणार; साडेचार हजार संस्थांचे संगणकीकरण सुरू

By नितीन चौधरी | Updated: November 1, 2023 16:17 IST

केंद्र आणि राज्य सरकारमार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारला १५३ कोटी रुपये खर्च येणार

पुणे : शेतकऱ्यांना पीककर्जाचा पुरवठा वेळेवर व्हावा, यासाठी राज्यात कृषी पतपुरवठा करणाऱ्या सर्व विविध कार्यकारी सेवा संस्थांचे संगणकीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १२ हजार संस्थांची निवड करण्यात आली असून, आतापर्यंत साडेचार हजार संस्थांच्या संगणकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या तीन ते पाच वर्षांत त्याची अमंलबजावणी होणार आहे, अशी माहिती सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी दिली.

केंद्र आणि राज्य सरकारमार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारला १५३ कोटी रुपये खर्च येणार आहे. केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी पीककर्ज पुरवठ्यासाठी देशातील सर्व विविध कार्यकारी सेवा संस्थांचे संगणकीकरण करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत देशातील ६३ हजार सेवा संस्थांचे संगणकीकरण करण्यात येणार आहे. त्यात राज्यातील १२ हजार सेवा संस्थांचा समावेश आहे.सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी उपयुक्त असलेले अनेक मोठे निर्णय केंद्र सरकारने घेतले आहेत. राज्याच्या सहकार विभागामार्फत या सर्व निर्णयांची अंमलबजावणी राज्यात केली जात आहे. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था स्वावलंबी व्हाव्यात आणि त्या कार्यक्षमपणे चालू राहाव्यात, यादृष्टीनेही प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी दिली.

२० हजारांहून अधिक संस्था कार्यरत

राज्यात सध्या कर्जपुरवठ्याची त्रिस्तरीय व्यवस्था अस्तित्वात असून राज्य, जिल्हा बॅंकेसह गावपातळीवर विविध कार्यकारी सेवा संस्था कार्यरत आहेत. सद्यःस्थितीत राज्यात २० हजारांहून अधिक विविध कार्यकारी सेवा सहकारी सेवा संस्था कार्यरत आहेत. या संस्था आर्थिकदृष्ट्या बळकट करणे, त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना पतपुरवठा करण्याबरोबरच विविध सेवा व वस्तूंचा पुरवठा करणे, हा केंद्र सरकारच्या निर्णयामागील उद्देश आहे. त्यानुसार या संस्थांचे संगणकीकरण केले जात आहे.

येत्या पाच वर्षांत १२ संस्थाचे हाेणार संगणकीकरण

संगणकीकरणासाठी सिस्टम इंटिग्रेटरची नेमणूक करण्यात आली असून त्या माध्यमातून या सर्व संस्था ६ ते ७ टप्प्यांत संगणकीकृत करण्याचे काम सुरू आहे. येत्या ३ ते ५ वर्षांत या सर्व १२ हजार संस्थांचे संगणकीकरण पूर्ण होईल अशी माहितीही कवडे यांनी दिली. त्यांच्याविषयी असलेल्या कायद्यातील पोटनियमामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यामुळे या संस्थांना बाहेरील स्त्रोतांकडून कर्ज घेण्याच्या मर्यादेत वाढ झाली आहे, असेही कवडे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीMONEYपैसाGovernmentसरकारSocialसामाजिक