शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

काेंढवा प्रकरण : बिल्डरांचा अटकपूर्वी जामीन फेटाळला, कुठल्याही क्षणी अटक हाेण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 19:34 IST

काेंढवा येथे सीमाभिंत काेसळून 15 कामागरांचा मृत्यू झाला हाेता. याप्रकरणी कांचन हाऊसिंग बांधकाम कंपनीचे भागीदार पंकज व्हाेरा, सुरेश शहा, ऱश्मीकांत गांधी यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला हाेता. हा अर्ज मंगळवारी न्यायालयाने फेटाळला.

पुणे : काेंढवा येथे सीमाभिंत काेसळून 15 कामागरांचा मृत्यू झाला हाेता. याप्रकरणी कांचन हाऊसिंग बांधकाम कंपनीचे भागीदार पंकज व्हाेरा, सुरेश शहा, ऱश्मीकांत गांधी यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला हाेता. हा अर्ज मंगळवारी न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे तिघा बांधकाम व्यावसायिकांना कुठल्याही क्षणी अटक हाेण्याची शक्यता आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एम. देशपांडे यांनी हा अर्ज फेटाळला. 

काेंढवा येथे भिंत काेसळून 15 कामगारांचा मृत्यू झाला हाेता. याप्रकरणी आल्कन स्टायलस आणि कांचन हाऊसिंग या दाेन्ही इमारतीच्या बांधकाम व्यावसायिकांवर सदाेष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करण्यात आले हाेते. यापैकी आल्कन स्टायलस इमारतीचे बांधकाम व्यावसायिक विवेक सुनिल अगरवाल (वय ३२) आणि विपुल सुनिल अगरवाल (वय ३० दोघे रा. क्लोव्हर हिल्स, एनआयबीएम रस्ता, कोंढवा) यांना पाेलिसांनी अटक केली हाेती. त्यांना न्यायालयाने 2 जुलै पर्यंत पाेलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश दिले हाेते. दरम्यान या दाेन्ही बांधकाम व्यावसायिकांच्या पाेलीस काेठडीत 6 जुलै पर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्याचबराेबर कांचन हाऊसिंग बांधकाम कंपनीचे भागीदार पंकज व्होरा, सुरेश शहा, रश्मीकांत गांधी यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला हाेता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. 

तीनही अर्जदार एकाच कंपनीचे भागीदार आहेत. त्यांचे दुसऱ्या ठिकाणी बांधकामाचे काम सुरू आहे. त्यांनी कामगारांना आवश्यक सुरक्षा व्यवस्था पुरवली होती. दुर्घटनाग्रस्त लेबर कॅम्प हा ठेकेदाराच्यामार्फत उभारण्यात आला होता. संबंधित कॅम्प हा भिंतीपासून दहा फुटाच्या अंतरावर होता. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती स्थापन केली असून अति पावसामुळे ती भिंत पडली आहे, असे समिती स्थापन करण्यासाठीच्या अहवालामध्ये नमूद आहे. या घटनेची जबाबदारी निश्चित करण्यासाठी आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश समितीला देण्यात आले आहे. जबाबदारी निश्चित करण्यापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात सहकार्य करण्यास तयार आहोत. त्यामुळे अटकपूर्व जामीन मिळावा, अशी मागणी बचाव पक्षाचे वकील श्रीकांत शिवदे, सुधीर शहा, नंदिनी देशपांडे,  नीलिमा वर्तक यांनी केली होती. 

दरम्यान इमारतीचा आराखडा, एने,  विकसक करार, सर्वे रिपोर्ट अशी विविध प्रकारचे कागदपत्रे सोमवारी सुनिल अगरवाल आणि विपुल सुनिल अगरवाल यांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत. त्या कागदपत्रांचे विश्लेषण करून त्याबाबत आरोपींकडून माहिती घ्यायची आहे. तसेच ते तपासात सहकार्य करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी तपासी अधिकारी कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांनी केली. सरकार पक्षाच्या वतीने ज्याेती वाघमारे यांनी युक्तिवाद केला. 

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातCourtन्यायालयDeathमृत्यू