शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेश प्रक्रियेतील सावळा गोंधळ; विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 21:58 IST

आरटीई अंतर्गत प्रवेश निश्चित होऊनही शहरातील काही शाळांनी संबंधित विद्यार्थ्याचे ऑनलाइन शिक्षणाचे वर्ग अद्याप सुरू केले नाहीत.

उरुळी कांचन : आरटीईप्रवेश प्रक्रिया सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता सोडतीद्वारे निवड झाली आहे व ज्यांचे प्रवेश तीन वेळा मुदतवाढ देवून पूर्ण झाले आहेत. त्यांचे ऑनलाईन शिक्षण काही ठिकाणी सुरु झाले आहे तर काही ठिकाणी अजून सुरु झाले नाही. ही वस्तुस्थिती असताना प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अजून कोणताच संदेश न आल्याने त्यांना प्रवेश मिळणार आहे किंवा नाही हे ऑगस्ट उजाडला तरी कळत नसल्याने पालकांमध्ये प्रचंड निराशा पसरली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आरटीई अंतर्गत प्रवेश निश्चित होऊनही शहरातील काही शाळांनी संबंधित विद्यार्थ्याचे ऑनलाइन शिक्षणाचे वर्ग अद्याप सुरू केले नाहीत. यामुळे या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क डावलला जात आहे, अशा शाळांच्या विरोधात शिक्षण विभाग कठोर भूमिका घेत नसल्याने पालक वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. आरटीईनुसार खासगी शाळांमधील पंचवीस टक्के राखीव जागांवरील केंद्रीय प्रवेश प्रक्रिया अंतर्गत पहिल्या निवड यादीत नावे जाहीर झाल्यानंतर पालकांनी ३ टप्प्यात शाळा प्रवेश घेतला आणि आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करून प्रवेश निश्चित केला. मात्र त्यानंतर दीड महिन्याचा कालावधी लोटला तरी संबंधित शाळांनी या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण अध्यापन सुरू न केल्याने पालकांची चिंता वाढली आहे. 

प्राथमिक शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर याबाबत म्हणाले, शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा हक्क मिळायला हवा, प्रवेश घेऊनही शाळा विद्यार्थ्याचा ऑनलाईन शिक्षणाचा हक्क डावलत असल्यास त्या शाळां विरोधात पालकांनी संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी आम्ही त्यांना कार्यवाही करण्यास सांगणार आहे. 

आरटी प्रवेशाच्या प्रक्रियेमध्ये राज्यामध्ये ९ हजार ४३२ शाळांनी सहभाग घेतला असून पुण्यामध्ये या शाळांची संख्या ९८५ अशी आहे. राज्यामध्ये एकूण प्रवेशाच्या जागा ९६ हजार ६८४ आहेत. पुण्यामध्ये त्यापैकी १४ हजार ७७३ आहेत. पहिल्या यादीत राज्यांमध्ये ८२,११९ मुलांना प्रवेशासाठी निवडण्यात आले होते आज अखेर राज्यामध्ये ६० हजार ७८७ मुलांनी प्रवेश घेतला आहे. तर पुण्यामध्ये १० हजार ४०५ मुलांनी प्रवेश घेतला आहे. 

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीSchoolशाळाEducationशिक्षण