शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

सर्जनशीलता म्हणजे मनमानी नव्हे : डाॅ. प्रभा अत्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 20:50 IST

गानवर्धन संस्था आणि शारंग नातू प्रणित तात्यासाहेब नातू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार यावर्षी जयपूर अत्रौली घराण्याच्या विख्यात गायिका व संगीत गुरू पंडित डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.

पुणे : संगीताच्या नियमांच्या चौकटीत राहूनच मुक्त होता आले पाहिजे, तीच सर्जनशीलतेची वाट असते. सर्जनशीलता म्हणजे मनमानी नव्हे, असे सांगत, ‘आमच्या घराण्यात आहे तेच बरोबर, अशा भूमिकेमुळे शास्त्रीय संगीताच्या राग-रुपांमध्ये आज एकवाक्यता राहिलेली नाही. विरोध करणे, गोंधळ निर्माण करण्याचेच काम आज सुरु आहे. आपल्या ज्ञानाच्या पलीकडे संगीत शास्त्रात काही घडू शकते, हे त्यांना उमगतच नाही, अशा शब्दांत किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका यांनी शास्त्रीय संगीतातील सद्यस्थितीवर नेमकपेणाने बोट ठेवले.  निदान संगीतकलेच्या विकासासाठी त्यांनी एकत्र यायला हवे. मानकीकरणासाठी पाऊल उचलायला हवे, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

    गानवर्धन संस्था आणि शारंग नातू प्रणित तात्यासाहेब नातू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार यावर्षी जयपूर अत्रौली घराण्याच्या विख्यात गायिका व संगीत गुरू पंडित डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.  किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या हस्ते रविवारी टिळक स्मारक मंदिरात पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे, मेवाती घराण्याचे गायक पं. संजीव अभ्यंकर, लता मराठे, शारंग नातू, प्रसाद भडसावळे उपस्थित होते. पुरस्कारानंतर पं.डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांची गायन मैफिल रंगली.

    प्रभा अत्रे म्हणाल्या, ‘संगीताचे प्रस्तुतीकरण आणि शास्त्र यांचे नाते बिंब-प्रतिबिंबासारखे असते. या नात्यात आज दुरावा निर्माण झाला आहे. विज्ञान-तंत्रज्ञान, झपाट्याने बदलणारी जीवनपध्दती, राजकीय अस्थिरता, सामाजिक उदासिनता, निष्क्रियता, बाहेरचे सांस्कृतिक आक्रमण या परिस्थितीत शास्त्रीय संगीत जपणे, जिवंत ठेवण्याचे आव्हान आजच्या कलाकारांसमोर आहे. एका व्यापक दृष्टीकोनातून प्रस्तुतीकरण आणि शास्त्राचा अभ्यास होणे, ही आजच्या काळाची गरज आहे. भारतीय संगीताने जागतिक मंचावर निर्माण केलेले स्थान बळकट करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलायला हवीत. पुढची पिढी या दृष्टीने विचार करेल, अशी आशा वाटते.

 सृजनात्मकतेने जपला  सांगितिक वारसाआमच्या पिढीने ज्यांच्याकडे पथदर्शक म्हणून पहिले, त्या प्रभाताई ८७ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. ८७ वर्षांचे आयुष्य मिळाले, तर कसे जगावे याचा आदर्श आमच्या पिढीने त्यांच्याकडून घ्यायला हवा. किराणा घराण्याच्या सांगितिक वारसा त्यांनी सृजनात्मकतेने जपला आहे. मी शाळकरी मुलगी असताना त्यांचा संगीतातील बहराचा काळ होता. प्रभाताई, किशोरीताई, शोभाताई अशा मोजक्याच स्त्री गायिकांना मी फॉलो करत होते. मी प्रभातार्इंकडे शिकायला जावे, अशी आईची इच्छा होती. जयपूर घराण्याशी माझे धागे जुळल्याने माझे आणि प्रभातार्इंचे ॠणानुबंध जुळले नाहीत. गुरुंनी दिलेल्या संगीताच्या संस्कारांचा तर्कसुसंगती, कलासक्ती आणि बुध्दीनिष्ठेने त्यांनी डोळस स्वीकार आणि संगोपन केले. त्यांनी कायम बुध्दीच्या कसोटीवर घासून कला जोपासली आणि शिष्यांकडे सुपूर्त केली. त्याच वाटेवरुन माझी वाटचाल व्हावी, एवढीच इच्छा आहे.- अश्विनी भिडे-देशपांडे

कला परस्पर पूरकचित्रकाराच्या दृष्टीतून चित्र अदृश्य संगीत असते आणि संगीतकाराच्या दृष्टीतून संगीत हे अमूर्त चित्र असते. संगीत आणि चित्रकलेचा अत्यंत जवळचा संबंध आपण समजून घ्यायला हवा. संगीत शास्त्राचा इतर कलांशी, विज्ञान-तंत्रज्ञानाशी जवळचा संबंध आहे. एकमेकांच्या मदतीनेच प्रत्येक कला पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत असते. म्हणूनच, संगीताचा अभ्यास वेगवेगळया दृष्टीकोनातून होणे आवश्यक आहे. - प्रभा अत्रे

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्याcultureसांस्कृतिक