शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

पुण्यात दूषित पाणी? महापालिका शोधणार मूळ कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 09:52 IST

पाणलोट क्षेत्रातील कंपन्या, रिसॉर्ट्स तसेच अन्य ठिकाणचे सांडपाणी कुठे व कसे सोडले जाते, याचीही तपासणी होणा

पुणे : ‘जीबीएस’च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दूषित पाण्याचा मूळ स्रोत शोधण्यावर महापालिकेने भर दिला आहे. त्यासाठी धरणासह, विहीर, सोसायट्यांच्या टाक्या आणि घरांतूनही पाण्याचे नमुने घेऊन चाचणी केली जाणार आहे. याशिवाय पाणलोट क्षेत्रातील कंपन्या, रिसॉर्ट्स तसेच अन्य ठिकाणचे सांडपाणी कुठे व कसे सोडले जाते, याचीही तपासणी होणार आहे.पालिका नांदेड आणि बारांगणी मळा येथील विहिरीच्या पाण्याची पुन्हा एकदा तपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय धरणातील पाणी, गावातील नागरिकांची घरे, सोसायट्यांच्या टाक्या यातूनही प्रातिनिधिक स्वरूपात नमुने घेऊन त्याची चाचणी केली जाईल. यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील विविध स्वरूपाच्या कंपन्या, प्रक्रिया प्रकल्प तसेच रिसॉर्ट येथील सांडपाणी कुठे सोडले जाते, त्यावर प्रक्रिया होते का, याचीही पाहणी होणार आहे. काही ठिकाणाहून पाण्यात जड धातू किंवा रसायने, क्षार मिसळले जात आहेत का याचीही तपासणी केली जाईल,’असे पालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी सांगितले.दूषित अन्न विक्रेत्यावर कारवाई कधी ?जीबीएसचे रुग्ण दूषित पाण्याबरोबर दूषित अन्न कारणीभूत ठरत आहे. पण या दूषित अन्नपदार्थ विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासन कारवाई कधी करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.हात स्वच्छ धुतल्याशिवाय मांसाला हात लावू नयेमहापालिकेने पशुसंवर्धन संचालक, अन्न व औषध प्रशासनाशीही संपर्क साधला आहे. पोल्ट्री व मटण चिकन शॉपचालकांशी संपर्क साधून त्यांना अधिक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. कच्चे मांस हाताळले अथवा खाल्ल्यास त्यातून जंतूसंसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हात स्वच्छ धुतल्याशिवाय मांसाला हात लावू नये, असे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी सांगितले.तीन रुग्णांवर उपचार सुरूमहापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात ‘जीबीएस’चे तीन रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. महापालिकेच्या विनंतीनंतर शहरातील तीन ‘न्यूरोलॉजिस्ट’नी कमला नेहरू रुग्णालयात मानद सेवा पुरविण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती डॉ. नीना बोराडे यांनी दिली.आताच पाणी दूषित कसे झाले?पुणे महापालिकेमध्ये ही गावे समाविष्ट होण्यापूर्वी नांदेड गावातील विहिरीतून पाणीपुरवठा केला जात आहे. पण आताच या विहिरीचे पाणी दूषित कसे झाले, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या विहिरीत एखादा प्राणी मृत पडला का किंवा या विहिरीत पाण्याचे क्लोरिन टाकण्यासाठी हलगर्जीपणा झाला का, याविषयी शंका व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीwater pollutionजल प्रदूषणHealthआरोग्यMuncipal Corporationनगर पालिका