शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
4
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
5
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
6
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
7
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
8
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
9
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
10
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
11
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
12
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
13
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
14
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
15
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
16
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
17
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
18
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
19
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
20
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!

बदलत्या हवामानाने वाढला संसर्गजन्य आजारांचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 20:28 IST

बदलत्या हवामानाने वाढला संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला अाहे.

पुणे : दिवसभरात कधी कडक उन, तर कधी गडद ढग दाटून येणे, अचानक सुटलेली थंड हवा, यासगळ्यात भर म्हणजे अवचित पावसाची सर पडणे अशा लहरी वातावरणाने मात्र लहान मुले आणि ज्येष्ठांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. सर्दी, खोकला, जुलाब, डेंग्यु आणि मलेरिया यासारख्या संसर्गजन्य रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. बेभरवशी वातावरणातील बदलामुळे खासकरुन थंड हवेच्या झोताने ज्येष्ठांच्या हात -पायांना मोठ्या प्रमाणात कंप जाणवू लागला आहे. 

    सकाळी थंडी, दुपारी उष्मा आणि संध्याकाळी मुसळधार पाऊस असा तिन्ही ऋतुंचा अनुभव आता  एकाच दिवशी मिळत आहे. मात्र याचा परिणाम ज्येष्ठांसोंबत लहान मुलांना सहन करावा लागत आहे. ढगाळ हवामानामुळे पुन्हा दमा, सांधेदुखी, गुडघादुखी अशा दुखण्यांनी डोके वर काढल्याने ज्येष्ठांची डोकेदुखी आणखी भर पडली आहे. ढगाळ हवामान आणि धुक्याने हवामानाचा नेमका अंदाजच येईनासा झाला आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर झाला असून, साथीच्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. खासकरुन लहान मुलांच्या आरोग्यावर याचा होणारा परिणाम याविषयी बालरोग व शिशुतज्ञ डॉ.सचिन आठमुठे यांनी सांगितले, बदलत्या हवामानामुळे सर्दी, ताप,खोकला, सारखे विषाणुजन्य आजार वाढले आहेत. अनेकांना डेंग्युची लक्षणे दिसून आली आहेत. पाच वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये सर्दी व खोकल्याचे प्रमाण सर्वाधिक आहे तर वय वर्षे एक ते पाच मधील मुलांना  ‘‘हँन्ड,फुट अँन्ड माऊथ डिसीज’’ ची लागण झालेली आहे. त्याचप्रमाणे ढगाळ हवामानामुळे बालदम्याचे रुग्ण वाढले असून पाणीबदलाने उलट्या आणि जुलाबाने लहान मुले त्रस्त आहेत.    

    गेल्या काही दिवसांपूर्वी ऐन दिवाळीत पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीने वातावरण कमालीचे बदलुन गेले आहे. अशा बेभरवशी वातावरणामुळे हवामानाचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. सध्या सकाळी  थंडी जाणवते, तर दुपारी उन्हाचा कडाका सोसावा लागत आहे. रात्री उकाडा जाणवतो, तर पहाटे गारवा जाणवतो, त्यामुळे एकाच वेळी विविध ऋतूंचा सामना करावा लागत आहे. अशा वातावरणाचा त्रास हदयविकाराच्या रुग्णांना सहन करावा लागत आहे. हद्यविकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना अशा वातावरणात प्रामुख्याने न्युमोनिया सारख्या आजाराला सामोरे जावे लागते. सामान्य लोकांच्या तुलनेत हद्यविकाराच्या लोकांना याची लागण लगेच होते. वय वर्षे 60 च्या पुढील आणि 15 वर्षाखालील मुलांमध्ये श्वासोश्वासाच्या आणि हद्यविषयक तक्रारी दिसू लागतात. यावर वेळेवर लसीकरण करुन घेणे आणि कुठल्याही प्रकारच्या सर्दी, खोकल्याकडे दुर्लक्ष न करणे याची काळजी त्यांनी घ्यावी. असे हद्यरोगतज्ञ डॉ.हेमंत कोकणे सांगतात. 

वातावरणातील अचानक बदलामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे.

वातावरणातील अचानक बदलामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. सर्दीमुळे अनेकांना सायनसने हैराण केले आहे. तर लहान मुलांच्या कानाचे दुखणे वाढु लागले आहे. कानात पाणी साठणे, कानात पु होणे अशा प्रकारचा त्रास त्यांना होत आहे. विषाणुजन्य आजाराने नाक, कान आणि घशाच्या आजारात वाढ झाली आहे.

- डॉ. समीर जोशी (कान, नाक, घसा तज्ञ) 

* काय करावे?- लहरी हवामानाचा सामना करताना विशेषत: लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्याकरिता त्यांना सातत्याने पाणी उकळुन द्यावे.- ज्यांना सर्दी, खोकला, ताप यासारख्या संसर्गजन्य आजाराची लागण झालेली आहे त्यांच्यापासून त्यांना दूर ठेवावे.- बालदम्याचे जे रुग्ण आहेत त्यांना वेळेवर वाफ देणे, त्यांच्या श्वासोश्वासात कुठल्याही प्रकारचा धोका वाटल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. 

- अस्वच्छतेमुळे साथीच्या आजारांचीही भीती कायम आहे. साठलेल्या पाण्यामुळे डेंगी आणि मलेरियाचे रुग्ण वाढण्याचा धोका वाढताना दिसत आहे. यामुळे किरकोळ ताप किंवा सर्दीकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा वेळीच उपचार घेवून स्वच्छतेला मह्त्व द्यावे लागणार आहे.  

- दिवाळी म्हटलं की घरोघरी गोड धोड पदार्थांची रेलचेल असते. काहींना त्या तेलकट पदार्थांनी घसादुखीचा त्रास जाणवतो. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अशा प्रकारचे दुर्लक्ष आरोग्याकरिता धोकादायक ठरु शकते.   

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स