शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
Sonam Raghuvanshi : राजाच्या हत्येचा प्लॅन अयशस्वी झाला असता तर काय करणार होती सोनम? बॅकअप प्लॅन तयार
4
ट्रेन प्रवासाची चिंता मिटली! आता २४ तास आधीच मिळेल कन्फर्म सीटची अपडेट, कधीपासून लागू होणार?
5
कुणाल कपूरच्या गुड लूक्सवर चाहते फिदा, 'रामायण'च्या सेटवरचा फोटो केला शेअर? चाहते म्हणाले...
6
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
7
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
8
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
9
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
10
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली, गोलंदाजांना फुटला घाम
11
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
12
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
13
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
14
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
15
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
16
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
17
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
18
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
19
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
20
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."

बदलत्या हवामानाने वाढला संसर्गजन्य आजारांचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 20:28 IST

बदलत्या हवामानाने वाढला संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला अाहे.

पुणे : दिवसभरात कधी कडक उन, तर कधी गडद ढग दाटून येणे, अचानक सुटलेली थंड हवा, यासगळ्यात भर म्हणजे अवचित पावसाची सर पडणे अशा लहरी वातावरणाने मात्र लहान मुले आणि ज्येष्ठांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. सर्दी, खोकला, जुलाब, डेंग्यु आणि मलेरिया यासारख्या संसर्गजन्य रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. बेभरवशी वातावरणातील बदलामुळे खासकरुन थंड हवेच्या झोताने ज्येष्ठांच्या हात -पायांना मोठ्या प्रमाणात कंप जाणवू लागला आहे. 

    सकाळी थंडी, दुपारी उष्मा आणि संध्याकाळी मुसळधार पाऊस असा तिन्ही ऋतुंचा अनुभव आता  एकाच दिवशी मिळत आहे. मात्र याचा परिणाम ज्येष्ठांसोंबत लहान मुलांना सहन करावा लागत आहे. ढगाळ हवामानामुळे पुन्हा दमा, सांधेदुखी, गुडघादुखी अशा दुखण्यांनी डोके वर काढल्याने ज्येष्ठांची डोकेदुखी आणखी भर पडली आहे. ढगाळ हवामान आणि धुक्याने हवामानाचा नेमका अंदाजच येईनासा झाला आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर झाला असून, साथीच्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. खासकरुन लहान मुलांच्या आरोग्यावर याचा होणारा परिणाम याविषयी बालरोग व शिशुतज्ञ डॉ.सचिन आठमुठे यांनी सांगितले, बदलत्या हवामानामुळे सर्दी, ताप,खोकला, सारखे विषाणुजन्य आजार वाढले आहेत. अनेकांना डेंग्युची लक्षणे दिसून आली आहेत. पाच वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये सर्दी व खोकल्याचे प्रमाण सर्वाधिक आहे तर वय वर्षे एक ते पाच मधील मुलांना  ‘‘हँन्ड,फुट अँन्ड माऊथ डिसीज’’ ची लागण झालेली आहे. त्याचप्रमाणे ढगाळ हवामानामुळे बालदम्याचे रुग्ण वाढले असून पाणीबदलाने उलट्या आणि जुलाबाने लहान मुले त्रस्त आहेत.    

    गेल्या काही दिवसांपूर्वी ऐन दिवाळीत पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीने वातावरण कमालीचे बदलुन गेले आहे. अशा बेभरवशी वातावरणामुळे हवामानाचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. सध्या सकाळी  थंडी जाणवते, तर दुपारी उन्हाचा कडाका सोसावा लागत आहे. रात्री उकाडा जाणवतो, तर पहाटे गारवा जाणवतो, त्यामुळे एकाच वेळी विविध ऋतूंचा सामना करावा लागत आहे. अशा वातावरणाचा त्रास हदयविकाराच्या रुग्णांना सहन करावा लागत आहे. हद्यविकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना अशा वातावरणात प्रामुख्याने न्युमोनिया सारख्या आजाराला सामोरे जावे लागते. सामान्य लोकांच्या तुलनेत हद्यविकाराच्या लोकांना याची लागण लगेच होते. वय वर्षे 60 च्या पुढील आणि 15 वर्षाखालील मुलांमध्ये श्वासोश्वासाच्या आणि हद्यविषयक तक्रारी दिसू लागतात. यावर वेळेवर लसीकरण करुन घेणे आणि कुठल्याही प्रकारच्या सर्दी, खोकल्याकडे दुर्लक्ष न करणे याची काळजी त्यांनी घ्यावी. असे हद्यरोगतज्ञ डॉ.हेमंत कोकणे सांगतात. 

वातावरणातील अचानक बदलामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे.

वातावरणातील अचानक बदलामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. सर्दीमुळे अनेकांना सायनसने हैराण केले आहे. तर लहान मुलांच्या कानाचे दुखणे वाढु लागले आहे. कानात पाणी साठणे, कानात पु होणे अशा प्रकारचा त्रास त्यांना होत आहे. विषाणुजन्य आजाराने नाक, कान आणि घशाच्या आजारात वाढ झाली आहे.

- डॉ. समीर जोशी (कान, नाक, घसा तज्ञ) 

* काय करावे?- लहरी हवामानाचा सामना करताना विशेषत: लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्याकरिता त्यांना सातत्याने पाणी उकळुन द्यावे.- ज्यांना सर्दी, खोकला, ताप यासारख्या संसर्गजन्य आजाराची लागण झालेली आहे त्यांच्यापासून त्यांना दूर ठेवावे.- बालदम्याचे जे रुग्ण आहेत त्यांना वेळेवर वाफ देणे, त्यांच्या श्वासोश्वासात कुठल्याही प्रकारचा धोका वाटल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. 

- अस्वच्छतेमुळे साथीच्या आजारांचीही भीती कायम आहे. साठलेल्या पाण्यामुळे डेंगी आणि मलेरियाचे रुग्ण वाढण्याचा धोका वाढताना दिसत आहे. यामुळे किरकोळ ताप किंवा सर्दीकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा वेळीच उपचार घेवून स्वच्छतेला मह्त्व द्यावे लागणार आहे.  

- दिवाळी म्हटलं की घरोघरी गोड धोड पदार्थांची रेलचेल असते. काहींना त्या तेलकट पदार्थांनी घसादुखीचा त्रास जाणवतो. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अशा प्रकारचे दुर्लक्ष आरोग्याकरिता धोकादायक ठरु शकते.   

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स