शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

बालदिन विशेष : कोवळ्या फुलांचा भुकेशी संघर्ष, कसला आलाय बालदिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 00:13 IST

कशाचा बालदिन, इथे पोट महत्त्वाचे : हताश आई-बापांची व्यथा

रविकिरण सासवडे

बारामती : ‘मुलं ही देवाघरची फुलं’ असं म्हटलं जातं. मात्र केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या कच्च्याबच्च्यांसह रानोमाळ फिरणाऱ्यांच्या पाठी या कोवळ्या फुलांचं बालपण अक्षरश: कोमेजून जातं. ढोल बडवून कितीही बालदिन साजरे केले. तरी ग्रामीण भारतात आजही ‘बाल दीन’च आहेत. अच्छे दिनचं स्वप्न दाखवणाºया डिजिटल इंडियामध्ये ग्रामीण भारतातील कोवळी बालके अद्याप भुकेशी संघर्ष करीत आहेत.

१४ नोव्हेंबर हा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन ‘बालदिन’ साजरा केला जातो. त्यानिमित्ताने‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत हा संघर्ष पुढे आला आहे. असं म्हंटलं जातं, की उज्ज्वल भविष्य पुढील पिढ्यांच्या हाती असतं. ग्रामीण भारतातील पुढच्या पिढ्या अजूनही जगण्यासाठीच संघर्ष करीत आहेत. शाळा, शिक्षण, आरोग्य या गोष्टी या बालकांपासून कोसो दूर आहेत. ऊसतोडणी मजुरांच्या झोपड्यांमध्ये मनीषा, माया, शीतल, कृष्णा, सुरेखा, रवी या चिल्ल्यापिल्ल्यांच्या स्वप्नांना खºया अर्थाने मायेच्या आधाराची गरज आहे. कोणी वीटभट्टीवर उपाशी राबणाºया आईचं काम हलकं करीत आहे. तर कोणी फडात तुटलेल्या उसाचं वाडं बांधून बापाच्या कष्टाला हातभार लावीत आहे. कोणी अवघ्या चार वर्षांचा, तर कोणी नऊ वर्षांची चुणचुणीत मुलगी.

‘कशाचा बालदिन इथं पोट महत्त्वाचं आहे. दुष्काळाशी दोन हात करत जगावं लागतं. पोरांच्या पोटाची काळजी घ्यायची का त्यांना शिकवायचं. पोरगं जगलं तर शिकलं. म्हणून पोटाच्या मागं पळावं लागतं,’ अशी व्यथा औरंगाबाद जिल्ह्यातील भादली गावच्या लक्ष्मण बाळाजी बागुल यांनी मांडली. तर ‘आम्ही आदिवासी, मजुरी करीतच आमचंही बालपण गेलं. मागच्या वर्षी घरकुल मंजूर झालं. ग्रामसेवकानं आडवं लावलं. सगळी कागदं दिली तरी घरकुल काय मिळालं नाही. कामाच्या मागं पळत विंचवाचं बिºहाड व्हावं लागतं. अशी कैफियत एकलव्य आदिवासी समाजाचे अशोक सोनवणे यांनी सांगितली. शहरालगत ऊसतोडणी, वीटभट्टी कामगारांची मुले लक्ष वेधून घेतात. शासन शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठीदेखील शासन मोठ्या प्रमाणात योजनांवर खर्च करीत आहे. मात्र येथील बालकांचे विदारक चित्र पाहिल्यावर शासन यांच्यापर्यंत पोहोचलेच नसल्याचे वास्तव आहे.उपचारांचीही वाणवामागील वर्षी याच दिवसांमध्ये इथं ऊसतोडीसाठी आलो होतो. दीड वर्षाचा माझा मुलगा थंडी-तापानं आजारी पडला. एक-दोन वेळा दवाखान्यातसुद्धा नेलं, मात्र काही फरक पडला नाही. मोठ्या दवाखान्यात जायला पैसे नव्हते.आम्हाला सोडून लेकरू कायमचं गेलं, अशी अंगावर शहारे आणणारी शोकांतिका पाणावलेल्या डोळ्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील भादली गावच्या सुभाष शंकर सोनवणे यांनी सांगितली.

टॅग्स :children's dayबालदिनBaramatiबारामती