शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
3
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
4
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
5
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
6
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
7
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
8
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
9
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
10
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
11
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
12
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
13
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
14
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
15
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
16
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
17
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
18
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

CoronaVirus News : चाचण्यांची क्षमता खूप, प्रमाण मात्र अद्याप कमीच- डॉ. रमण गंगाखेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 1:06 AM

सध्या रोज २ लाख ८० हजार चाचण्या करत आहोत, असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या साथरोग व संसर्गजन्य आजार विभागाचे निवृत्त प्रमुख, पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले.

पुणे : कोरोनाचा संसर्ग वाढत असलेल्या भागात जास्तीत जास्त चाचण्या व्हायलाच हव्यात, यात दुमत नाही. अजूनही चाचण्या करण्याची आपली खूप क्षमता आहे. पण पहिल्या दिवसापासून आपण आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर केलेला नाही. सध्या रोज २ लाख ८० हजार चाचण्या करत आहोत, असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या साथरोग व संसर्गजन्य आजार विभागाचे निवृत्त प्रमुख, पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले. लक्षणे असलेल्या व संपर्कातील व्यक्तींनी पुढे यावे. न घाबरता चाचणी करायला हवी, असे आवाहनही त्यांनी केले.डॉ. गंगाखेडकर म्हणाले, बाहेर फिरणे, अनेक लोकांच्या संपर्कात येणे हे संसर्ग वाढण्याचे मुख्य कारण आहे. हे प्रमाण किती आहे, कुणी सांगु शकत नाही. आता पुण्यात लॉकडाऊन लावले, याचा विचार आडाख्यांमध्ये केला जात नाही. ही गंभीर आरोग्य समस्या बनल्याने १० लाख किंवा ५० लाख लोकांना लागण झाली काय, याने फरक पडणार नाही. अशा परिस्थतीत आपल्याला किती संसर्ग होऊ शकतो, याचा विचार करून त्यावर नियंत्रण आणणे जरुरीचे आहे.दहा दिवसांनी चाचणीन करणे योग्यचसध्याची रुग्णसंख्या पाहता आपल्याकडे खाटांची संख्या पुरेशी आहे. पण खाटा कमी पडतील, अशी वेळ येऊ शकते. आपण लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेल्यांना घरी ठेवत आहोत. घरी सोडण्याचे धोरणही बदलत आहोत. दहा दिवसांनी चाचणी न करता रुग्णांना घरी सोडले जात आहे. या रुग्णांची चाचणी केली तर ‘आरटी पीसीआर’मध्ये रुग्णाच्या शरीरात विषाणू असल्याचे दिसते. ते जिवंत आहेत की नाही, हे कळत नाही. सर्वसाधारणपणे लक्षणे सुरू झाल्यानंतर दहा दिवसांनी शरीरातील विषाणू मृत झालेला असतो. पण चाचणीमध्ये त्याचे अस्तित्व दिसते. त्यामुळे ससंंर्ग होण्याचा धोका नाही.हर्ड इम्युनिटीची वाट पाहायला नकोसामुहिक प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी किमान ६० लोकसंख्येला संसर्ग व्हावा लागेल. तेवढ्या लोकसंख्येमध्ये मृतांचा आकडा खूप मोठा असेल. हे आपल्याला परवडणारे नाही. त्यामुळे हर्ड इम्युनिटीचा विचार करणेही चुकीचे ठरेल. संसर्ग होऊ नये, म्हणूनच दक्षता घ्यायला हवी.कॉन्टॅक्ट ट्रेसिंगला मर्यादासुरूवातीला रुग्णसंख्या कमी असल्याने बाधित व्यक्तीचे संपर्क शोधणे शक्य होत होते. रुग्णसंख्या वाढत असताना हे शोधणे कठीण असते. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे धोरण आपण बदललेले नाही. ते करणे आजही अपेक्षित आहे. समजा पाच हजार लोकांना लागण झाली असेल तर घरी पाठवायला तेवढे मनुष्यबळही हवे. यासाठी समाजाने, सामाजिक संस्थांनी पुढे यावे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस