शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
2
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
3
"लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल फ्रॉड, हे भाजपाला ८००,९०० जागाही देतील"; संजय राऊतांचा आरोप
4
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
5
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई
6
मतदान आटोपताच बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्याची हत्या, हल्लीच केला होता भाजपात प्रवेश  
7
PICS : षटकारांचा पाऊस! अमेरिकेच्या शिलेदारानं रचला इतिहास; सलामीच्या सामन्यात यजमानांचा दबदबा
8
१ जूनपासून बदलले महत्त्वाचे नियम, थेट तुमच्या जगण्याशी आहे संबंध!
9
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
10
साप्ताहिक राशीभविष्य : ७ राशींना धनलाभ होणार, शुभवार्ता समजणार; सुख-समृद्धीचा काळ!
11
"गौतम गंभीरनं टीम इंडियाच्या कोचपदासाठी अर्ज केला असेल तर...", गांगुलींचं रोखठोक मत
12
धक्कादायक! मद्यधुंद अवस्थेत रवीना टंडनने केली वृद्ध महिलेला मारहाण? मध्यरात्री नेमकं काय घडलं?
13
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
14
अमेरिकेकडून कॅनडाचा धुव्वा! ६ तारखेला USA vs PAK लढत; नेटकऱ्यांनी शेजाऱ्यांची उडवली खिल्ली
15
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
16
'सुशांत नाही तर...', 'पवित्र रिश्ता'ला 15 वर्षे पुर्ण होताच अंकिता लोखंडे झाली भावूक
17
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
18
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
19
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
20
'मी केदारनाथला गेल्यावर..'; सुशांतच्या बहिणीची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत सांगितलं खास कनेक्शन

बदलत्या हवामानाने वाढला संसर्गजन्य आजारांचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 8:25 PM

बदलत्या हवामानाने वाढला संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला अाहे.

पुणे : दिवसभरात कधी कडक उन, तर कधी गडद ढग दाटून येणे, अचानक सुटलेली थंड हवा, यासगळ्यात भर म्हणजे अवचित पावसाची सर पडणे अशा लहरी वातावरणाने मात्र लहान मुले आणि ज्येष्ठांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. सर्दी, खोकला, जुलाब, डेंग्यु आणि मलेरिया यासारख्या संसर्गजन्य रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. बेभरवशी वातावरणातील बदलामुळे खासकरुन थंड हवेच्या झोताने ज्येष्ठांच्या हात -पायांना मोठ्या प्रमाणात कंप जाणवू लागला आहे. 

    सकाळी थंडी, दुपारी उष्मा आणि संध्याकाळी मुसळधार पाऊस असा तिन्ही ऋतुंचा अनुभव आता  एकाच दिवशी मिळत आहे. मात्र याचा परिणाम ज्येष्ठांसोंबत लहान मुलांना सहन करावा लागत आहे. ढगाळ हवामानामुळे पुन्हा दमा, सांधेदुखी, गुडघादुखी अशा दुखण्यांनी डोके वर काढल्याने ज्येष्ठांची डोकेदुखी आणखी भर पडली आहे. ढगाळ हवामान आणि धुक्याने हवामानाचा नेमका अंदाजच येईनासा झाला आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर झाला असून, साथीच्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. खासकरुन लहान मुलांच्या आरोग्यावर याचा होणारा परिणाम याविषयी बालरोग व शिशुतज्ञ डॉ.सचिन आठमुठे यांनी सांगितले, बदलत्या हवामानामुळे सर्दी, ताप,खोकला, सारखे विषाणुजन्य आजार वाढले आहेत. अनेकांना डेंग्युची लक्षणे दिसून आली आहेत. पाच वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये सर्दी व खोकल्याचे प्रमाण सर्वाधिक आहे तर वय वर्षे एक ते पाच मधील मुलांना  ‘‘हँन्ड,फुट अँन्ड माऊथ डिसीज’’ ची लागण झालेली आहे. त्याचप्रमाणे ढगाळ हवामानामुळे बालदम्याचे रुग्ण वाढले असून पाणीबदलाने उलट्या आणि जुलाबाने लहान मुले त्रस्त आहेत.    

    गेल्या काही दिवसांपूर्वी ऐन दिवाळीत पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीने वातावरण कमालीचे बदलुन गेले आहे. अशा बेभरवशी वातावरणामुळे हवामानाचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. सध्या सकाळी  थंडी जाणवते, तर दुपारी उन्हाचा कडाका सोसावा लागत आहे. रात्री उकाडा जाणवतो, तर पहाटे गारवा जाणवतो, त्यामुळे एकाच वेळी विविध ऋतूंचा सामना करावा लागत आहे. अशा वातावरणाचा त्रास हदयविकाराच्या रुग्णांना सहन करावा लागत आहे. हद्यविकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना अशा वातावरणात प्रामुख्याने न्युमोनिया सारख्या आजाराला सामोरे जावे लागते. सामान्य लोकांच्या तुलनेत हद्यविकाराच्या लोकांना याची लागण लगेच होते. वय वर्षे 60 च्या पुढील आणि 15 वर्षाखालील मुलांमध्ये श्वासोश्वासाच्या आणि हद्यविषयक तक्रारी दिसू लागतात. यावर वेळेवर लसीकरण करुन घेणे आणि कुठल्याही प्रकारच्या सर्दी, खोकल्याकडे दुर्लक्ष न करणे याची काळजी त्यांनी घ्यावी. असे हद्यरोगतज्ञ डॉ.हेमंत कोकणे सांगतात. 

वातावरणातील अचानक बदलामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे.

वातावरणातील अचानक बदलामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. सर्दीमुळे अनेकांना सायनसने हैराण केले आहे. तर लहान मुलांच्या कानाचे दुखणे वाढु लागले आहे. कानात पाणी साठणे, कानात पु होणे अशा प्रकारचा त्रास त्यांना होत आहे. विषाणुजन्य आजाराने नाक, कान आणि घशाच्या आजारात वाढ झाली आहे.

- डॉ. समीर जोशी (कान, नाक, घसा तज्ञ) 

* काय करावे?- लहरी हवामानाचा सामना करताना विशेषत: लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्याकरिता त्यांना सातत्याने पाणी उकळुन द्यावे.- ज्यांना सर्दी, खोकला, ताप यासारख्या संसर्गजन्य आजाराची लागण झालेली आहे त्यांच्यापासून त्यांना दूर ठेवावे.- बालदम्याचे जे रुग्ण आहेत त्यांना वेळेवर वाफ देणे, त्यांच्या श्वासोश्वासात कुठल्याही प्रकारचा धोका वाटल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. 

- अस्वच्छतेमुळे साथीच्या आजारांचीही भीती कायम आहे. साठलेल्या पाण्यामुळे डेंगी आणि मलेरियाचे रुग्ण वाढण्याचा धोका वाढताना दिसत आहे. यामुळे किरकोळ ताप किंवा सर्दीकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा वेळीच उपचार घेवून स्वच्छतेला मह्त्व द्यावे लागणार आहे.  

- दिवाळी म्हटलं की घरोघरी गोड धोड पदार्थांची रेलचेल असते. काहींना त्या तेलकट पदार्थांनी घसादुखीचा त्रास जाणवतो. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अशा प्रकारचे दुर्लक्ष आरोग्याकरिता धोकादायक ठरु शकते.   

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स