शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

Corona virus : शारीरिक व्यायामासारखाच मनाचा व्यायामही गरजेचाच : डॉ. संज्योत देशपांडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 07:00 IST

लॉकडाऊनचा मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या व्यक्तींवर विपरीत परिणाम कोरोनाच्या लढ्यात अशी वाढवा मनशक्ती

ठळक मुद्देकोरोनाच्या लढ्यात अशी वाढवा मनशक्ती

राजू इनामदारपुणे: कोरोना विषाणूच्या विरोधात जगभर लढाई सुरू आहे. सामान्य नागरिकांपासून ते जगभरच्या देशांचे प्रमुख या लढाईत उतरले आहेत. यात सामान्यांचे मनोबल ढासळू नये यासाठी काही मानसोपचार तज्ञही स्वत: होऊन सक्रिय झाले आहेत. डॉ. संज्योत देशपांडे त्यापैकीच एक. त्यांनी रोज फेसबूक संवाद सुरू केला आहे. त्याचा अनेकांना फायदाही होत आहे. या संचारबंदीचा व त्याही अनिश्चित काळासाठी असलेल्या लॉकडाऊनचा मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या व्यक्तींवर विपरीत परिणाम होऊ शकतो असे मत त्यांनी व्यक्त केले.नेमकी त्याचवेळी नाशिक येथे एका युवकाने त्याला कोरोना झाला आहे अशा समजातून आत्महत्या केली अशी बातमी आली.   तोच धागा पकडून लोकमत ने डॉ. देशपांडे यांच्याबरोबर बातचीत केली.नक्की कोणावर आणि काय परिणाम होतो अशा वातावरणाचा?-- सध्या सगळे वातावरणच अनिश्चित आहे. किती काळ हा लॉकडाऊन असेल, त्यातून किती आणि काय नूकसान होणार असे अनेक प्रश्न भेडसावत आहेत. सुदृढ मनाच्या व्यक्तींनीही हताश व्हावे अशा या काळात मानसिक द्रष्ट्या कमकूवत असलेल्यांच्या मनावर काय परिणाम होत असेल याचा नूसता विचार केला तरी अंगावर शहारे येतात. त्यामुळेच मी यात सर्वांबरोबरच संवाद साधण्याचा निर्णय घेतला. कमकूवत मनाच्या व्यक्ती फार कमी बोलतात. आतल्याआत विचार करतात. ऊत्तर मिळत नसल्याने खचत जातात. आता सगळे संपले असे विचार त्यांच्या मनात येऊ लागतात. त्यांना सावरायला कोणी नसले की मग याचा शेवट नको असलेलाच होतो. हे एक प्रकारचे मानसिक चक्रच आहे. त्यात गूंतत जायला होते व नंतर ते वाढतच जाते.अशा वेळी काय करायला हवे?-- अशा वेळी त्या व्यक्तीच्या निकटच्या लोकांनी त्याच्याजवळ रहायला हवे. त्याच्या भावनांची चेष्टा न करता त्या समजावून घेऊन त्याची समजूत काढायला हवी. प्रसंगी तूझे बरोबर आहे, पण आम्ही तूज्याबरोबर आहोत, यातून आपण बाहेर पडणार आहोत हा विश्वास त्याला द्यायला हवा. इतक्या साध्या गोष्टीनेही मोठा फरक पडू शकतो. त्याचे बिथरणारे मन जागेवर येऊ शकते.प्रत्यक्ष त्या व्यक्तीने काय करायला हवे?-- जे काम करत आहोत त्या कामात लक्ष एकाग्र करावे. हा एक प्रकारचा एक्झरसाईजच आहे. जेवण करत असाल तर जेवण कसे आहे, चव कशी आहे याचा विचार करावा. प्रत्येक वेळी फक्त संकटाचाच विचार करण्याची लागलेली सवय यातून कमी होते. अशा व्यक्तींना छोटीछोटी कामे सांगावीत व त्यात ते गुंतून राहतील असे पहावे.शक्यतो त्यानी स्वत:ही आपल्याला एक दिनक्रम लावून घ्यावा. त्याचबरोबर आपल्याला काय वाटते आहे, नक्की कशाची भीती वाटते आहे याविषयी त्यांनी निकटच्या व्यक्तीबरोबर मोकळेपणाने बोलावे. तसे कोणी नसेल तर काय वाटते ते लिहून काढावे. यातून मन मोकळे होते. त्यावरचा ताण कमी होतो. ताण कमी करण्याचे किंवा तो सहन करण्याची क्षमता वाढवण्याचे हे ऊपाय आहेत. मनोविकाराच्या प्राथमिक स्वरूपात ते फार ऊपयोगी पडतात.आणखी कोणते उपाय आहेत?भूतकाळ भविष्यकाळ यात रमू नये. वर्तमानात रहायला शिकावे. मूख्य म्हणजे जो विषय सुरू आहे, त्याच्याशी संबधित अशा फक्त विश्वासार्ह, खात्रीशीर बातम्याच पहाव्यात, ऐकाव्यात. आताच्या सोशल मिडियात काहीही येत असते. ते वाचनात पाहण्यात आले की त्याचाच विचार येत राहतो. खंबीर होत असलेले मन पुन्हा खचू लागते. त्यामुळे अशा गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. शरीराला मजबूत करण्यासाठी व्यायाम आवश्यक तसेच मन खंबीर करण्यासाठी मनालाही व्यायामाची गरज असते. विशेषत: अशा लॉकडाऊनच्या, कोरोनासारख्या विषाणूच्या विळख्यात सगळे जग सापडलेले असताना ती जास्त असते. म्हणूनच याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याMeditationसाधना