शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
5
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
6
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
7
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
8
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
9
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
10
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
11
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
13
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
14
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
15
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
16
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
17
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
18
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
19
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
20
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'

स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकांचे नुकसान ही अटच केली रद्द

By नितीन चौधरी | Updated: May 11, 2025 15:05 IST

एक घटक दोनदा नुकसानभरपाई; नवीन पीकविमा योजनेतून नुकसानीसह चार घटक वगळले

पुणे : गेली दोन वर्षे खरीप पीकविमा योजना एक रुपयात उपलब्ध करून दिल्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीसाठी भरपाई दिली जात होती. मात्र, याच घटकातून महसूल विभाग देखील पिकांच्या नुकसानभरपाईसाठी पीकनिहाय मदत करीत होते.

त्यामुळे नवीन पीकविमा योजनेत स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकांचे नुकसान ही अटच रद्द करण्यात आली आहे. या घटकाअंतर्गत मोठ्या प्रमाणावर तक्रारीही होत्या. तांत्रिकदृष्ट्या या तक्रारी सोडविणे अशक्य झाल्यानेदेखील ही अट काढून टाकण्यात आल्याचे कृषी विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.राज्य सरकारने खरीप २०२३ पासून पंतप्रधान खरीप पीकविमा योजना केवळ एक रुपयात शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रतिसाद तब्बल दहा पटींनी वाढला.

स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकांचे नुकसान या घटकाअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई चांगल्या पद्धतीने मिळत असल्याने हा प्रतिसाद वाढला होता. मात्र, त्यासाठी शेतकऱ्यांना नुकसानीची सूूचना द्यावी लागत होती. २०२३ च्या खरीप हंगामात या घटकाअंतर्गत ४६ लाख, तर २०२४ च्या खरीप हंगामात तब्बल ९२ लाख सूचना आल्या होत्या. प्रत्येक सूचनेची प्रत्यक्ष शेतावर जाऊन पडताळणी करणे, त्यानुसार नुकसानभरपाई ठरविणे, हे जिकिरीचे काम होते. त्यामुळेच नुकसान झाल्यानंतरही भरपाई मिळत नाही, अशी शेतकऱ्यांची तक्रार होती. दुसरीकडे राज्य सरकारकडून विमा कंपन्यांना मात्र हप्ता न चुकता मिळत होता. याचा रोषदेखील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत होता.दुसरीकडे स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकांचे नुकसान या घटकाअंतर्गत मदत व पुनर्वसन विभागाकडून कोरडवाहू, बागायती व फळपिकांच्या नुकसानीसाठी मदत केली जात आहे. त्यामुळे एकाच घटकाअंतर्गत राज्य सरकारकडून दोनदा नुकसानभरपाई दिली जात होती. त्यामुळेच खरीप पीकविमा योजनेतून हा घटक वगळण्यात आल्याचेही कृषी विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.एक रुपयात विमा उपलब्ध करून दिल्याने बनावट शेतकऱ्यांच्या नावाने अनेक गैरव्यवहार उघडकीस आले होते. याचा फटका राज्य सरकारला बसला होता. त्यामुळे एक रुपयात खरीप पीकविमा योजना बंद करण्याचा निर्णय घेऊन पूर्वीप्रमाणेच पीकनिहाय विमा हप्ता भरून शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे.

या नवीन पीकविमा योजनेत जुन्या योजनेतील पाऊस न पडल्याने पेरणी न करता येणे, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान, नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान, तसेच पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे नुकसान हे चार महत्त्वाचे घटक वगळण्यात आले आहेत. यामुळे राज्य सरकारला नुकसानभरपाईपोटी विमा कंपन्यांना देण्यात येणाऱ्या निधीतदेखील घट होणार आहे. परिणामी राज्य सरकारचा मोठा पैसा वाचणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.अशी असेल नुकसानभरपाईराज्य सरकारने आता पंतप्रधान पीकविमा योजनेमध्ये बदल करून यंदाच्या खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बीसाठी १.५ टक्का व नगदी पिकांना ५ टक्के असा शेतकरी हिस्सा घेऊन व उर्वरित पीक हप्ता केंद्र व राज्य सरकारमार्फत देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तर पीक कापणी प्रयोगांवर आधारित नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे