शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : मानवाच्या क्वारंटाईनचा पक्षी;प्राण्यांवर चांगला परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 07:00 IST

माणसांनी या प्राण्यांच्या अधिवासावर अतिक्रमण करून त्यांना पिढ्यान पिढ्या क्वारंटाईन केले आहे...

ठळक मुद्देकॅमेऱ्यांनी टिपलेले वास्तव: पाणवठ्यांवरची वाढली संख्या कोरोनापासून मुक्ती मिळाल्यावर तरी मानवाने पक्षी, प्राण्यांच्या अधिवासाचा ऱ्हास थांबवावा

पुणे: जगाला ग्रासणाऱ्या कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी माणूस एकमेकांपासून विलग (क्वारंटाईन) होऊन बंदीवासात जातो आहे, पण त्याच्या या क्वारंटाईनचा पक्षी व प्राणीजगतावर मात्र चांगला परिणाम झाला आहे. पाणवठ्यांवरील त्यांच्या संख्येत वाढ तर होऊ लागलीच आहे, शिवाय काही दुर्मिळ पक्षी, प्राण्यांचेही तिथे दर्शन होऊ लागले आहे.जेजूरीजवळ पिंगोरी गावात दाट झाडीचा एक भला थोरला डोंगर आहे. तिथे वन विभागाच्या साह्याने इला फौडेशन काम करते. पक्षीतज्ज्ञ डॉ. सतीश पांडे त्याचे संचालक आहेत. डोंगराच्या काही भागातील पाणवठ्यांवर फौडेशनच्या वतीने कँमेरे लावले आहेत. त्यांच्यासमोर दिवसारात्री, कधीही काहीही हालचाल झाली की त्याचे छायाचित्र टिपले जाते. एकदोन आठवड्यात ७० हजार वगैरे छायाचित्रे हे कॅमेरे टिपतात. राहूल लोणकर, राजकूमार पवार, ऊमाजी खोमणे, डॉ. ओंकार सुमंत हे आणखी काहीजण फौडेंशनचे काम पाहतात.या कॅमेऱ्यातून काढलेली छायाचित्र खोटे बोलत नाहीत असे सांगून पक्षीतज्ज्ञ डॉ. सतीश पांडे म्हणाले, मागील ४ वर्ष आणि लॉकडाऊनचे गेले १५ दिवस या काळातील छायाचित्र पाहिली आणि याचा शोध लागला. एरवी या पाणवठ्यांवर माणसांचीही वर्दळ असते. त्यावेळी म्हणजे गेली ४ वर्षे आम्हाला फक्त बुलबूल, साळुंकी, घरकावळा, डोमकावळा, होला, शिंपी, शिंजीर असे पक्षी पाणवठ्यावर दिसायचे. मागच्या पंधरा दिवसात झालेला बदल म्हणजे आता फँटेल, नर्तक, स्वर्गीय नर्तक, निलांग असे अनेक दुर्मिळ पक्षी दिसू लागलेत. या आणि एकूणच सर्व पक्षांच्या पाणवठ्यावर यायच्या संख्येतही वाढ झाली. दिवसातून तीन वेळा आता ते येतात, पुर्वी एकदाच येत.कँमेरा रात्रीची छायाछित्रही इन्फ्रा रेड किरणांमध्ये टिपतो अशी माहिती देऊन डॉ. पांडे म्हणाले, सस्तन प्राण्यांमध्येही हे बदल झाले आहेत. मुंगूस, घोरपड, तरस, चिंकारा, रानमाजंर असे प्राणी पूर्वी दिसत. आता चौसिंगा, भेकर, खोकड, कोल्हा, साळींदर, रानडुक्कर, ऊदमांजर हे प्राणी दिसत आहेत.माणसांनी या प्राण्यांच्या अधिवासावर अतिक्रमण करून त्यांना पिढ्यान पिढ्या क्वारंटाईन केले आहे. आपल्याला १५ दिवस क्वारंटाईन केले तळ त्याचा त्रास होतोय, त्यांना किती झाला असेल याचा विचार करून कोरोनापासून मुक्ती मिळाल्यावर तरी मानवाने पक्षी, प्राण्यांच्या अधिवासाचा ऱ्हास थांबवावा अशी भावना डॉ. पांडे यांनी व्यक्त केली.................बिबट्या हा अतिशय सावध प्राणी आहे, त्याची बुद्धीही ( संवेदना) तीक्ष्ण आहे. त्यामुळे धोका असेल तिथे तो फिरकतही नाही. मागील पंधरा दिवसात मात्र एक बिबट्या सहकुटूंब सहपरिवार पाणवठ्यावर निवांत फेरी मारत असतो, असे डॉ. पांडे म्हणालै. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNatureनिसर्ग