शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

पुणे जिल्ह्यातील कृषी वीजबिलांच्या तक्रारींचे होणार तत्काळ निवारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 11:06 IST

सकाळी १० वाजता वीजबिल दुरुस्ती मेळाव्याचे आयोजन...

पुणे : कृषिपंपाच्या वीजबिलांच्या थकबाकीमध्ये तब्बल ५० टक्के सवलत मिळविण्यासाठी येत्या ३१ मार्चपर्यंत मुदत आहे. त्यापूर्वी थकबाकीमुक्ती योजनेचा लाभ मिळावा यासाठी कृषी वीजबिलांबाबत तक्रारी असल्यास त्याचे तत्काळ निवारण करण्यासाठी मुळशी, वेल्हे, खेड, मावळ, आंबेगाव, जुन्नर व हवेली (ग्रामीण) तालुक्यांमधील सर्वच १४ उपविभाग कार्यालयांमध्ये सोमवारी (दि. १४) सकाळी १० वाजता वीजबिल दुरुस्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

वीजबिलांची तत्काळ दुरुस्ती करून शेतकऱ्यांना थकबाकीमुक्तीचा योग्य वेळेत लाभ मिळावा यासाठी येत्या सोमवारी (दि. १४) सकाळी १० वाजता मुळशी, नसरापूर, उरुळी कांचन, हडपसर, जुन्नर, नारायणगाव, आळेफाटा, घोडेगाव, मंचर, राजगुरुनगर, वडगाव लोणावळा, चाकण व तळेगाव या १४ उपविभाग कार्यालयांमध्ये बिल दुरुस्तीचे मेळावे आयोजित केले आहेत. तक्रार असल्यास त्याचा लेखी अर्ज व बिलाची झेरॉक्स प्रत सोबत मावळ, आणावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. या मेळाव्यात मंजूर भार, मीटर वाचन, थकबाकी आदींबाबतच्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यात येणार आहे.

पुणे परिमंडल अंतर्गत मुळशी, वेल्हे, खेड, मावळ, आंबेगाव, जुन्नर व हवेली (ग्रामीण) तालु क्यांमधील १ लाख २६ हजार ४६२ पैकी आतापर्यंत ४९ हजार १९ शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्ती योजनेत सहभाग घेतला आहे.

या शेतकऱ्यांनी चालू बिल व थकबाकीचा १०६ कोटी ७० लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यांना थकबाकीमध्ये एकूण ८१ कोटी ६४ लाख रुपयांची सवलत मिळाली आहे. यामधील १८ हजार ३७४ शेतकरी वीजबिलांमधून संपूर्णत: थकबाकीमुक्त झाले आहे. या शेतकऱ्यांकडे ६४ कोटी ४ लाख रुपयांची थकबाकी होती. त्यापैकी ५० टक्के थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा केल्यामुळे थकबाकीमुक्ती सोबतच त्यांचे उर्वरित ३२ कोटी २ लाख रुपये माफ करण्यात आले आहेत.

टॅग्स :PuneपुणेmahavitaranमहावितरणFarmerशेतकरी