शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
4
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
5
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
6
'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट
7
"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल
8
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
9
OnePlus: वनप्लसच्या लेटेस्ट 5G फोनवर तगडी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल!
10
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
11
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
12
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
13
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
14
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
15
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
17
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
18
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
19
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
20
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलींचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले

भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकरी अडचणीत , पाणी बंद केल्याने शंभर जणांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 17:12 IST

पुनर्वसन व इतर मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत धरणातून पाण्याचा एक थेंबही जाऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतलेले प्रकल्पबाधित शेतकरी कायदेशीर अडचणीत सापडले आहे.

ठळक मुद्देशासकीय कर्तव्य पार पाडण्यास अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद

खेड : भामा आसखेड प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी धरणातून सोडण्यात येणारे पाणी जबरदस्तीने बंद केल्याने शासकीय कामात अडथळा आणल्याच्या कारणावरून भामा आसखेड सिंचन व्यवस्थापनच्या उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे यांनी चाकण पोलिसांत तक्रार दिली आहे.त्यामुळे तब्बल शंभर जणांवर चाकण पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.७) रात्री गुन्हे दाखल करण्यात आले आहे.  पुनर्वसन व इतर मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत धरणातून पाण्याचा एक थेंबही जाऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतलेले प्रकल्पबाधित शेतकरी कायदेशीर अडचणीत सापडले आहे. परंतू, पोलीस बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न दिसत आहे.भामा आसखेड सिंचन व्यवस्थापन उप-विभाग करंजविहीरेचे उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे (वय ५८,रा. मांजरी बुद्रुक ता. हवेली) यांनी या बाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार सत्यवान नवले, बळवंत डांगले, गणेश जाधव, सचिन डांगले, तुकाराम नवले, निवृत्ती नवले, किसन बळवंत डांगले, हिरामण शिवेकर, तुकाराम शिंदे, दत्तू शिंदे, रमेश आवळे, दतात्रेय शिंदे, अनिल देशमुख, मल्हारी शिवेकर,अण्णा देव्हाडे, गणेश नवले , प्रकाश जाधव, लक्ष्मण नवले, नामदेव बांदल या एकोणीस जणांसह अन्य ८० ते १०० जणांवर भा. दं. वि. कलम ३५३, ४५२, १४१, ४३, १४७, १४९, ५०६ मु.पो.का. कलम १३५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.उपविभागीय अधिकारी मेमाणे यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. की, भामा आसखेड धरणातील पाणी सोडण्यास परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा विरोध आहे. मात्र, या धरणातील पाणी सोडण्याच्या संदर्भात पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या आदेशानंतर गुरुवारी सायंकाळी सहा वाजता धरणातून पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी (दि.६) सकाळी अकराच्या सुमारास या सुमारे ८० ते १०० प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी संगनमताने करंजविहीरे येथील कार्यालयात जबरदस्तीने येऊन अधिकाऱ्यांना धमक्या व दमबाजी सुरु केली. आमचे पुनर्वसन झालेले नाही. आम्हाला पर्यायी जमिनी मिळालेल्या नाही. अनेक प्रश्न शासनाकडे प्रलंबित आहेत. ते प्रश्न सुटल्याशिवाय धरणातून एक थेंबही पाणी आम्ही सोडू देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला. प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी कार्यालयात जबरदस्तीने घुसून भामा आसखेड धरणाचे शाखा अभियंता भारत बेंद्रे,अभियांत्रिकी सहायक केरू दगडू पांडे, वरिष्ठ लिपिक प्रवीण वाळेकर, तानाजी गौड, बाबाजी गरुड यांना धमक्या देऊन आणि दमबाजी करून बळजबरीने धरणातून सोडलेले पाणी बंद करण्यास भाग पाडले. सर्वांनी संगनमताने शासकीय कर्तव्य पार पडण्यास अडथळा निर्माण केल्याचे अधिकारी मेमाणे यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

टॅग्स :KhedखेडDamधरणChakanचाकणPoliceपोलिसCrimeगुन्हाFarmerशेतकरी