शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनावरून काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलीस समोरासमोर, तणावाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 12:53 IST

यावेळी काही काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलीस एकमेकांसमोर आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते....

पुणे :पुणे महापालिकेच्यावतीने आशानगर येथे पाण्याची वीस लाख लीटर क्षमतेची टाकी उभारण्यात आली आहे. या टाकीच्या उद्घाटन समारंभासाठी भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पुढाकार घेतला असून आज दुपारी एक वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते. मात्र या पाण्याच्या टाकीला जागा मिळवून देण्यासाठी काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी प्रयत्न केले होते. त्यांना या टाकीच्या उद्घाटन कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आले होते. त्यामुळे सकाळपासून स्थानिक माजी नगरसेवक दत्ता बहिरट, काँग्रेसचे काही कार्यकर्ते तसेच उबाठा गटाचे कार्यकर्ते यांनी या टाकीचे उद्घाटन करण्यासाठी सकाळी दहा वाजल्यापासून गर्दी केली होती. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना अडवले. यावेळी कसबा मतदारसंघाचे आमदार रविंद्र धंगेकर आल्यावर त्यांनी पोलिसांना जाब विचारला. यावेळी काही काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलीस एकमेकांसमोर आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या कार्यक्रमासाठी सन्मानाने बोलावले नाही तर काँग्रेस पक्षाच्यावतीने या टाकीचे नियोजित कार्यक्रमाआधी म्हणजे सकाळी ११ वाजता उद्घाटन केले जाणार होते. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे दिसत आहे. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली. त्यामुळे काही वेळ त्याठिकाणी तणावाचे वातावरण तयार झाले होते.

आशानगर, वैदूवाडी, म्हाडा वसाहत, चतु:श्रुंगी परिषद, बहिरटवाडी, जनवाडी, जनता वसाहत यासह विविध भागांमध्ये पाणी पुरेशा दाबाने मिळत नव्हते. त्यामुळे या भागात पाण्याची टाकी उभारण्यासाठी साडेचार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र या टाकीसाठी जागा उपलब्ध होत नव्हती. या टाकीला मोफत जागा उपलब्ध होण्यासाठी माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी प्रयत्न केले. त्यातून ही जागा पालिकेला मोफत उपलब्ध झाली. त्यानंतर या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करावे, असा ठराव पुणे महापालिकेत मंजूर करण्यात आला होता. या ठरावाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी दत्ता बहिरट यांनी पत्रकार परिषदेत केली होती.

काँग्रेसने केलेल्या कामाचे श्रेय घेवू नका

पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन झाले पाहिजे. भाजप स्वतः काम करत नाही मात्र काँग्रेसने केलेल्या कामाचे श्रेय घेत आहे, अशी टीका माजी आमदार मोहन जोशी यांनी केली.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसAjit Pawarअजित पवार