शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

बोगस पट दाखविलेल्या मुख्याध्यापकांविरूध्द फौजदारी गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 19:34 IST

राज्यातील सर्व शाळांमध्ये ३ ते ५ आॅक्टोबर २०११ या कालावधीमध्ये विशेष पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये शाळांनी दीड लाख विद्यार्थ्यांची बोगस संख्या दाखविल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली होती.

ठळक मुद्देशिक्षण संचालकांचे आदेश : संस्थाचालक, शिक्षक व कर्मचारीही कारवाईच्या कचाटयातमोफत पाठयपुस्तके, उपस्थिती भत्ता, शिष्यवृत्ती इ.लाभ मिळविणे आदी गैरप्रकार केल्याचे निष्पन्न शाळा व संस्थाविरूध्द कारवाई करताना त्यांना यापूर्वी देण्यात आलेल्या नोटिसांचा खुलासा विचारात घेऊन कारवाई

पुणे : राज्यात ३ ते ५ आॅक्टोबर २०११ दरम्यान सर्व शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या विशेष पट पडताळणी मोहीमेमध्ये बोगस विद्यार्थी आढळून आलेल्या शाळांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांविरूध्द फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश शिक्षण संचालक (प्राथमिक) सुनिल चौहान यांनी दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार संचालकांनी कारवाईचे परिपत्रक काढले असून यामुळे बोगसगिरी करणारे अनेक संस्थाचालक, मुख्याध्यापक कारवाईच्या कचाटयात सापडणार आहेत.राज्यातील सर्व शाळांमध्ये ३ ते ५ आॅक्टोबर २०११ या कालावधीमध्ये तत्कालीन शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या पुढाकाराने विशेष पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये शाळांनी दीड लाख विद्यार्थ्यांची बोगस संख्या दाखविल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली होती. या बोगस संख्येच्या आधारे वाढीव तुकडया मंजूर करून अतिरिक्त शिक्षकांची पदे भरण्यात आली होती. त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनांवरील शालेय पोषण आहार, गणवेश, लेखन साहित्य, मोफत पाठयपुस्तके, स्वाध्याय पुस्तिका, उपस्थिती भत्ता, टर्म फी, शिष्यवृत्ती इत्यादी लाभ मिळविणे आदी गैरप्रकार केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे अशा शाळांविरूध्द फौजदारी दंडसंहिता,महाराष्ट्र खाजगी शाळांमधील कर्मचारी अधिनियम १९७७ व नियमावली १९८१ व अन्य संबंधित कायद्यातील तरतुदीनुसार फौजदारी कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश सुनिल चव्हाण यांनी दिले आहेत. त्याबाबत सर्व महापालिकांचे आयुक्त, सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, मुंबईतील शिक्षण निरीक्षक यांना याबाबतची कार्यवाही करण्यास सांगण्यात आले आहे. शाळा व संस्थाविरूध्द कारवाई करताना त्यांना यापूर्वी देण्यात आलेल्या नोटिसांचा खुलासा विचारात घेऊन कारवाई करावी. बोगस विद्यार्थी संख्या दाखविणे, वाढीव तुकडया, अतिरिक्त शिक्षकांची पदे मंजूर करून घेणे व त्याधारे विविध योजनांचा बेकायदेशीरपणे लाभ या प्रत्येक मुददयाच्या आधारे शासनाची झालेली फसवणूक व आर्थिक नुकसान याची निश्चिती करावी. त्यानुसार यामध्ये सहभागी असणाऱ्या संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांविरूध्द फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच ही कारवाई करताना शासन पत्र ३१ मे २०१८ व संचलनालयाचे पत्र ८ जून २०१८ यांचा आधार घ्यावा असे सुनिल चव्हाण यांनी परिपत्रकामध्ये स्पष्ट केले आहे.  ................अवमान याचिका दाखल झाल्याने कारवाईउच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बोगस पटपडताळणीमध्ये दोषी आढळलेल्या शाळांविरूध्द कारवाई करण्याचे यापुर्वीच आदेश दिले होते. मात्र त्यानुसार कारवाई न झाल्याने २०१४ मध्ये याप्रकरणी अवमान याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेची दखल करून तातडीने याप्रकरणी दोषी असलेल्यांविरूध्द फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार शिक्षण संचालक सुनिल चौहान यांनी दिले आहेत.

कारवाईचा अहवाल दोन दिवसात द्यादोषी आढळलेल्या शाळांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांविरूध्द फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आल्याचा अहवाल अवघ्या २ दिवसात शिक्षण संचलनालयाकडे सादर करायचा आहे. त्यानंतर याबाबतची एकत्रित माहिती तातडीने औरंगाबाद खंडपीठामध्ये सादर करावयाची असल्याचे शिक्षण संचालकांनी काढलेल्या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.  

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणSchoolशाळाCrimeगुन्हाPoliceपोलिस