शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

Corona virus : मानवाच्या क्वारंटाईनचा पक्षी;प्राण्यांवर चांगला परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 07:00 IST

माणसांनी या प्राण्यांच्या अधिवासावर अतिक्रमण करून त्यांना पिढ्यान पिढ्या क्वारंटाईन केले आहे...

ठळक मुद्देकॅमेऱ्यांनी टिपलेले वास्तव: पाणवठ्यांवरची वाढली संख्या कोरोनापासून मुक्ती मिळाल्यावर तरी मानवाने पक्षी, प्राण्यांच्या अधिवासाचा ऱ्हास थांबवावा

पुणे: जगाला ग्रासणाऱ्या कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी माणूस एकमेकांपासून विलग (क्वारंटाईन) होऊन बंदीवासात जातो आहे, पण त्याच्या या क्वारंटाईनचा पक्षी व प्राणीजगतावर मात्र चांगला परिणाम झाला आहे. पाणवठ्यांवरील त्यांच्या संख्येत वाढ तर होऊ लागलीच आहे, शिवाय काही दुर्मिळ पक्षी, प्राण्यांचेही तिथे दर्शन होऊ लागले आहे.जेजूरीजवळ पिंगोरी गावात दाट झाडीचा एक भला थोरला डोंगर आहे. तिथे वन विभागाच्या साह्याने इला फौडेशन काम करते. पक्षीतज्ज्ञ डॉ. सतीश पांडे त्याचे संचालक आहेत. डोंगराच्या काही भागातील पाणवठ्यांवर फौडेशनच्या वतीने कँमेरे लावले आहेत. त्यांच्यासमोर दिवसारात्री, कधीही काहीही हालचाल झाली की त्याचे छायाचित्र टिपले जाते. एकदोन आठवड्यात ७० हजार वगैरे छायाचित्रे हे कॅमेरे टिपतात. राहूल लोणकर, राजकूमार पवार, ऊमाजी खोमणे, डॉ. ओंकार सुमंत हे आणखी काहीजण फौडेंशनचे काम पाहतात.या कॅमेऱ्यातून काढलेली छायाचित्र खोटे बोलत नाहीत असे सांगून पक्षीतज्ज्ञ डॉ. सतीश पांडे म्हणाले, मागील ४ वर्ष आणि लॉकडाऊनचे गेले १५ दिवस या काळातील छायाचित्र पाहिली आणि याचा शोध लागला. एरवी या पाणवठ्यांवर माणसांचीही वर्दळ असते. त्यावेळी म्हणजे गेली ४ वर्षे आम्हाला फक्त बुलबूल, साळुंकी, घरकावळा, डोमकावळा, होला, शिंपी, शिंजीर असे पक्षी पाणवठ्यावर दिसायचे. मागच्या पंधरा दिवसात झालेला बदल म्हणजे आता फँटेल, नर्तक, स्वर्गीय नर्तक, निलांग असे अनेक दुर्मिळ पक्षी दिसू लागलेत. या आणि एकूणच सर्व पक्षांच्या पाणवठ्यावर यायच्या संख्येतही वाढ झाली. दिवसातून तीन वेळा आता ते येतात, पुर्वी एकदाच येत.कँमेरा रात्रीची छायाछित्रही इन्फ्रा रेड किरणांमध्ये टिपतो अशी माहिती देऊन डॉ. पांडे म्हणाले, सस्तन प्राण्यांमध्येही हे बदल झाले आहेत. मुंगूस, घोरपड, तरस, चिंकारा, रानमाजंर असे प्राणी पूर्वी दिसत. आता चौसिंगा, भेकर, खोकड, कोल्हा, साळींदर, रानडुक्कर, ऊदमांजर हे प्राणी दिसत आहेत.माणसांनी या प्राण्यांच्या अधिवासावर अतिक्रमण करून त्यांना पिढ्यान पिढ्या क्वारंटाईन केले आहे. आपल्याला १५ दिवस क्वारंटाईन केले तळ त्याचा त्रास होतोय, त्यांना किती झाला असेल याचा विचार करून कोरोनापासून मुक्ती मिळाल्यावर तरी मानवाने पक्षी, प्राण्यांच्या अधिवासाचा ऱ्हास थांबवावा अशी भावना डॉ. पांडे यांनी व्यक्त केली.................बिबट्या हा अतिशय सावध प्राणी आहे, त्याची बुद्धीही ( संवेदना) तीक्ष्ण आहे. त्यामुळे धोका असेल तिथे तो फिरकतही नाही. मागील पंधरा दिवसात मात्र एक बिबट्या सहकुटूंब सहपरिवार पाणवठ्यावर निवांत फेरी मारत असतो, असे डॉ. पांडे म्हणालै. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNatureनिसर्ग