शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

'कोरोना वॉरियर्स' आशा सेविकेच्या बलिदानाची केंद्राकडून दखल; कुटुंबाला मिळाली ५० लाखांची मदत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 21:57 IST

कोरोनाशी लढताना आशा सेविका मंगल बलकवडे यांचा गेल्या वर्षी मृत्यू झाला. त्यांच्या या बलिदानाची केंद्र सरकारने घेतली दखल, पुणे जिल्ह्यातील पहिलेच कुटुंब

पुणे/हिंजवडी : कोरोना काळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने नेमून दिलेले सर्वेक्षण तसेच कोरोनाबाधितांची माहिती गोळा करत माण येथील आशासेविका मंगल बलकवडे यांना कोरोनाने ग्रासले. कोरोनाशी लढताना त्यांचा गेल्या वर्षी मृत्यू झाला. त्यांच्या या बलिदानाची केंद्राने दखल घेतली असून आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या पंतप्रधान गरीब कल्याण विमा योजनेंअंतर्गत त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांचा धनादेश देण्यात आला आहे. जिल्ह्यातील अशा प्रकारची मदत मिळालेले बलकवडे हे पहिलेच कुटुंबीय ठरले आहे.

आयटीनगरी माण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेविका म्हणून मंगल बनसोडे कार्यरत होत्या. त्या माण येथील बोडकेवाडी येथे वास्तव्यास होत्या. माण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी काम करत होत्या. कोरोना महामारीच्या अगदी सुरुवातीपासून कोरोनाबाधित रुग्णांना धीर देणे, नजिकच्या आरोग्य केंद्रात पाठवणे, रुग्णवाहिका आणि बेड मिळवून देणे, घरोघरी जाऊन ग्रामस्थांचे सर्व्हेक्षण करून संशयित कोरोना रुग्णांचा शोध घेणे, रुग्णांची माहिती घेणे, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे गृहविलगीकरण करणे आदी कामात त्या महत्त्वाची भूमिका बजावत होत्या. माण प्राथमिक आरोग्य केंद्रात आपले कर्तव्य बजावत असतानाच त्या कोरोनाबाधित झाल्या होत्या. मात्र, कोरोनाशी लढताना त्यांचे ६ सप्टेंबर २०२० ला निधन झाले. कोरोना लढ्यात त्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता चांगली सेवा बजावली.

दरम्यान, त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत फ्रंटलाईन वर्कर्ससाठी असलेल्या नियोजित विम्याची रक्कम त्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ मिळावी यासाठी माण ग्रामपंचायत आग्रही होती. त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने, पंचायत समिती मुळशीच्या माध्यमातून जिल्हा परिषदकडे पाठपुरावा केला होता. अखेर बलकवडे यांच्या कुटुंबीयांना विम्याची रक्कम मिळाली, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी सांगितले. ----

पुणे जिल्ह्यात ४१ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यूजिल्हा परिषदेच्या १ हजार २४१ कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाने ग्रासले आहे. तर १ हजार १८७ जण कोरोनातून बरे झाले आहे. या पैकी ४१ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मृत कर्मचाऱ्यांना कुटुंबीयांना विम्याची रक्कम देण्यासाठी प्रशासनातर्फे सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. लवकरच केंद्राकडे त्यांचे प्रस्ताव पाठवले जाणार असून त्यांनाही प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत विमा योजने अंतर्गत मदत मिळवून दिली जाणार आहे.

प्राथमिक आरोग्य माण बोडकेवाडी येथे मंगल बलकवडे या २००८ पासून आशासेविका या पदावर मानधनावर कार्यरत होत्या. त्यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ, सुशील आणि प्रामाणिक होता. नेहमी हसतमुखाने न कंटाळता समाजात तळागळातील लोकांना आरोग्य सेवा मनोभावे देऊन त्या सामाजिक बांधिलकी जपत होत्या. मार्च २०२० पासून कोरोना विषाणूजन्य आजाराने थैमान घातले होते. तेव्हा त्यांनी स्वत: जीवाची पर्वा न करता रात्र दिवस कोरोना रुग्णांची काळजी घेणे, धीर देत रुग्णालयात पाठविणे, तसेच त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, सर्व्हेक्षण करून संशयित रुग्णांचा शोध घेऊन खऱ्या अर्थाने त्या कोरोना योद्धा म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या या कार्याचे आज खऱ्या अर्थाने चीज झाले आहे.

टॅग्स :Puneपुणेhinjawadiहिंजवडीcorona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकारDeathमृत्यू