शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

अत्याचारांच्या वाढत्या घटनांमुळे देशाच्या सहिष्णुतेला गालबोट : डॉ. शमसुद्दीन तांबोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 8:14 PM

सध्या सगळ्यांनी एकत्र येऊन या सगळ्या विकृती बाहेर काढण्याची गरज आहे. सामाजिक सलोखा हा देशाचा मूलभूत आधार आहे.

ठळक मुद्देतीन गरीब विद्यार्थिनींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकार

पुणे : जम्मू येथे एका मुलीचे अपहरण केले जाते,तिच्यावर अत्याचार केले जातात आणि तिला मारले जाते. समाजात घडणाऱ्या याप्रकारच्या सातत्यपूर्ण घटना माणुसकीला पोषक नाही. अशा प्रसंगांमुळे समाजामध्ये दुरावा निर्माण होतानाच देशाच्या सहिष्णुतेला गालबोट लागत आहे. अशा बिकट परिस्थितीत माणसाने समोरच्या व्यक्तीचा जात, धर्म न पाहता माणूस म्हणून विचार करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे असे प्रसंग घडू नये यासाठी सतर्कता बाळगली पाहिजे, असे मत मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी व्यक्त केले. गणेश पेठेतील श्री पोटसुळ्या मारुती मंडळातर्फे तीन गरीब आणि हुशार विद्यार्थिनींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यात आले. यावेळी इकबाल दरबार, पोटसुळ्या मारुती मंडळाचे कुणाल पवार, ओंकार जाधव, राजेंद्र मांढरे, समीर तिडके, प्रयाग जाधव, साईनाथ मंडळ ट्रस्टचे पीयुष शहा, अभिषेक मारणे, चेतन शिवले, शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला नवले, पर्यवेक्षिका कल्पना कोल्हे, शिक्षक जनार्दन इंगळे उपस्थित होते. कार्यक्रमात तायरा शेख, आयशा शेख, आचल कांबळे या विद्यार्थिनींचे शैक्षणिक पालकत्व मंडळाने स्वीकारले असून मंडळातर्फे साडेचार हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच पुस्तके, वह्या, गणवेश, दप्तर, बूट या शालेय वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. तांबोळी म्हणाले, मुलींवरील अत्याचाराचे दुर्देवी प्रसंग गुजरात आणि उत्तरप्रदेश येथे देखील घडले. या सगळ्या प्रकारामधून समाजात वाढत चाललेली विकृती दिसून येते. सध्या सगळ्यांनी एकत्र येऊन या सगळ्या विकृती बाहेर काढण्याची गरज आहे. प्रत्यक्षात सामाजिक सलोखा हा देशाचा मूलभूत आधार आहे.’

  

टॅग्स :Puneपुणे