शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

Corona virus : कोरोनाच्या मृत्युदराबाबत घाबरून जाण्याचे कारण नाही : डॉ. अनंत फडके 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 15:57 IST

आपल्याकडील मृत्युदर जास्त नाही, हे वर्षभरानंतर आपल्या लक्षात येईल.

ठळक मुद्दे रुग्णसंख्या झपाट्याने वाढू नये यासाठी लॉकडाऊनचे नियम पाळावेच लागतील

प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : स्वाइन फ्लूमुळे होणाऱ्या मृत्यूचा दर सुरुवातीला १ ते २ टक्के असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, संशोधनाअंती मृत्युदर 0.02 टक्के इतकाच होता, असे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले होते. कोरोनाच्या बाबतीत 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले लोक, उच्च रक्तदाब, मधुमेह व स्थूलता असे आजार असलेले रुग्ण यांना लागण होण्याचा जास्त धोका आहे. त्यामुळे त्यांची आपल्याला खास काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळेच आपल्याकडील मृत्युदर जास्त नाही, हे वर्षभरानंतर आपल्या लक्षात येईल. लागण झालेल्यापैकी 99 टक्के लोक हे पूर्णपणे बरे होणार आहेत. त्यामुळे मृत्युदर पाहून आपण घाबरून जाण्याची गरज नाही, असे मत जनआरोग्य अभियानाचे डॉ. अनंत फडके यांनी 'लोकमत'शी बोलताना स्पष्ट केले. कोरोनाविरोधातील लढाई लढण्यासाठी सहा आठवड्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे असंघटित क्षेत्रातील लोकांचे खूपच हाल होत आहेत. या बाबतीतही शासन शासन पातळीवर गांभीयार्ने विचार व्हायला हवा, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

------१) कोरोनामुळे होणा?्या मृत्यूदराचे विश्लेषण कशा पद्धतीने करता येईल?- एखादी साथ पसरते तेव्हा ५० % लोकांना लागण होऊनही काहीच लक्षणे दिसत नाहीत. अशा लोकांच्या रक्तामध्ये त्या आजाराविरोधात प्रतिकारशक्ती निर्माण होते. उर्वरित पन्नास टक्के रुग्णांमध्ये आजाराची लक्षणे दिसतात. त्यामध्येही ८०% रुग्णांमध्ये ही लक्षणे सौम्य स्वरूपाची असतात. १५ % लोकांना मध्यम स्वरूपाची लक्षणे दिसतात आणि फक्त ५ % लोकांमध्ये तो आजार गंभीर स्वरूपाचा होतो आणि त्यांच्या जिवाला धोका निर्माण होतो. म्हणजेच लागण झालेल्या रुग्णांपैकी एक टक्के लोकांचा मृत्यू होतो. सध्या मृत्युदराचे विविध आकडे पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये आपल्याकडील मृत्यूदर जास्त असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, लागण झालेल्या रुग्णांपैकी किती लोकांचा मृत्यू झाला, हे सांगणे सध्या अवघड आहे. कारण, अद्याप आपण लागण झालेल्या सर्व रुग्णांपर्यंत पोहोचू शकलेलो नाही. हा अभ्यास पूर्ण होईल, तेव्हा मृत्युदर प्रत्यक्षात एक टक्क्यापर्यंत कमी असल्याचे लक्षत येईल.

* आपल्याकडे हर्ड इम्युनिटी निर्माण होत आहे का?- तज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाची लागण झालेल्या 60 ते 70 टक्के लोकांमध्ये आजाराविरोधात प्रतिकारशक्ती निर्माण होत आहे. त्यामुळे उरलेल्या 30 ते 40 टक्के लोकांचे या आजारापासून आपोआपच संरक्षण होणार आहे. यालाच हर्ड इम्युनिटी अर्थात समूह प्रतिकारशक्ती असे म्हटले जाते. हर्ड इम्युनिटी निर्माण झाल्यास हा अधिक प्रमाणात नियंत्रणात येणार आहे. त्यासाठी आपल्याला सध्या सुरू असलेले प्रयत्न अधिक वेगाने करावे लागतील. जास्तीत जास्त लोकांचे लवकरात लवकर निदान करणे, त्यांचे विलगीकरण करणे, उपचार देणे, त्यांना सामान्य लोकांच्या संपर्कात येऊ न देणे आणि महत्त्वाचे म्हणजे रुग्णांना दोषी अथवा गुन्हेगार न समजता त्यांना मदतीचा हात देणे, या गोष्टी कराव्या लागतील.

३) लॉकडाऊननंतरचे चित्र कसे असू शकते?

- सध्याच्या परिस्थितीत अजिबात घराबाहेर न पडणे, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर जाणे, दोन व्यक्तींमध्ये किमान दोन मीटर सुरक्षित अंतर ठेवणे, मास्कचा वापर करणे आणि सातत्याने हात धुणे या सर्व गोष्टी पाळल्या तर आपण साथीचा वेग कमी करू शकू. या सर्व गोष्टींचे पालन न केल्यास पुढील काही काळात रुग्णांची संख्या लाखोंनी वाढली तर त्यातील दहा टक्के रुग्णांना सामावून घेण्याइतकीही आपल्या आरोग्य यंत्रणेची क्षमता नाही. रुग्णांची संख्या एकदम न वाढल्यास आपण साथीला अधिक चांगल्या पद्धतीने तोंड देऊ शकू. म्हणून साथीचा वेग कमी करूया आणि वाढत्या रुग्णसंख्येला न घाबरता चांगल्या पद्धतीने सामना करूया.

४) कोरोना चाचण्यांबाबत काय सांगाल?-कोरोनाच्या चाचण्याबद्दल काही बाबी जाणून घेऊ. आपल्याला कोरोना तर झालेला नाही ना या भीतीने अनेक नागरिकांना असे वाटत आहे की आपण आपली चाचणी करून घ्यावी आणि एकदाचा सोक्षमोक्ष लावावा. परंतु, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशी टेस्ट करून घेण्याचा काहीही उपयोग नाही. कोरोनाचे निदान करण्यासाठी दोन पद्धतीच्या चाचण्या केल्या जातात. पहिली म्हणजे घशातील स्त्रावाची तपासणी. ही चाचणी अत्यंत महाग आहे. सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे या चाचणीचा दर चार हजार ते साडेचार हजार रुपये आहे. खाजगी प्रयोगशाळांमध्ये यापेक्षा अधिक खर्च येऊ शकतो. आपल्याला लागण झाल्याचा डॉक्टरांना संशय आला असेल तरच डॉक्टर चाचणी करून घेण्याबाबत सल्ला देतात. आपल्या मनातील भीती कमी करण्यासाठी किंवा पैसे आहेत म्हणून चाचणी करुन घेण्याचा काहीही उपयोग नाही.दुस?्या प्रकारची चाचणी म्हणजे रक्ताची तपासणी. ती चाचणी सध्या स्वस्त आहे आणि नवीन आहे. या चाचणीचे रिझल्ट कशा पद्धतीचे आहेत, याबाबत अद्याप अभ्यास सुरू आहे. काही त्रुटी आढळून आल्याने सध्या या पद्धतीचा करू नका असे आयसीएमआरने सुचवले आहे. समाजातील किती लोकांना लागण झाली आहे, याची प्राथमिक चाचणी करण्यासाठी अशा पद्धतीची तपासणी गरजेची आहे. मात्र किती लोकांची चाचणी करायची याबाबत शासकीय यंत्रणांकडून निर्णय घेतला जात आहे. चाचण्यांमध्ये अधिक संशोधन झाल्यास, त्यामध्ये सुधारणा झाल्यास पुढचा निर्णय घेतला जाऊ शकतो. आपल्या रक्तामध्ये एखाद्या आजाराविरोधात काही अँटीबॉडीज निर्माण होत असतात. म्हणजेच आपल्या रक्तामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झालेली आहे की नाही हे या चाचणीवरून ठरवता येते, असे संशोधनातून सिद्ध झाल्यास त्यांचे प्रमाण वाढवले जाऊ शकते. हे सर्व होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागेल.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल