शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

महापालिका वाॅर्ड रचनेबाबत थोडं थांबा; बुधवारी पक्का निर्णय कळेल, अजित दादांचं सूचक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 20:33 IST

निवडणूकांसाठीची वॉर्ड रचना बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देतीन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय झाल्यानंतर त्यावरून उलट-सुलट चर्चा सुरू

पुणे : मुंबई वगळता अन्य महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय वाॅर्ड रचनेबाबत थोडे थांबा, बुधवारी होणा-या मंत्री मंडळाच्या बैठकीत तुम्हाला याबाबत पक्का निर्णय कळेल, असे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केले. यामुळेच पुन्हा एकदा महापालिका निवडणूकांसाठीची वॉर्ड रचना बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आगामी महापालिका निवडणुकीसाठी मुंबई वगळता अन्य सर्व महापालिकांसाठी तीन सदस्यीय वाॅर्ड पध्दतीने घेण्याचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला. मंत्रीमंडळाच्या निर्णयानंतर दुसऱ्याच दिवशी पवार यांनी प्रदेश काँग्रेसने कार्यकरणीची बैठक घेऊन राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध केला होता. महापालिका निवडणूकांसाठी दोन सदस्यांचा एकच प्रभाग करावा, अशी मागणी केली होती. तर दोन सदस्यांचा एक प्रभाग असावा, अशी भूमिका पहिल्या पासून राष्ट्रावादी कॉंग्रेसने घेतली आहे. असे असताना तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय झाल्यानंतर त्यावरून उलट-सुलट चर्चा सुरू झाली होती.

कोरोनाची आढावा बैठक घेण्यासाठी आज पवार पुण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत वॉर्ड रचनेसंदर्भात विचारले असता पवारांनी ‘थोडे थांबा’ असे सूचक वक्तव्य केल्याने राज्य सरकारने यापूर्वी घेतलेला निर्णय पुन्हा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पवार म्हणाले,‘‘ काही वाद होणार नाही. आमच्या सहकारी पक्षाने वेगळी भूमिका घेतली आहे. ती त्यांनी त्यांच्या पक्षाच्या व्यासपीठावर मांडली आहे. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसून समंजसाने मार्ग काढू. येत्या बुधवारी होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबतचा पक्की माहिती मिळेल. वॉडे रचनेबाबत कोणताही वाद होणार नाही. ज्यांना न्यायालयालयात जायचे ते जाऊ शकतात. निवडणूका आयोगाने जिल्हा परिरदेच्या निवडणूका पुढे ढकलण्यास नकार दिला आहे, त्यावर विचारले असता पवार म्हणाले,‘ निवडणूक आयोग त्यांचे काम करीत आहे. ती स्वयत्त संस्था आहे. त्यांना त्यांचा अधिकर आहे. त्यांचे ते भूमिका घेऊ शकतात.

मुळशी धरणातून पुण्यासाठी लवकरच निर्णय 

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे-बंगळुरू रस्त्यावर नवे पुणे विकसित करा अशी सूचना केली आहे. गडकरी यासाठी काहीसे अग्रही दिसत आहेत. पण सध्या वाढत्या पुण्यासाठी पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. भामा-आसखेड धरणातून पाणी घेऊन काही भागाचा प्रश्न मार्गी लावला आहे. टाटांच्या मुळशी धरणातून पाणी घेण्याबाबत चर्चा सुरू आहे. या संदर्भातील एक अहवाल लवकरच शासनाकडे दाखल होणार आहे. त्यानंतर निर्णय घेण्यात येईल. यामुळेच नवीन पुण्याचा विचार करताना सर्वात प्रथम पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावणे खूप आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूक