शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकांचे नुकसान ही अटच केली रद्द

By नितीन चौधरी | Updated: May 11, 2025 15:05 IST

एक घटक दोनदा नुकसानभरपाई; नवीन पीकविमा योजनेतून नुकसानीसह चार घटक वगळले

पुणे : गेली दोन वर्षे खरीप पीकविमा योजना एक रुपयात उपलब्ध करून दिल्यानंतर स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीसाठी भरपाई दिली जात होती. मात्र, याच घटकातून महसूल विभाग देखील पिकांच्या नुकसानभरपाईसाठी पीकनिहाय मदत करीत होते.

त्यामुळे नवीन पीकविमा योजनेत स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकांचे नुकसान ही अटच रद्द करण्यात आली आहे. या घटकाअंतर्गत मोठ्या प्रमाणावर तक्रारीही होत्या. तांत्रिकदृष्ट्या या तक्रारी सोडविणे अशक्य झाल्यानेदेखील ही अट काढून टाकण्यात आल्याचे कृषी विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.राज्य सरकारने खरीप २०२३ पासून पंतप्रधान खरीप पीकविमा योजना केवळ एक रुपयात शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रतिसाद तब्बल दहा पटींनी वाढला.

स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकांचे नुकसान या घटकाअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई चांगल्या पद्धतीने मिळत असल्याने हा प्रतिसाद वाढला होता. मात्र, त्यासाठी शेतकऱ्यांना नुकसानीची सूूचना द्यावी लागत होती. २०२३ च्या खरीप हंगामात या घटकाअंतर्गत ४६ लाख, तर २०२४ च्या खरीप हंगामात तब्बल ९२ लाख सूचना आल्या होत्या. प्रत्येक सूचनेची प्रत्यक्ष शेतावर जाऊन पडताळणी करणे, त्यानुसार नुकसानभरपाई ठरविणे, हे जिकिरीचे काम होते. त्यामुळेच नुकसान झाल्यानंतरही भरपाई मिळत नाही, अशी शेतकऱ्यांची तक्रार होती. दुसरीकडे राज्य सरकारकडून विमा कंपन्यांना मात्र हप्ता न चुकता मिळत होता. याचा रोषदेखील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत होता.दुसरीकडे स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकांचे नुकसान या घटकाअंतर्गत मदत व पुनर्वसन विभागाकडून कोरडवाहू, बागायती व फळपिकांच्या नुकसानीसाठी मदत केली जात आहे. त्यामुळे एकाच घटकाअंतर्गत राज्य सरकारकडून दोनदा नुकसानभरपाई दिली जात होती. त्यामुळेच खरीप पीकविमा योजनेतून हा घटक वगळण्यात आल्याचेही कृषी विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.एक रुपयात विमा उपलब्ध करून दिल्याने बनावट शेतकऱ्यांच्या नावाने अनेक गैरव्यवहार उघडकीस आले होते. याचा फटका राज्य सरकारला बसला होता. त्यामुळे एक रुपयात खरीप पीकविमा योजना बंद करण्याचा निर्णय घेऊन पूर्वीप्रमाणेच पीकनिहाय विमा हप्ता भरून शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे.

या नवीन पीकविमा योजनेत जुन्या योजनेतील पाऊस न पडल्याने पेरणी न करता येणे, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान, नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान, तसेच पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे नुकसान हे चार महत्त्वाचे घटक वगळण्यात आले आहेत. यामुळे राज्य सरकारला नुकसानभरपाईपोटी विमा कंपन्यांना देण्यात येणाऱ्या निधीतदेखील घट होणार आहे. परिणामी राज्य सरकारचा मोठा पैसा वाचणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.अशी असेल नुकसानभरपाईराज्य सरकारने आता पंतप्रधान पीकविमा योजनेमध्ये बदल करून यंदाच्या खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बीसाठी १.५ टक्का व नगदी पिकांना ५ टक्के असा शेतकरी हिस्सा घेऊन व उर्वरित पीक हप्ता केंद्र व राज्य सरकारमार्फत देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तर पीक कापणी प्रयोगांवर आधारित नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे