शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

सेवा हक्ककायद्यामुळे भ्रष्टाचार होणार कमी - स्वाधीन क्षत्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 01:22 IST

पुणे जिल्ह्यातील सामान्य नागरिकांची कामे अधिक वेगाने व्हावीत तसेच प्रशासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेने सेवा हक्क कायद्याची अंमलबजावणी करून यात आघाडी घेतल्याचे प्रतिपादन, राज्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी काढले.

पुणे - जिल्ह्यातील सामान्य नागरिकांची कामे अधिक वेगाने व्हावीत तसेच प्रशासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेने सेवा हक्क कायद्याची अंमलबजावणी करून यात आघाडी घेतल्याचे प्रतिपादन, राज्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी काढले. मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांचे कौतुक करत, या कायद्यामुळे जिल्ह्यातील विकासकामांना नक्कीच गती मिळेल, असा विश्वासही क्षत्रिय यांनी व्यक्त केला.जिल्हा परिषदेत सेवा हक्क सनियंत्रण कक्षामध्ये मोबाईल सेवा सुरू करण्यात आली असून, त्याचे उद्घाटन आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. त्या वेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सभापती सुजाता पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मित्रगोत्री उपस्थित होते. डॉ. म्हैसेकर म्हणाले, जिल्हा परिषदेचा हा स्तुत्य उपक्रम आहे. अन्य चार जिल्हा परिषदांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येईल. जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते म्हणाले, की जिल्हा परिषदेच्या नावलौकिकामध्ये भर घालण्यात अधिकारी आणि कर्मचारी यांचा सिंहाचा वाटा आहे. अधिकाऱ्यांना व पदाधिकाºयांना नेहमीच योग्य कामासाठी पाठबळ असते. या वेळी १७१ सेवा हक्कामध्ये ग्रामपंचायत विभागातील सर्वाधिक ३१ सेवा या कायद्यामध्ये घेण्यात आल्या आहेत. सेवा बजावण्यात आलेले विभाग: सामान्य प्रशासन विभाग - ३, अर्थ - १५, ग्रामीण विकास यंत्रणा २, आरोग्य २८, पाणी आणि स्वच्छता - ४, महिला व बालकल्याण - ५, शिक्षण प्राथमिक - ९, शिक्षण माध्यमिक ५, शिक्षण निरंतर - ४, ग्रामीण पाणी पुरवठा - ४, लघु पाटबंधारे - ९, बांधकाम (दक्षिण) - १६, बांधकाम (उत्तर) - १६, पशुसंवर्धन ८, समाज कल्याण ४.पुणे जिल्हा परिषद सेवा हक्क कक्ष स्थापन करणारी राज्यातील पहिलीच जिल्हा परिषद आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अधिनस्त हे कक्ष कार्य करणार आहेत. या कायद्याची क्षेत्रीय स्तरावर परिपूर्ण अंमलबजावणी होत नसेल तर, त्याबाबत नागरिकांना तक्रार करण्यासाठी या कक्षामध्ये मोबाईल सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार सेवा हक्क अधिनियमांतर्गत जिल्हा परिषदेच्या कोणत्या कार्यालयात अर्ज केला, आणि त्याचे मुदतीत काम झाले नाही तर संबंधित नागरिकांनी भ्रमणध्वनी, व्हॉट्सअ‍ॅप, ई-मेल, टेलिग्रामद्वारे तक्रार करावी. त्याबरोबर अर्जाची मूळ प्रत पाठवावी. त्यानुसार पुढील तीन दिवसांत त्या तक्रारीचे निराकरण करण्यात येईल.- सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :Puneपुणे