शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
3
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, निफ्टीत ५० अंकांची तेजी; FMCG, फार्मा शेअर्समध्ये तेजी
4
Ikkis Review: अगस्त्य नंदाचा नव्हे; धर्मेंद्र यांचाच वाटतो 'इक्कीस'; कथा, अभिनय जमेच्या बाजू, पण...; वाचा रिव्ह्यू
5
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
6
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
7
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
8
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
9
९८ लाख कोटींच्या साम्राज्याचा सम्राट निवृत्त! वॉरेन बफे यांचा कंपनीतून ९५ व्या वर्षी राजीनामा
10
आजपासून काय-काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? कार महागणार, पीएफच्या नियमांतही मोठे बदल होणार अन् बरंच काही...!
11
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
12
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
13
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
14
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
15
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
16
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
17
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
18
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
19
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
20
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : शारीरिक व्यायामासारखाच मनाचा व्यायामही गरजेचाच : डॉ. संज्योत देशपांडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 07:00 IST

लॉकडाऊनचा मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या व्यक्तींवर विपरीत परिणाम कोरोनाच्या लढ्यात अशी वाढवा मनशक्ती

ठळक मुद्देकोरोनाच्या लढ्यात अशी वाढवा मनशक्ती

राजू इनामदारपुणे: कोरोना विषाणूच्या विरोधात जगभर लढाई सुरू आहे. सामान्य नागरिकांपासून ते जगभरच्या देशांचे प्रमुख या लढाईत उतरले आहेत. यात सामान्यांचे मनोबल ढासळू नये यासाठी काही मानसोपचार तज्ञही स्वत: होऊन सक्रिय झाले आहेत. डॉ. संज्योत देशपांडे त्यापैकीच एक. त्यांनी रोज फेसबूक संवाद सुरू केला आहे. त्याचा अनेकांना फायदाही होत आहे. या संचारबंदीचा व त्याही अनिश्चित काळासाठी असलेल्या लॉकडाऊनचा मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या व्यक्तींवर विपरीत परिणाम होऊ शकतो असे मत त्यांनी व्यक्त केले.नेमकी त्याचवेळी नाशिक येथे एका युवकाने त्याला कोरोना झाला आहे अशा समजातून आत्महत्या केली अशी बातमी आली.   तोच धागा पकडून लोकमत ने डॉ. देशपांडे यांच्याबरोबर बातचीत केली.नक्की कोणावर आणि काय परिणाम होतो अशा वातावरणाचा?-- सध्या सगळे वातावरणच अनिश्चित आहे. किती काळ हा लॉकडाऊन असेल, त्यातून किती आणि काय नूकसान होणार असे अनेक प्रश्न भेडसावत आहेत. सुदृढ मनाच्या व्यक्तींनीही हताश व्हावे अशा या काळात मानसिक द्रष्ट्या कमकूवत असलेल्यांच्या मनावर काय परिणाम होत असेल याचा नूसता विचार केला तरी अंगावर शहारे येतात. त्यामुळेच मी यात सर्वांबरोबरच संवाद साधण्याचा निर्णय घेतला. कमकूवत मनाच्या व्यक्ती फार कमी बोलतात. आतल्याआत विचार करतात. ऊत्तर मिळत नसल्याने खचत जातात. आता सगळे संपले असे विचार त्यांच्या मनात येऊ लागतात. त्यांना सावरायला कोणी नसले की मग याचा शेवट नको असलेलाच होतो. हे एक प्रकारचे मानसिक चक्रच आहे. त्यात गूंतत जायला होते व नंतर ते वाढतच जाते.अशा वेळी काय करायला हवे?-- अशा वेळी त्या व्यक्तीच्या निकटच्या लोकांनी त्याच्याजवळ रहायला हवे. त्याच्या भावनांची चेष्टा न करता त्या समजावून घेऊन त्याची समजूत काढायला हवी. प्रसंगी तूझे बरोबर आहे, पण आम्ही तूज्याबरोबर आहोत, यातून आपण बाहेर पडणार आहोत हा विश्वास त्याला द्यायला हवा. इतक्या साध्या गोष्टीनेही मोठा फरक पडू शकतो. त्याचे बिथरणारे मन जागेवर येऊ शकते.प्रत्यक्ष त्या व्यक्तीने काय करायला हवे?-- जे काम करत आहोत त्या कामात लक्ष एकाग्र करावे. हा एक प्रकारचा एक्झरसाईजच आहे. जेवण करत असाल तर जेवण कसे आहे, चव कशी आहे याचा विचार करावा. प्रत्येक वेळी फक्त संकटाचाच विचार करण्याची लागलेली सवय यातून कमी होते. अशा व्यक्तींना छोटीछोटी कामे सांगावीत व त्यात ते गुंतून राहतील असे पहावे.शक्यतो त्यानी स्वत:ही आपल्याला एक दिनक्रम लावून घ्यावा. त्याचबरोबर आपल्याला काय वाटते आहे, नक्की कशाची भीती वाटते आहे याविषयी त्यांनी निकटच्या व्यक्तीबरोबर मोकळेपणाने बोलावे. तसे कोणी नसेल तर काय वाटते ते लिहून काढावे. यातून मन मोकळे होते. त्यावरचा ताण कमी होतो. ताण कमी करण्याचे किंवा तो सहन करण्याची क्षमता वाढवण्याचे हे ऊपाय आहेत. मनोविकाराच्या प्राथमिक स्वरूपात ते फार ऊपयोगी पडतात.आणखी कोणते उपाय आहेत?भूतकाळ भविष्यकाळ यात रमू नये. वर्तमानात रहायला शिकावे. मूख्य म्हणजे जो विषय सुरू आहे, त्याच्याशी संबधित अशा फक्त विश्वासार्ह, खात्रीशीर बातम्याच पहाव्यात, ऐकाव्यात. आताच्या सोशल मिडियात काहीही येत असते. ते वाचनात पाहण्यात आले की त्याचाच विचार येत राहतो. खंबीर होत असलेले मन पुन्हा खचू लागते. त्यामुळे अशा गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. शरीराला मजबूत करण्यासाठी व्यायाम आवश्यक तसेच मन खंबीर करण्यासाठी मनालाही व्यायामाची गरज असते. विशेषत: अशा लॉकडाऊनच्या, कोरोनासारख्या विषाणूच्या विळख्यात सगळे जग सापडलेले असताना ती जास्त असते. म्हणूनच याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याMeditationसाधना