शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

कोरोनानंतरच्या जगात टिकून राहण्यासाठी मानसिकता बदला : डॉ.भालचंद्र मुणगेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 19:41 IST

कोरोनानंतरच्या जगात टिकून राहण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील सर्वांनीच आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे असे मत डाॅ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले.

पुणे: कोरोनापूर्वीचे जग आणि कोरोना नंतरचे जग यात प्रचंड तफावत असणार आहे .शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद असणार नाही.त्यामुळे कोरोनानंतरच्या जगात टिकून राहण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील सर्वांनीच आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ भालचंद्र मुणगेकर यांनी केले.

भारती विद्यापीठाच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त डॉ.मुणगेकर यांनी प्राध्यापक आणि शिक्षकेतर सेवक यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर युट्युब चॅनेलच्या माध्यमातून या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम, राज्याचे कृषी व सहकार  राज्यमंत्री, भारती विद्यापीठाचे कार्यवाह आणि  प्र.कुलगुरू डॉ. विश्वजित कदम,कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, सहकार्यवाह डॉ.के.डी.जाधव, डॉ.एम. एस. सगरे, व.भा. म्हेत्रे ,कुलसचिव जी. जयकुमार उपस्थित होते.

डॉ.मुणगेकर म्हणाले, कोरोनाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होणार असून त्याची मोठी किंमत भारतासारख्या विकसनशील देशाला मोजावी लागणार आहे. विकास दरात ऐतिहासिक घसरण होणार असून बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.अशा काळात नोकरीच्या मागे न लागता विद्यार्थी स्वतःच्या कुवतीनुसार छोटे मोठे उद्योग करून अर्थार्जन  करू शकतील,असे सामर्थ्य विद्यापीठांना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करावे लागेल.

प्राध्यापकानी केवळ ग्रंथालयात बसून अभ्यासक्रम न ठरवता औद्योगिक क्षेत्रातील लोकांच्या काय अपेक्षा आहेत, याचाही विचार केला पाहिजे. लॉकडाऊन संपल्यानंतर पंतप्रधानांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी आणि जनतेशी संवाद साधून पुढची दिशा काय असेल, हे स्पष्ट केले पाहिजे. लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी मजुरांना त्यांच्या गावी जाण्याची संधी मिळाली असती तर चार कोटी मजुरांची ससेहोलपट झाली नसती,असेही मुणगेकर म्हणाले.

डॉ.विश्वजित कदम म्हणाले,  भारती विद्यापीठाच्या माध्यमातून डॉ.पतंगराव कदम यांनी बहुजन समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत शिक्षणाची गंगा पोहचवली. भारती विद्यापीठाने केवळ पदवीधर नाही तर देशाचे सुसंस्कृत नागरिक तयार केले. कोरोनाच्या संकटात डॉक्टर, नर्सेस, पोलिस आणि प्रशासनातील अधिकारी आपल्या प्राणाची पर्वा न करता जे योगदान देत आहेत. त्याविषयी आपण कायम कृतज्ञ राहिले पाहिजे. कोरोना नंतर येणारी आव्हाने पेलण्यासाठी विद्यापीठातील सर्व घटकांनी सज्ज असले पाहिजे.

कोरोनाच्या या संकटात संशोधनाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. संशोधनात मानवी समूहाचे अस्तित्व टिकवण्याचे सामर्थ्य असले पाहिजे.  संशोधन हा विद्यापीठाचा आत्मा आहे,असे आपण आजवर म्हणत होतो. समाजाचे प्राण वाचविण्याचे काम संशोधनातून झाले पाहिजे.ही काळाची गरज आहे. -डॉ.शिवाजीराव कदम ,कुलपती, भारती विद्यापीठ, 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याBhalchandra Mungekarभालचंद्र मुणगेकरEducationशिक्षण