शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

Corona virus : शारीरिक व्यायामासारखाच मनाचा व्यायामही गरजेचाच : डॉ. संज्योत देशपांडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 07:00 IST

लॉकडाऊनचा मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या व्यक्तींवर विपरीत परिणाम कोरोनाच्या लढ्यात अशी वाढवा मनशक्ती

ठळक मुद्देकोरोनाच्या लढ्यात अशी वाढवा मनशक्ती

राजू इनामदारपुणे: कोरोना विषाणूच्या विरोधात जगभर लढाई सुरू आहे. सामान्य नागरिकांपासून ते जगभरच्या देशांचे प्रमुख या लढाईत उतरले आहेत. यात सामान्यांचे मनोबल ढासळू नये यासाठी काही मानसोपचार तज्ञही स्वत: होऊन सक्रिय झाले आहेत. डॉ. संज्योत देशपांडे त्यापैकीच एक. त्यांनी रोज फेसबूक संवाद सुरू केला आहे. त्याचा अनेकांना फायदाही होत आहे. या संचारबंदीचा व त्याही अनिश्चित काळासाठी असलेल्या लॉकडाऊनचा मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या व्यक्तींवर विपरीत परिणाम होऊ शकतो असे मत त्यांनी व्यक्त केले.नेमकी त्याचवेळी नाशिक येथे एका युवकाने त्याला कोरोना झाला आहे अशा समजातून आत्महत्या केली अशी बातमी आली.   तोच धागा पकडून लोकमत ने डॉ. देशपांडे यांच्याबरोबर बातचीत केली.नक्की कोणावर आणि काय परिणाम होतो अशा वातावरणाचा?-- सध्या सगळे वातावरणच अनिश्चित आहे. किती काळ हा लॉकडाऊन असेल, त्यातून किती आणि काय नूकसान होणार असे अनेक प्रश्न भेडसावत आहेत. सुदृढ मनाच्या व्यक्तींनीही हताश व्हावे अशा या काळात मानसिक द्रष्ट्या कमकूवत असलेल्यांच्या मनावर काय परिणाम होत असेल याचा नूसता विचार केला तरी अंगावर शहारे येतात. त्यामुळेच मी यात सर्वांबरोबरच संवाद साधण्याचा निर्णय घेतला. कमकूवत मनाच्या व्यक्ती फार कमी बोलतात. आतल्याआत विचार करतात. ऊत्तर मिळत नसल्याने खचत जातात. आता सगळे संपले असे विचार त्यांच्या मनात येऊ लागतात. त्यांना सावरायला कोणी नसले की मग याचा शेवट नको असलेलाच होतो. हे एक प्रकारचे मानसिक चक्रच आहे. त्यात गूंतत जायला होते व नंतर ते वाढतच जाते.अशा वेळी काय करायला हवे?-- अशा वेळी त्या व्यक्तीच्या निकटच्या लोकांनी त्याच्याजवळ रहायला हवे. त्याच्या भावनांची चेष्टा न करता त्या समजावून घेऊन त्याची समजूत काढायला हवी. प्रसंगी तूझे बरोबर आहे, पण आम्ही तूज्याबरोबर आहोत, यातून आपण बाहेर पडणार आहोत हा विश्वास त्याला द्यायला हवा. इतक्या साध्या गोष्टीनेही मोठा फरक पडू शकतो. त्याचे बिथरणारे मन जागेवर येऊ शकते.प्रत्यक्ष त्या व्यक्तीने काय करायला हवे?-- जे काम करत आहोत त्या कामात लक्ष एकाग्र करावे. हा एक प्रकारचा एक्झरसाईजच आहे. जेवण करत असाल तर जेवण कसे आहे, चव कशी आहे याचा विचार करावा. प्रत्येक वेळी फक्त संकटाचाच विचार करण्याची लागलेली सवय यातून कमी होते. अशा व्यक्तींना छोटीछोटी कामे सांगावीत व त्यात ते गुंतून राहतील असे पहावे.शक्यतो त्यानी स्वत:ही आपल्याला एक दिनक्रम लावून घ्यावा. त्याचबरोबर आपल्याला काय वाटते आहे, नक्की कशाची भीती वाटते आहे याविषयी त्यांनी निकटच्या व्यक्तीबरोबर मोकळेपणाने बोलावे. तसे कोणी नसेल तर काय वाटते ते लिहून काढावे. यातून मन मोकळे होते. त्यावरचा ताण कमी होतो. ताण कमी करण्याचे किंवा तो सहन करण्याची क्षमता वाढवण्याचे हे ऊपाय आहेत. मनोविकाराच्या प्राथमिक स्वरूपात ते फार ऊपयोगी पडतात.आणखी कोणते उपाय आहेत?भूतकाळ भविष्यकाळ यात रमू नये. वर्तमानात रहायला शिकावे. मूख्य म्हणजे जो विषय सुरू आहे, त्याच्याशी संबधित अशा फक्त विश्वासार्ह, खात्रीशीर बातम्याच पहाव्यात, ऐकाव्यात. आताच्या सोशल मिडियात काहीही येत असते. ते वाचनात पाहण्यात आले की त्याचाच विचार येत राहतो. खंबीर होत असलेले मन पुन्हा खचू लागते. त्यामुळे अशा गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. शरीराला मजबूत करण्यासाठी व्यायाम आवश्यक तसेच मन खंबीर करण्यासाठी मनालाही व्यायामाची गरज असते. विशेषत: अशा लॉकडाऊनच्या, कोरोनासारख्या विषाणूच्या विळख्यात सगळे जग सापडलेले असताना ती जास्त असते. म्हणूनच याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याMeditationसाधना