शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

Corona virus : शारीरिक व्यायामासारखाच मनाचा व्यायामही गरजेचाच : डॉ. संज्योत देशपांडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 07:00 IST

लॉकडाऊनचा मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या व्यक्तींवर विपरीत परिणाम कोरोनाच्या लढ्यात अशी वाढवा मनशक्ती

ठळक मुद्देकोरोनाच्या लढ्यात अशी वाढवा मनशक्ती

राजू इनामदारपुणे: कोरोना विषाणूच्या विरोधात जगभर लढाई सुरू आहे. सामान्य नागरिकांपासून ते जगभरच्या देशांचे प्रमुख या लढाईत उतरले आहेत. यात सामान्यांचे मनोबल ढासळू नये यासाठी काही मानसोपचार तज्ञही स्वत: होऊन सक्रिय झाले आहेत. डॉ. संज्योत देशपांडे त्यापैकीच एक. त्यांनी रोज फेसबूक संवाद सुरू केला आहे. त्याचा अनेकांना फायदाही होत आहे. या संचारबंदीचा व त्याही अनिश्चित काळासाठी असलेल्या लॉकडाऊनचा मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या व्यक्तींवर विपरीत परिणाम होऊ शकतो असे मत त्यांनी व्यक्त केले.नेमकी त्याचवेळी नाशिक येथे एका युवकाने त्याला कोरोना झाला आहे अशा समजातून आत्महत्या केली अशी बातमी आली.   तोच धागा पकडून लोकमत ने डॉ. देशपांडे यांच्याबरोबर बातचीत केली.नक्की कोणावर आणि काय परिणाम होतो अशा वातावरणाचा?-- सध्या सगळे वातावरणच अनिश्चित आहे. किती काळ हा लॉकडाऊन असेल, त्यातून किती आणि काय नूकसान होणार असे अनेक प्रश्न भेडसावत आहेत. सुदृढ मनाच्या व्यक्तींनीही हताश व्हावे अशा या काळात मानसिक द्रष्ट्या कमकूवत असलेल्यांच्या मनावर काय परिणाम होत असेल याचा नूसता विचार केला तरी अंगावर शहारे येतात. त्यामुळेच मी यात सर्वांबरोबरच संवाद साधण्याचा निर्णय घेतला. कमकूवत मनाच्या व्यक्ती फार कमी बोलतात. आतल्याआत विचार करतात. ऊत्तर मिळत नसल्याने खचत जातात. आता सगळे संपले असे विचार त्यांच्या मनात येऊ लागतात. त्यांना सावरायला कोणी नसले की मग याचा शेवट नको असलेलाच होतो. हे एक प्रकारचे मानसिक चक्रच आहे. त्यात गूंतत जायला होते व नंतर ते वाढतच जाते.अशा वेळी काय करायला हवे?-- अशा वेळी त्या व्यक्तीच्या निकटच्या लोकांनी त्याच्याजवळ रहायला हवे. त्याच्या भावनांची चेष्टा न करता त्या समजावून घेऊन त्याची समजूत काढायला हवी. प्रसंगी तूझे बरोबर आहे, पण आम्ही तूज्याबरोबर आहोत, यातून आपण बाहेर पडणार आहोत हा विश्वास त्याला द्यायला हवा. इतक्या साध्या गोष्टीनेही मोठा फरक पडू शकतो. त्याचे बिथरणारे मन जागेवर येऊ शकते.प्रत्यक्ष त्या व्यक्तीने काय करायला हवे?-- जे काम करत आहोत त्या कामात लक्ष एकाग्र करावे. हा एक प्रकारचा एक्झरसाईजच आहे. जेवण करत असाल तर जेवण कसे आहे, चव कशी आहे याचा विचार करावा. प्रत्येक वेळी फक्त संकटाचाच विचार करण्याची लागलेली सवय यातून कमी होते. अशा व्यक्तींना छोटीछोटी कामे सांगावीत व त्यात ते गुंतून राहतील असे पहावे.शक्यतो त्यानी स्वत:ही आपल्याला एक दिनक्रम लावून घ्यावा. त्याचबरोबर आपल्याला काय वाटते आहे, नक्की कशाची भीती वाटते आहे याविषयी त्यांनी निकटच्या व्यक्तीबरोबर मोकळेपणाने बोलावे. तसे कोणी नसेल तर काय वाटते ते लिहून काढावे. यातून मन मोकळे होते. त्यावरचा ताण कमी होतो. ताण कमी करण्याचे किंवा तो सहन करण्याची क्षमता वाढवण्याचे हे ऊपाय आहेत. मनोविकाराच्या प्राथमिक स्वरूपात ते फार ऊपयोगी पडतात.आणखी कोणते उपाय आहेत?भूतकाळ भविष्यकाळ यात रमू नये. वर्तमानात रहायला शिकावे. मूख्य म्हणजे जो विषय सुरू आहे, त्याच्याशी संबधित अशा फक्त विश्वासार्ह, खात्रीशीर बातम्याच पहाव्यात, ऐकाव्यात. आताच्या सोशल मिडियात काहीही येत असते. ते वाचनात पाहण्यात आले की त्याचाच विचार येत राहतो. खंबीर होत असलेले मन पुन्हा खचू लागते. त्यामुळे अशा गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. शरीराला मजबूत करण्यासाठी व्यायाम आवश्यक तसेच मन खंबीर करण्यासाठी मनालाही व्यायामाची गरज असते. विशेषत: अशा लॉकडाऊनच्या, कोरोनासारख्या विषाणूच्या विळख्यात सगळे जग सापडलेले असताना ती जास्त असते. म्हणूनच याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याMeditationसाधना