शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..."
2
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
4
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
5
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
6
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
7
'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
8
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
9
देशात कर दहशतवाद थांबवला पाहिजे; सत्तेत येताच कुठल्या ५ गोष्टी उद्धव ठाकरे करणार?
10
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
11
Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?
12
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
13
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन
15
मतदान केंद्रावर गेली पण मतदानच करता आलं नाही, सावनी रविंद्रबरोबर नेमकं काय घडलं?
16
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
17
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
18
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
19
Life Lesson : अस्थिर, अशांत, अविवेकी मनाला शांत कसं करायचं? उपाय सांगताहेत गौर गोपाल दास!
20
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद

coronavirus : मुंबई विमानतळावरुन पुण्यात आलेल्यांना करण्यात येणार हाेम क्वारनटाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 8:40 PM

परदेशातून आलेल्या नागरिकांमधील काही नागरिकांना काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आल्याने मुंबई विमानतळावरुन पुण्यात आलेल्या नागरिकांना हाेम क्वारनटाईन करण्यात येणार आहे.

पुणे : केंद्र सराकराने काेराेनाबाधित शहरांच्या व्यतिरिक्त इतर देशांमधून मुंबई विमानतळावर आलेल्या आणि तेथून पुण्यात आलेल्या नागरिकांना आता हाेम क्वारनटाईन करण्यात येणार आहे. गेल्या दाेन दिवसांपासून जे इतर देशांमधून पुण्यात आले आहेत त्यांच्या हातावर हाेम क्वारनटाईनचा शिक्का मारुन त्यांना चाैदा दिवस घरात विलग राहण्यास सांगण्यात येणार असल्याचे पुण्याचे विभागीय आयुक्त डाॅ. दीपक म्हैसेकर यांनी स्पष्ट केले. 

केंद्र सरकारने जगभरातील सात देश सर्वाधिक काेराेनाबाधित देश म्हणून घाेषित केले आहेत. त्यात आणखी चार देशांची वाढ करण्यात आली आहे. या देशातून येणाऱ्या नागरिकांची विमानतळावर तपासणी करुन त्यांना लक्षणे असल्यास विलगीकरण केंद्रात पाठविण्यात येते. तसेच इतरांना घरीच विलग राहण्यास सांगण्यात येते. परंतु या देशांव्यतिरिक्त इतर देशांमधून येणाऱ्या नागरिकांची प्राथमिक तपासणी करुन त्यांना घरी साेडण्यात येत हाेते. राज्यात काेराेनाबाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये केंद्राने जाहीर केलेल्या सात देशांच्या व्यतिरिक्त इतर देशांमधून आलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आता मुंबई विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्यात येणार असून ज्यांना काेराेनाची लक्षणे आहेत त्यांना विलगीकरण केंद्रात पाठविण्यात येणार आहे. तर इतर प्रवाशांच्या हातावर हाेम क्वारनटाईनचा शिक्का मारुन त्यांना काही दिवस घरीच राहण्यास सांगण्यात येणार आहे. 

दरम्यान गेल्या दाेन दिवसांपासून विदेशातून मुंबई विमानतळावर उतरुन पुण्यात आलेल्या नागरिकांचा देखील शाेध घेण्यात येणार आहे. त्यांच्या हातावर हाेम क्वारनटाईनचा शिक्का मारुन त्यांना काही दिवस घरीच विलग राहण्याच्या सुचना देण्यात येणार आहेत. ज्या नागरिकांना हाेम क्वारनटाईन राहण्यास सांगण्यात आले आहे, ते इतरत्र बाहेर फिरत नाहीत ना हे तपासण्यासाठी विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. असे काेणी आढळल्यास त्यांना ताब्यात घेऊन इन्स्टिट्युशनल क्वारनटाईन करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणेMumbaiमुंबई