शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

वादाचा विकास आराखडा, पीएमआरडीए बरोबरच महापालिकेचाही दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 3:37 AM

न्यायालयाच्या आदेशामुळे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ११ गावांच्या विकास आराखड्यावरून सध्या महापालिका व पीएमपीआरडीए यांच्यात वादंग सुरू झाले आहे.

पुणे : न्यायालयाच्या आदेशामुळे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ११ गावांच्या विकास आराखड्यावरून सध्या महापालिका व पीएमपीआरडीए यांच्यात वादंग सुरू झाले आहे. या गावांचा विकास आराखडा आम्हीच करणार, असा दावा दोन्ही संस्थांकडून करण्यात येत आहे.महापालिकेत समाविष्ट झालेल्या या ११ गावांना नागरी चेहरा असला, तरीही ग्रामपंचायत हद्दीत असल्यामुळे त्यांचा नियोजनबद्ध विकास झालेला नाही. आता ही गावे महापालिकेत आल्यामुळे तसे नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. असा आराखडा तयार करताना गावांच्या एकूण क्षेत्रफळाचा अभ्यास करून त्याचे निवासी, औद्योगिक असे विभाग पाडण्यात येतात. त्यात शाळा, दवाखाने, मैदाने, अशा मूलभूत तसेच आवश्यक सुविधांसाठी म्हणून भूखंडावर आरक्षण टाकण्यात येते. सरकारी जागांबरोबर असे आरक्षण खासगी जागांवरही पडते. त्याची नुकसानभरपाई संबंधित मालकांना टीडीआर, एफएसआय यापैकी एका स्वरूपात देण्यात येते.त्यामुळेच हा आराखडा तयार करण्याचा अधिकार पीएमआरडीएलासुद्धा हवा आहे व महापालिकेलाही पाहिजे आहे. गावांमधील नागरी सुविधा महापालिकेशी जोडून घेणे गरजेचे आहे. आराखडा तयार करण्यासाठी लागणारे तांत्रिक मनुष्यबळ पीएमआरडीएकडे नाही. महापालिकेकडे ते आहे, त्यामुळे महापालिकाच या गावांचा विकास आराखडा तयार करेल असे महापालिकेचे म्हणणे आहे. तर महापालिकेत समाविष्ट होण्यापूर्वी ही गावे पीएमआरडीएच्याच अखत्यारीत होती, त्यामुळे आम्हीच आराखडा तयार करणार, असे पीएमआरडीएने जाहीर केले आहे.या गावांमधील बांधकामांच्या परवानग्या देण्यासाठी स्वीकारलेले विकासशुल्क (ज्यातून त्या त्या परिसरासाठी आवश्यक त्या सुविधा केल्या जातात) पीएमआरडीएकडेच आहे. त्यापूर्वी जिल्हा परिषदहे विकासशुल्क स्वीकारत असे. त्यातील अर्धी रक्कम सरकारजमा होऊन अर्धी जिल्हा परिषद व नंतर पीएमआरडीए कडे राहत असे. ही रक्कम द्यावी, अशी मागणी महापालिकेने केली आहे. त्यातून या गावांमध्ये नागरी सुविधा देता येतील, तसेच विकास आराखडाही तयार करता येईल, असे महापालिकेचे म्हणणे आहे.दरम्यान, महापालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले की, पालकमंत्री गिरीश बापट यांनी विकास आराखडा महापालिकेनेच तयार करावा, असे सांगितले असल्याची माहिती दिली. पीएमपीआरडीने हवे तर दोन ते तीन गावांचा असा आराखडा तयार करावा, मात्र हे काम महापालिकेचेच आहे, असा दावा भिमाले यांनी केली. येवलेवाडी सारखा समाविष्ट गावांचा विकास आराखडा तयार करण्यात येईल, असे भिमाले म्हणाले.ानगरसेवकांकडूनचदावे-प्रतिदावेएखाद्या परिसराचा विकास आराखडा तयार करताना त्यात बरेच गैरव्यवहार होत आहेत अशी चर्चा सुरू होती.आरक्षणे टाकणे, वापर नोंद बदलणे, रस्ते बदलणे अशा विषयांमधून असे व्यवहार होत असतात.महापालिका नगरसेवकांकडूनच याप्रकारचे अनेक आरोपकरून दावे-प्रतिदावे केले जातात.

टॅग्स :Puneपुणे