शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

'कोरोना वॉरियर्स' आशा सेविकेच्या बलिदानाची केंद्राकडून दखल; कुटुंबाला मिळाली ५० लाखांची मदत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 21:57 IST

कोरोनाशी लढताना आशा सेविका मंगल बलकवडे यांचा गेल्या वर्षी मृत्यू झाला. त्यांच्या या बलिदानाची केंद्र सरकारने घेतली दखल, पुणे जिल्ह्यातील पहिलेच कुटुंब

पुणे/हिंजवडी : कोरोना काळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने नेमून दिलेले सर्वेक्षण तसेच कोरोनाबाधितांची माहिती गोळा करत माण येथील आशासेविका मंगल बलकवडे यांना कोरोनाने ग्रासले. कोरोनाशी लढताना त्यांचा गेल्या वर्षी मृत्यू झाला. त्यांच्या या बलिदानाची केंद्राने दखल घेतली असून आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या पंतप्रधान गरीब कल्याण विमा योजनेंअंतर्गत त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांचा धनादेश देण्यात आला आहे. जिल्ह्यातील अशा प्रकारची मदत मिळालेले बलकवडे हे पहिलेच कुटुंबीय ठरले आहे.

आयटीनगरी माण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेविका म्हणून मंगल बनसोडे कार्यरत होत्या. त्या माण येथील बोडकेवाडी येथे वास्तव्यास होत्या. माण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी काम करत होत्या. कोरोना महामारीच्या अगदी सुरुवातीपासून कोरोनाबाधित रुग्णांना धीर देणे, नजिकच्या आरोग्य केंद्रात पाठवणे, रुग्णवाहिका आणि बेड मिळवून देणे, घरोघरी जाऊन ग्रामस्थांचे सर्व्हेक्षण करून संशयित कोरोना रुग्णांचा शोध घेणे, रुग्णांची माहिती घेणे, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे गृहविलगीकरण करणे आदी कामात त्या महत्त्वाची भूमिका बजावत होत्या. माण प्राथमिक आरोग्य केंद्रात आपले कर्तव्य बजावत असतानाच त्या कोरोनाबाधित झाल्या होत्या. मात्र, कोरोनाशी लढताना त्यांचे ६ सप्टेंबर २०२० ला निधन झाले. कोरोना लढ्यात त्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता चांगली सेवा बजावली.

दरम्यान, त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत फ्रंटलाईन वर्कर्ससाठी असलेल्या नियोजित विम्याची रक्कम त्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ मिळावी यासाठी माण ग्रामपंचायत आग्रही होती. त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने, पंचायत समिती मुळशीच्या माध्यमातून जिल्हा परिषदकडे पाठपुरावा केला होता. अखेर बलकवडे यांच्या कुटुंबीयांना विम्याची रक्कम मिळाली, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी सांगितले. ----

पुणे जिल्ह्यात ४१ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यूजिल्हा परिषदेच्या १ हजार २४१ कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाने ग्रासले आहे. तर १ हजार १८७ जण कोरोनातून बरे झाले आहे. या पैकी ४१ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मृत कर्मचाऱ्यांना कुटुंबीयांना विम्याची रक्कम देण्यासाठी प्रशासनातर्फे सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. लवकरच केंद्राकडे त्यांचे प्रस्ताव पाठवले जाणार असून त्यांनाही प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत विमा योजने अंतर्गत मदत मिळवून दिली जाणार आहे.

प्राथमिक आरोग्य माण बोडकेवाडी येथे मंगल बलकवडे या २००८ पासून आशासेविका या पदावर मानधनावर कार्यरत होत्या. त्यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ, सुशील आणि प्रामाणिक होता. नेहमी हसतमुखाने न कंटाळता समाजात तळागळातील लोकांना आरोग्य सेवा मनोभावे देऊन त्या सामाजिक बांधिलकी जपत होत्या. मार्च २०२० पासून कोरोना विषाणूजन्य आजाराने थैमान घातले होते. तेव्हा त्यांनी स्वत: जीवाची पर्वा न करता रात्र दिवस कोरोना रुग्णांची काळजी घेणे, धीर देत रुग्णालयात पाठविणे, तसेच त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, सर्व्हेक्षण करून संशयित रुग्णांचा शोध घेऊन खऱ्या अर्थाने त्या कोरोना योद्धा म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या या कार्याचे आज खऱ्या अर्थाने चीज झाले आहे.

टॅग्स :Puneपुणेhinjawadiहिंजवडीcorona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकारDeathमृत्यू