शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

मुख्यमंत्री-पालकमंत्री वादात पुणेकर वेठीस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 3:10 AM

कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसचा आरोप : पाणी कपातीच्या निषेधार्थ आंदोलन

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या वादात पाण्याच्या प्रश्नावरून पुणेकरांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप शनिवारी कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने केला. जलसंपदा प्राधीकरणाने पुण्याला लोकसंख्येच्या निकषाप्रमाणे पाणी देण्याचा निर्णय दिला आहे. यामुळे पाणी निम्मे कमी होणार आहे. याचा निषेध करण्यासाठी कॉँग्रेस व राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने लाक्षणिक उपोषण केले. आमदार अनंतराव गाडगील, माजी महापौर अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला, अभय छाजेड, कमल व्यवहारे, डॉ. सतीश देसाई व दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मंडई येथील आंदोलनात सहभागी झाले होते. नगरसेवक संजय बालगुडे यांनी संयोजन केले होते.

पुण्यासाठी पाण्याचा कोटा मंजूर झाल्यावर तो कमी करण्याचा जलसंपदा प्राधिकरणाला अधिकारच नाही. मात्र, तरीही पुणेकरांना पाण्याबाबत वेठीस धरले जात आहे. मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या वादात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन पुण्याचे पाणी कमी केले जात आहे, असा आरोप या वेळी केला. ‘ही पाणीकपात नाही, पुणेकरांचा घात आहे’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.पालिकेत सोमवारीहंडा आंदोलन४कॉँग्रेस आणि राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने सोमवारी महापालिकेत महिलांचे हंडा आंदोलन करण्यात येणार आहे. पाण्याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती संजय बालगुडे यांनी दिली.पुण्यात पाण्याची समस्या निर्माण होण्यामागे नियोजनाचा अभाव हीच समस्या असल्याचे एक नगररचना तज्ज्ञ म्हणून माझे मत आहे. १९८७ मध्ये विकास आराखडा तयार करतानाच भविष्यातील लोकसंख्या विचारात घेऊन पाण्याचे नियोजन करायला हवे होते. तसे ते केले गेले नाही. एखाद्या कामाकडे गंभीरपणे पाहिले नाही की पुढे अन्य गोष्टींमध्येही समस्या निर्माण होत जातात, याचे हे उत्तम उदाहरण आहे. नियोजन करताना याच गोष्टींचा विचार करावा लागतो. जलसंपदा बरोबर आता नव्याने करार करताना महापालिकेने या सर्व गोष्टींचे प्रभावी सादरीकरण केले पाहिजे. त्यात भविष्यात पुणे आणखी वाढणार आहे व येणारे लोकही वाढणार आहेत. ते लक्षात घ्यावे. - रा. ना. गोहाड, ज्येष्ठ नगररचना तज्ज्ञ 

टॅग्स :Puneपुणे