शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर " ही " जोखीम पत्करणे कितपत योग्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 13:21 IST

मुंबई विमानतळावर उतरल्यावर ‘होम क्वारंटाईन’चा स्टॅम्प मारलेला नागरिक घरी पोहोचेपर्यंत अनेकांच्या संपर्कात येऊ शकतो.

ठळक मुद्दे नागरिकांचे प्रश्न : प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याची अपेक्षा

पुणे : केंद्र सरकारच्या यादीत समाविष्ट नसलेल्या देशांतून आलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाली असेल तर काय? त्यांच्यामार्फत कोरोनाचा उद्रेक होण्याची चिन्हे असताना अशा पर्यटकांबाबत केंद्रातर्फे काय पावले उचलली जात आहेत? मुंबई विमानतळावर उतरल्यावर ‘होम क्वारंटाईन’चा स्टॅम्प मारलेला नागरिक घरी पोहोचेपर्यंत अनेकांच्या संपर्कात येऊ शकतो. अशी जोखीम पत्करणे धोक्याचे नाही का? घरातील विलगीकरणाची प्रवाशांकडून प्रभावी अंमलबजावणी होते का? असे अनेक प्रश्न कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गांभीर्याने उपस्थित केले जात आहेत. चीन, इटली, इराण, कोरिया, फ्रान्स, स्पेन, जर्मनी या देशांना केंद्र सरकारने कोरोनाबाधित देश घोषित केले आहेत. परंतु, राज्यात कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांमध्ये या देशाव्यतिरिक्त इतर ठिकाणांहून आलेल्या नागरिकांची संख्या अधिक आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विचारले असता, ‘केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सात देशांच्या यादीत आणखी तीन देशांचा समावेश केला आहे. या देशांव्यतिरिक्त इतर देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची प्राथमिक तपासणी विमानतळावर करण्यात येते. परंतु, त्यांना क्वारंटाईन करता येत नाही. आम्ही केंद्र सरकारकडे सर्वच देशांमधून येणाऱ्या नागरिकांबाबत क्वारंटाईनचे धोरण राबवता येईल का? याबाबत विचारणा करीत आहोत. सद्य:स्थितीत आम्ही केंद्राने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत आहोत,’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. मुंबई विमानतळावर उतरल्यावर प्रवाशांचे ‘टेंपरेचर’ तपासले जात आहे. काही पर्यटकांकडून ‘सेल्फ डिक्लरेशन’चा अर्ज भरून घेऊन, ‘होम क्वारंटाईन’चा शिक्का हातावर मारून सोडून दिले जात आहे. बुधवारी पहाटे जर्मनीतून दुबईमार्गे मुंबई विमानतळावर दोन व्यक्ती आल्या. त्यांपैैकी एका व्यक्तीचे वय ६० हून अधिक असल्याने व इतर आजारांची पार्श्वभूमी असल्याने डॉक्टरांच्या टीमकडून पुढील तपासण्यांसाठी मुंबईतील रुग्णालयात दोन-तीन दिवसांसाठी तिला दाखल करून घेतले आहे. दुसऱ्या व्यक्तीचे केवळ ‘टेंपरेचर’ तपासून हातावर शिक्का मारला आणि १४ दिवसांसाठी घरीच विलगीकरण करून राहण्यास तिला सांगितले. ती व्यक्ती कॅबने मुंबईहून पुण्याला आली. ‘होम क्वारंटाईन’चा नेमका अर्थ काय? संबंधित व्यक्तीने इतरांच्या संपर्कात येण्यास परवानगी आहे की नाही? अशा शंकाचे निरसन आरोग्य विभागाकडून केले जावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांना त्यांच्याच घरात विलगीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबई आणि पुणे विमातळावर येणारे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या जाणाऱ्या नागरिकांतर्फे कॅबचालक, त्यांचे नातेवाईक यांना कोरोनाची बाधा होऊ शकते. घरात विलगीकरण करून राहण्याबाबत नागरिकांकडून प्रभावी अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे विमानतळाजवळच्या उपलब्ध इमारतींमध्ये प्रवाशांना क्वारंटाईन करण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्यास कोरोनाचा उद्रेक रोखता येईल, अशा स्वरूपाचे निवेदन महापौैर मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. ००० जगभरात कोरोनाचा प्रसार शंभराहून अधिक देशांमध्ये झाला आहे. त्यातही चीन, इटली, इराण, कोरिया, फ्रान्स, स्पेन, जर्मनी या सात देशांमधून येणाऱ्या  नागरिकांची कसून तपासणी विमानतळावर करण्यात येते. परंतु, याव्यतिरिक्त इतर देशांमधून येणाऱ्या नागरिकांची विमानतळावर प्राथमिक तपासणी करून त्यांना सोडण्यात येते. केंद्र शासनाच्या प्रोटोकॉलनुसार सर्वाधिक कोरोनाबाधित सात देशांमधील प्रवाशांनाच आयसोलेशन करता येणे शक्य असल्याने इतर देशांमधील प्रवासी या प्रक्रियेतून बाहेर पडत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसairplaneविमानAirportविमानतळcarकारpassengerप्रवासी