शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

पुण्यात दूषित पाणी? महापालिका शोधणार मूळ कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 09:52 IST

पाणलोट क्षेत्रातील कंपन्या, रिसॉर्ट्स तसेच अन्य ठिकाणचे सांडपाणी कुठे व कसे सोडले जाते, याचीही तपासणी होणा

पुणे : ‘जीबीएस’च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दूषित पाण्याचा मूळ स्रोत शोधण्यावर महापालिकेने भर दिला आहे. त्यासाठी धरणासह, विहीर, सोसायट्यांच्या टाक्या आणि घरांतूनही पाण्याचे नमुने घेऊन चाचणी केली जाणार आहे. याशिवाय पाणलोट क्षेत्रातील कंपन्या, रिसॉर्ट्स तसेच अन्य ठिकाणचे सांडपाणी कुठे व कसे सोडले जाते, याचीही तपासणी होणार आहे.पालिका नांदेड आणि बारांगणी मळा येथील विहिरीच्या पाण्याची पुन्हा एकदा तपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय धरणातील पाणी, गावातील नागरिकांची घरे, सोसायट्यांच्या टाक्या यातूनही प्रातिनिधिक स्वरूपात नमुने घेऊन त्याची चाचणी केली जाईल. यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील विविध स्वरूपाच्या कंपन्या, प्रक्रिया प्रकल्प तसेच रिसॉर्ट येथील सांडपाणी कुठे सोडले जाते, त्यावर प्रक्रिया होते का, याचीही पाहणी होणार आहे. काही ठिकाणाहून पाण्यात जड धातू किंवा रसायने, क्षार मिसळले जात आहेत का याचीही तपासणी केली जाईल,’असे पालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी सांगितले.दूषित अन्न विक्रेत्यावर कारवाई कधी ?जीबीएसचे रुग्ण दूषित पाण्याबरोबर दूषित अन्न कारणीभूत ठरत आहे. पण या दूषित अन्नपदार्थ विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासन कारवाई कधी करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.हात स्वच्छ धुतल्याशिवाय मांसाला हात लावू नयेमहापालिकेने पशुसंवर्धन संचालक, अन्न व औषध प्रशासनाशीही संपर्क साधला आहे. पोल्ट्री व मटण चिकन शॉपचालकांशी संपर्क साधून त्यांना अधिक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. कच्चे मांस हाताळले अथवा खाल्ल्यास त्यातून जंतूसंसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हात स्वच्छ धुतल्याशिवाय मांसाला हात लावू नये, असे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी सांगितले.तीन रुग्णांवर उपचार सुरूमहापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात ‘जीबीएस’चे तीन रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. महापालिकेच्या विनंतीनंतर शहरातील तीन ‘न्यूरोलॉजिस्ट’नी कमला नेहरू रुग्णालयात मानद सेवा पुरविण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती डॉ. नीना बोराडे यांनी दिली.आताच पाणी दूषित कसे झाले?पुणे महापालिकेमध्ये ही गावे समाविष्ट होण्यापूर्वी नांदेड गावातील विहिरीतून पाणीपुरवठा केला जात आहे. पण आताच या विहिरीचे पाणी दूषित कसे झाले, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या विहिरीत एखादा प्राणी मृत पडला का किंवा या विहिरीत पाण्याचे क्लोरिन टाकण्यासाठी हलगर्जीपणा झाला का, याविषयी शंका व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीwater pollutionजल प्रदूषणHealthआरोग्यMuncipal Corporationनगर पालिका