शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन पुरवठा व वाटपावर हवे नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:12 IST

मंचर : राज्यातील ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर तसेच रुग्णालयांना होणाऱ्या ऑक्सिजन वाटपावर नियंत्रण प्रस्थापित ...

मंचर : राज्यातील ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर तसेच रुग्णालयांना होणाऱ्या ऑक्सिजन वाटपावर नियंत्रण प्रस्थापित करावे, अशी आग्रही मागणी शिवसेना उपनेते, संपर्कप्रमुख व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात आढळराव पाटील म्हणाले की, सध्या राज्यात दररोज १५०० टन ऑक्सिजनचा पुरवठा होत असून रुग्णांना ऑक्सिजनची गरज सुमारे १७०० ते १७५० टनच्या आसपास आहे. राज्यात पुरवठ्याच्या तुलनेत मागणी अधिक असली तरी शासनाने पुरवठा वाढीसाठी ठोस पावले उचलल्यास हा फरक निघून येण्यास वेळ लागणार नाही. तत्पूर्वी रुग्णालयांना पुरवठादारांकडून मिळणाऱ्या ऑक्सिजनवर नियंत्रण ठेवून प्रत्येक २४ तासांनी त्या त्या रुग्णालयांना गरजेनुसार ऑक्सिजन पुरवठा करण्यावर शासनाने अधिकारी नेमून लक्ष ठेवले पाहिजे. तसेच कोणत्या रुग्णाला किती ऑक्सिजनची आवश्यकता आहे याच्यावर देखील शासकीय वॉच ठेवून ऑक्सिजनचा सर्रास वापर न करता गरजेनुसार वापर करण्यासाठी व वापरात सुसूत्रता निर्माण व्हावी यासाठी पावले उचलावीत.

प्रत्येक रुग्णालयाला १२ तासांचा अतिरिक्त ऑक्सिजनचा साठा पुरवण्यात येऊन त्याचा वापर केवळ बफर कालावधीकरिता म्हणजेच २४ तासांनंतरही काही कारणांमुळे उत्पादकामार्फत ऑक्सिजन उपलब्ध न झाल्यास अतिरिक्त साठ्यातील ऑक्सिजन उपयोगात आणण्यासाठी शासनाने रुग्णालयांना परवानगी द्यावी. ऑक्सिजन उत्पादन करणारी कंपनी ते रुग्णालय यांच्यातील वाहतूक व्यवस्था राज्य शासनाच्या अमलाखाली येणे अतिशय गरजेचे असून त्याद्वारे ऑक्सिजनची वाहतूक सुरळीतपणे होऊन वेळेवर संबंधित रुग्णालयास ऑक्सिजन पुरवठा होण्यास मोठी मदत होऊ शकेल. ऑक्सिजन तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्य शासनाने प्रभावीपणे शासकीय अधिकाऱ्यांची स्वतंत्र यंत्रणा राबविल्यास पुढील सात-आठ दिवसांतच ऑक्सिजन वितरण व्यवस्थेवर सुयोग्य शासनाचे नियंत्रण प्रस्थापित होऊन त्याद्वारे रुग्णालयांना वेळेवर व रुग्णांना गरजेनुसार ऑक्सिजन उपलब्ध होऊन रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी मोठी मदत होईल, असे प्रतिपादन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी करून या महत्त्वपूर्ण विषयावर प्रकाश टाकून राज्य शासनाचे लक्ष वेधले आहे.