शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकरी अडचणीत , पाणी बंद केल्याने शंभर जणांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 17:12 IST

पुनर्वसन व इतर मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत धरणातून पाण्याचा एक थेंबही जाऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतलेले प्रकल्पबाधित शेतकरी कायदेशीर अडचणीत सापडले आहे.

ठळक मुद्देशासकीय कर्तव्य पार पाडण्यास अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद

खेड : भामा आसखेड प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी धरणातून सोडण्यात येणारे पाणी जबरदस्तीने बंद केल्याने शासकीय कामात अडथळा आणल्याच्या कारणावरून भामा आसखेड सिंचन व्यवस्थापनच्या उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे यांनी चाकण पोलिसांत तक्रार दिली आहे.त्यामुळे तब्बल शंभर जणांवर चाकण पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.७) रात्री गुन्हे दाखल करण्यात आले आहे.  पुनर्वसन व इतर मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत धरणातून पाण्याचा एक थेंबही जाऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतलेले प्रकल्पबाधित शेतकरी कायदेशीर अडचणीत सापडले आहे. परंतू, पोलीस बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न दिसत आहे.भामा आसखेड सिंचन व्यवस्थापन उप-विभाग करंजविहीरेचे उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे (वय ५८,रा. मांजरी बुद्रुक ता. हवेली) यांनी या बाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार सत्यवान नवले, बळवंत डांगले, गणेश जाधव, सचिन डांगले, तुकाराम नवले, निवृत्ती नवले, किसन बळवंत डांगले, हिरामण शिवेकर, तुकाराम शिंदे, दत्तू शिंदे, रमेश आवळे, दतात्रेय शिंदे, अनिल देशमुख, मल्हारी शिवेकर,अण्णा देव्हाडे, गणेश नवले , प्रकाश जाधव, लक्ष्मण नवले, नामदेव बांदल या एकोणीस जणांसह अन्य ८० ते १०० जणांवर भा. दं. वि. कलम ३५३, ४५२, १४१, ४३, १४७, १४९, ५०६ मु.पो.का. कलम १३५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.उपविभागीय अधिकारी मेमाणे यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. की, भामा आसखेड धरणातील पाणी सोडण्यास परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा विरोध आहे. मात्र, या धरणातील पाणी सोडण्याच्या संदर्भात पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या आदेशानंतर गुरुवारी सायंकाळी सहा वाजता धरणातून पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी (दि.६) सकाळी अकराच्या सुमारास या सुमारे ८० ते १०० प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी संगनमताने करंजविहीरे येथील कार्यालयात जबरदस्तीने येऊन अधिकाऱ्यांना धमक्या व दमबाजी सुरु केली. आमचे पुनर्वसन झालेले नाही. आम्हाला पर्यायी जमिनी मिळालेल्या नाही. अनेक प्रश्न शासनाकडे प्रलंबित आहेत. ते प्रश्न सुटल्याशिवाय धरणातून एक थेंबही पाणी आम्ही सोडू देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला. प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी कार्यालयात जबरदस्तीने घुसून भामा आसखेड धरणाचे शाखा अभियंता भारत बेंद्रे,अभियांत्रिकी सहायक केरू दगडू पांडे, वरिष्ठ लिपिक प्रवीण वाळेकर, तानाजी गौड, बाबाजी गरुड यांना धमक्या देऊन आणि दमबाजी करून बळजबरीने धरणातून सोडलेले पाणी बंद करण्यास भाग पाडले. सर्वांनी संगनमताने शासकीय कर्तव्य पार पडण्यास अडथळा निर्माण केल्याचे अधिकारी मेमाणे यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

टॅग्स :KhedखेडDamधरणChakanचाकणPoliceपोलिसCrimeगुन्हाFarmerशेतकरी