शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

महावितरणच्या वीज बिलांतील वाढ नागरिकांची ठरतेय डोकेदुखी; समाधानकारक उत्तरेही मिळत नसल्याची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 14:42 IST

तक्रारी घेऊन गेलेल्या ग्राहकांना तासनतास रांगेत उभे राहण्याची आली वेळ

ठळक मुद्देवीज बिलं आहेत की खंडण्या ? मनसेचा संतप्त सवाल

पुणे : वाढीव वीज बिलांमुळे नागरिकांना झटका बसला असून कोरोनामुळे आर्थिक चणचणीत असलेल्या नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मीटर रिडींगनुसार बिले दिल्याचा दावा करणाऱ्य वितरणकडून ग्राहकांना समाधानकर उत्तरे मिळत नसून तक्रारी घेऊन गेलेल्या नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे. वास्तविक बिलांमधील वाढ दरवाढीमुळे आणि लॉकडाऊनच्या काळातील अतिरीक्त वीज वापरामुळे झाल्याचे कारण दिले जात आहे. एकंदरीतच नागरिकांमध्ये असंतोष आणि नाराजी असल्याचे दिसत आहे. घरगुती वापराची बिले ग्राहकांच्या अंदाजापेक्षा अधिक आलेली आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मार्च ते जूनदरम्यान उन्हाळ्यामुळे तसेच लॉकडाऊनमुळे घरातील वीज वापर वाढल्याचे आणि 1 एप्रिलपासून  वीज दरवाढ झालेली असल्याने वाढीव बिले दिले गेल्याची माहिती महावितरणकडून देण्यात येत आहे. नागरिकांना वीज युनिटच्या वाढलेल्या दरांबाबत माहितीच नसल्याने सगळा गोंधळ उडाला आहे. लॉकडाऊन असल्याने छापील बिले पाठविणे आणि मीटर रिडींग घेणे बंद होते. त्यामुळे मागील तीन महिन्यांच्या सरासरी वापरावरुन सरासरी बिले पाठविण्यात आली होती. काही नागरिकांनी त्यातील रकमा भरल्या. परंतु, लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर मीटर रिडींग घेऊन पाठविण्यात आलेल्या बिलांमध्ये दरवाढीच्या फरकाने आणि सरासरीपेक्षा अधिक वापर झालेल्या रकमा समाविष्ट करुन अधिक रकमेची बिले पाठविण्यात आली. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा वीज वापरच एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेला नाही. लॉकडाऊनच्या काळात वर्क फ्रॉम होम असल्याने अधिक वीज वापरली गेल्याचे महावितरणकडून देण्यात आलेले कारण चुकीचे असून हा मुद्दाच गैरलागू आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी असे मत जाहीर प्रकट करणे म्हणजे नागरिकांचा अपमान असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सांगितले. महावितरण ही कंपनी होण्यापुर्वीपासूनच लोकांना लुटण्याचाच स्वभाव राहिलेला आहे.  एमएसईबीचे दोन कंपन्यांमध्ये विभाजन झाल्यावर तरी सेवा देण्यात सुधारणा आवश्यक होती; परंतू ती सुद्धा झालेली नाही. नागरिकांना वाढीव रकमांची बिले दिली गेली आहेत. त्याची दुरुस्ती कोणत्याही कारणाशिवाय होणे अपेक्षित असताना आपण दिलेली बिलेच योग्य आहेत असे सांगणे म्हणजे जनतेवर दाखविण्यात येत असलेला अविश्वास असल्याचे कुंभार म्हणाले. =========== महाराष्ट्र विद्यूत नियामक आयोगाने 30 मार्च रोजी दरवाढीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. 1 एप्रिल पासून नवीन वीजदर लागू करण्यात आले आहेत. ही दरवाढ लॉकडाऊन संपेपर्यंत का स्थगित ठेवण्यात आली नाही अशी विचारणा केली जात आहे. बिलांची रक्कम  तीन हप्त्यात भरण्याची परवानगी दिली असली तरी दरमहा नवीन दरांनुसार येणारे बील आणि हप्ता असे समाविष्ठ बिलही मोठ्याच रकमेचे असणार आहे. ==========वीजबिलं आहेत की खंडण्या?, मनसेचा सवालवीज ग्राहकांना महावितरणकडून वाढीव बिलाचे झटके दिले जात आहेत. त्यामुळे ग्राहक मेटाकुटीला आले आहेत. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने निदर्शने करण्यात आली. 'वीज बिल माफी झालीच पाहिजे.' अशी मागणी मनसेने केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिक आर्थिक अडचणीत आले आहेत. सर्वसामान्य आर्थिक अडचणीत आलेले असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने वाढीव वीज बिल आकारणी करून महाराष्ट्राच्या जनतेला मोठा भुर्दंड दिला आहे. वीज बिले आहेत कि खंडण्या? असा सवाल मनसेने केला. सद्यस्थितीत रोजगार आणि व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. घटत चाललेले उत्पन्न यामुळे मेटाकुटीला आलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊनच्या काळातील वीज बिले सरसकट माफ करावीत अशी लेखी मागणी मनसेतर्फे करण्यात आलेली आहे. यावर निर्णय होईपर्यंत महावितरणने नागरिकांमागे वसुलीचा तगादा लावून त्यांच्या मीटरला हात लावला तर मनसे स्टाईल उत्तर देण्यात येईल असा इशारा देण्यात आला. नागरिकांनीही वीज बिले भरु नयेत असे आवाहन मनसेने केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेmahavitaranमहावितरणCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसState Governmentराज्य सरकारNitin Rautनितीन राऊत