शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

बोगस पट दाखविलेल्या मुख्याध्यापकांविरूध्द फौजदारी गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 19:34 IST

राज्यातील सर्व शाळांमध्ये ३ ते ५ आॅक्टोबर २०११ या कालावधीमध्ये विशेष पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये शाळांनी दीड लाख विद्यार्थ्यांची बोगस संख्या दाखविल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली होती.

ठळक मुद्देशिक्षण संचालकांचे आदेश : संस्थाचालक, शिक्षक व कर्मचारीही कारवाईच्या कचाटयातमोफत पाठयपुस्तके, उपस्थिती भत्ता, शिष्यवृत्ती इ.लाभ मिळविणे आदी गैरप्रकार केल्याचे निष्पन्न शाळा व संस्थाविरूध्द कारवाई करताना त्यांना यापूर्वी देण्यात आलेल्या नोटिसांचा खुलासा विचारात घेऊन कारवाई

पुणे : राज्यात ३ ते ५ आॅक्टोबर २०११ दरम्यान सर्व शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या विशेष पट पडताळणी मोहीमेमध्ये बोगस विद्यार्थी आढळून आलेल्या शाळांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांविरूध्द फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश शिक्षण संचालक (प्राथमिक) सुनिल चौहान यांनी दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार संचालकांनी कारवाईचे परिपत्रक काढले असून यामुळे बोगसगिरी करणारे अनेक संस्थाचालक, मुख्याध्यापक कारवाईच्या कचाटयात सापडणार आहेत.राज्यातील सर्व शाळांमध्ये ३ ते ५ आॅक्टोबर २०११ या कालावधीमध्ये तत्कालीन शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या पुढाकाराने विशेष पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये शाळांनी दीड लाख विद्यार्थ्यांची बोगस संख्या दाखविल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली होती. या बोगस संख्येच्या आधारे वाढीव तुकडया मंजूर करून अतिरिक्त शिक्षकांची पदे भरण्यात आली होती. त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनांवरील शालेय पोषण आहार, गणवेश, लेखन साहित्य, मोफत पाठयपुस्तके, स्वाध्याय पुस्तिका, उपस्थिती भत्ता, टर्म फी, शिष्यवृत्ती इत्यादी लाभ मिळविणे आदी गैरप्रकार केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे अशा शाळांविरूध्द फौजदारी दंडसंहिता,महाराष्ट्र खाजगी शाळांमधील कर्मचारी अधिनियम १९७७ व नियमावली १९८१ व अन्य संबंधित कायद्यातील तरतुदीनुसार फौजदारी कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश सुनिल चव्हाण यांनी दिले आहेत. त्याबाबत सर्व महापालिकांचे आयुक्त, सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, मुंबईतील शिक्षण निरीक्षक यांना याबाबतची कार्यवाही करण्यास सांगण्यात आले आहे. शाळा व संस्थाविरूध्द कारवाई करताना त्यांना यापूर्वी देण्यात आलेल्या नोटिसांचा खुलासा विचारात घेऊन कारवाई करावी. बोगस विद्यार्थी संख्या दाखविणे, वाढीव तुकडया, अतिरिक्त शिक्षकांची पदे मंजूर करून घेणे व त्याधारे विविध योजनांचा बेकायदेशीरपणे लाभ या प्रत्येक मुददयाच्या आधारे शासनाची झालेली फसवणूक व आर्थिक नुकसान याची निश्चिती करावी. त्यानुसार यामध्ये सहभागी असणाऱ्या संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांविरूध्द फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच ही कारवाई करताना शासन पत्र ३१ मे २०१८ व संचलनालयाचे पत्र ८ जून २०१८ यांचा आधार घ्यावा असे सुनिल चव्हाण यांनी परिपत्रकामध्ये स्पष्ट केले आहे.  ................अवमान याचिका दाखल झाल्याने कारवाईउच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बोगस पटपडताळणीमध्ये दोषी आढळलेल्या शाळांविरूध्द कारवाई करण्याचे यापुर्वीच आदेश दिले होते. मात्र त्यानुसार कारवाई न झाल्याने २०१४ मध्ये याप्रकरणी अवमान याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेची दखल करून तातडीने याप्रकरणी दोषी असलेल्यांविरूध्द फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार शिक्षण संचालक सुनिल चौहान यांनी दिले आहेत.

कारवाईचा अहवाल दोन दिवसात द्यादोषी आढळलेल्या शाळांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांविरूध्द फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आल्याचा अहवाल अवघ्या २ दिवसात शिक्षण संचलनालयाकडे सादर करायचा आहे. त्यानंतर याबाबतची एकत्रित माहिती तातडीने औरंगाबाद खंडपीठामध्ये सादर करावयाची असल्याचे शिक्षण संचालकांनी काढलेल्या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.  

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणSchoolशाळाCrimeगुन्हाPoliceपोलिस