शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

सीएचबी प्राध्यापकांच्या मानधनवाढीला नकारघंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 12:21 IST

सीएचबी प्राध्यापकांना अगदी शिपायांपेक्षाही कमी वेतन मिळत असल्याने त्यांच्यामध्ये नैराश्याची भावना वाढीस लागली आहे.

ठळक मुद्देमानधनात प्रतितास २५० रुपयांहून ५०० रुपये इतकी वाढ करण्याचा प्रस्ताव उच्च शिक्षण संचालनालयाने राज्य शासनाकडे सादरवित्त विभागाची मान्यता मिळत नसल्याने हा प्रस्ताव रखडलेलाशिक्षणमंत्री विनोद तावडे यांना प्राध्यापक भरती त्वरित सुरू करावी, अशी मागणी नेट/सेटग्रस्त प्राध्यापकांकडून करण्यात येत आहे.

पुणे : राज्यात प्राध्यापकांच्या रिक्त जागांवर तासिका तत्त्वावर (सीएचबी) शिकविणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात २५० रुपयांवरून ५०० रुपये वाढ करण्याच्या प्रस्तावाला राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून मंजुरी देण्यात आली नाही. नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात याबाबतची तरतूद होईल, अशी अपेक्षा लावून बसलेल्या हजारो सीएचबी प्राध्यापकांची यामुळे घोर निराशा झाली आहे.  राज्यात प्राध्यापकांच्या भरतीला सध्या स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे महाविद्यालयातून प्राध्यापक निवृत्त झाल्यानंतर त्यांची जागा रिक्त राहत आहे. त्याचबरोबर यापूर्वीच्याही शेकडो जागा रिक्त आहेत. या जागांवर नव्याने सेट-नेट होणारे तरुण तासिका तत्त्वांवर कार्यरत आहेत. त्यांना तासाला अवघे २५० रुपये मानधन देण्यात येत आहे. त्याचबरोबर त्यांना आठवड्यामध्ये ७ तासांपेक्षा जास्त काम देता येत नाही. त्यामुळे महिन्याला अवघ्या ६ ते ७ हजारांच्या तटपुंज्या मानधनावर त्यांना काम करावे लागत आहे. या मानधनात प्रतितास २५० रुपयांहून ५०० रुपये इतकी वाढ करण्याचा प्रस्ताव उच्च शिक्षण संचालनालयाने राज्य शासनाकडे सादर केला आहे. मात्र वित्त विभागाची मान्यता मिळत नसल्याने हा प्रस्ताव रखडलेला आहे. पारंपरिक महाविद्यालयातील प्राध्यापकांना तासाला केवळ २५० रुपये मानधन दिले जात असतानाच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयातील प्राध्यापकांना मात्र प्रतितास ८०० रुपये मानधन देण्याच्या प्रस्तावाला यापूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे. व्यावसायिक आणि पारंपरिक अभ्यासक्रमांमध्ये शासनाकडून भेदभाव केला जात असल्याची भावना प्राध्यापकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. सीएचबी प्राध्यापकांना अगदी शिपायांपेक्षाही कमी वेतन मिळत असल्याने त्यांच्यामध्ये नैराश्याची भावना वाढीस लागली आहे. सीएचबीबरोबरच विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये काम करणाऱ्या  प्राध्यापकांनाही अत्यंत कमी वेतन दिले जात आहे  प्राध्यापकांची भरती त्वरीत सुरु करावी शासनाने प्राध्यापक भरतीला सध्या स्थगिती दिली आहे. त्याचा महाविद्यालयातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे प्राध्यापक भरती त्वरित सुरू करावी, अशी मागणी नेट/सेटग्रस्त प्राध्यापकांकडून करण्यात येत आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना वेळोवेळी निवेदनही देण्यात आले आहे. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक भरती जून २०१८ पर्यंत सुरू केली जाईल, असे तावडे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांची भरती कधी सुरू होणार, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.अत्यंत तटपुंज्या मानधनात काम करावे लागत असल्याने अनेक सेट-नेटधारक प्राध्यापक शिक्षकी पेशाकडे वळण्याचे टाळत आहेत. त्यामुळे केवळ नुकतीच एमए, एमएस्सी झालेली मुले अनेक महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून शिकवू लागली आहेत. यामुळे उच्च शिक्षणाचा दर्जा मोठ्या प्रमाणात घसरू लागला आहे.

टॅग्स :PuneपुणेVinod Tawdeविनोद तावडेProfessorप्राध्यापक