शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

बदलत्या हवामानाने वाढला संसर्गजन्य आजारांचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 20:28 IST

बदलत्या हवामानाने वाढला संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला अाहे.

पुणे : दिवसभरात कधी कडक उन, तर कधी गडद ढग दाटून येणे, अचानक सुटलेली थंड हवा, यासगळ्यात भर म्हणजे अवचित पावसाची सर पडणे अशा लहरी वातावरणाने मात्र लहान मुले आणि ज्येष्ठांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. सर्दी, खोकला, जुलाब, डेंग्यु आणि मलेरिया यासारख्या संसर्गजन्य रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. बेभरवशी वातावरणातील बदलामुळे खासकरुन थंड हवेच्या झोताने ज्येष्ठांच्या हात -पायांना मोठ्या प्रमाणात कंप जाणवू लागला आहे. 

    सकाळी थंडी, दुपारी उष्मा आणि संध्याकाळी मुसळधार पाऊस असा तिन्ही ऋतुंचा अनुभव आता  एकाच दिवशी मिळत आहे. मात्र याचा परिणाम ज्येष्ठांसोंबत लहान मुलांना सहन करावा लागत आहे. ढगाळ हवामानामुळे पुन्हा दमा, सांधेदुखी, गुडघादुखी अशा दुखण्यांनी डोके वर काढल्याने ज्येष्ठांची डोकेदुखी आणखी भर पडली आहे. ढगाळ हवामान आणि धुक्याने हवामानाचा नेमका अंदाजच येईनासा झाला आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर झाला असून, साथीच्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. खासकरुन लहान मुलांच्या आरोग्यावर याचा होणारा परिणाम याविषयी बालरोग व शिशुतज्ञ डॉ.सचिन आठमुठे यांनी सांगितले, बदलत्या हवामानामुळे सर्दी, ताप,खोकला, सारखे विषाणुजन्य आजार वाढले आहेत. अनेकांना डेंग्युची लक्षणे दिसून आली आहेत. पाच वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये सर्दी व खोकल्याचे प्रमाण सर्वाधिक आहे तर वय वर्षे एक ते पाच मधील मुलांना  ‘‘हँन्ड,फुट अँन्ड माऊथ डिसीज’’ ची लागण झालेली आहे. त्याचप्रमाणे ढगाळ हवामानामुळे बालदम्याचे रुग्ण वाढले असून पाणीबदलाने उलट्या आणि जुलाबाने लहान मुले त्रस्त आहेत.    

    गेल्या काही दिवसांपूर्वी ऐन दिवाळीत पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीने वातावरण कमालीचे बदलुन गेले आहे. अशा बेभरवशी वातावरणामुळे हवामानाचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. सध्या सकाळी  थंडी जाणवते, तर दुपारी उन्हाचा कडाका सोसावा लागत आहे. रात्री उकाडा जाणवतो, तर पहाटे गारवा जाणवतो, त्यामुळे एकाच वेळी विविध ऋतूंचा सामना करावा लागत आहे. अशा वातावरणाचा त्रास हदयविकाराच्या रुग्णांना सहन करावा लागत आहे. हद्यविकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना अशा वातावरणात प्रामुख्याने न्युमोनिया सारख्या आजाराला सामोरे जावे लागते. सामान्य लोकांच्या तुलनेत हद्यविकाराच्या लोकांना याची लागण लगेच होते. वय वर्षे 60 च्या पुढील आणि 15 वर्षाखालील मुलांमध्ये श्वासोश्वासाच्या आणि हद्यविषयक तक्रारी दिसू लागतात. यावर वेळेवर लसीकरण करुन घेणे आणि कुठल्याही प्रकारच्या सर्दी, खोकल्याकडे दुर्लक्ष न करणे याची काळजी त्यांनी घ्यावी. असे हद्यरोगतज्ञ डॉ.हेमंत कोकणे सांगतात. 

वातावरणातील अचानक बदलामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे.

वातावरणातील अचानक बदलामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. सर्दीमुळे अनेकांना सायनसने हैराण केले आहे. तर लहान मुलांच्या कानाचे दुखणे वाढु लागले आहे. कानात पाणी साठणे, कानात पु होणे अशा प्रकारचा त्रास त्यांना होत आहे. विषाणुजन्य आजाराने नाक, कान आणि घशाच्या आजारात वाढ झाली आहे.

- डॉ. समीर जोशी (कान, नाक, घसा तज्ञ) 

* काय करावे?- लहरी हवामानाचा सामना करताना विशेषत: लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्याकरिता त्यांना सातत्याने पाणी उकळुन द्यावे.- ज्यांना सर्दी, खोकला, ताप यासारख्या संसर्गजन्य आजाराची लागण झालेली आहे त्यांच्यापासून त्यांना दूर ठेवावे.- बालदम्याचे जे रुग्ण आहेत त्यांना वेळेवर वाफ देणे, त्यांच्या श्वासोश्वासात कुठल्याही प्रकारचा धोका वाटल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. 

- अस्वच्छतेमुळे साथीच्या आजारांचीही भीती कायम आहे. साठलेल्या पाण्यामुळे डेंगी आणि मलेरियाचे रुग्ण वाढण्याचा धोका वाढताना दिसत आहे. यामुळे किरकोळ ताप किंवा सर्दीकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा वेळीच उपचार घेवून स्वच्छतेला मह्त्व द्यावे लागणार आहे.  

- दिवाळी म्हटलं की घरोघरी गोड धोड पदार्थांची रेलचेल असते. काहींना त्या तेलकट पदार्थांनी घसादुखीचा त्रास जाणवतो. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अशा प्रकारचे दुर्लक्ष आरोग्याकरिता धोकादायक ठरु शकते.   

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स